-
-
Bhabnagulo (भाबनगुलो)
Taslima nasrin is known for her writing on women's oppression and criticism of religion, despite forced exile and multiple fatwas calling for her death. & in this essays she once again rightly pointed out the various social issues. ‘भाबनागुलो’ अर्थात चिंताच चिंता..समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे संवेदनशील मनात उमटणारे पडसाद या पुस्तकात प्रतिबिंबित होतात. कवीमनाच्या तसलिमा नासरिन नानाविध विषयांवर मुक्त चिंतन करतात. मुल्ला-मौलवीच्या फतव्यांमध्ये घुसमटणारं स्त्रीमन...मूलतत्त्ववादाच्या भोवऱ्यात अडकलेला राष्ट्रवाद...स्थलांतरातली अपरिहार्यता...अशा प्रश्नांची सल तसलिमा नासरिन यांना टोचणी देत br> राहते. त्यातून त्या अंतर्मुख करणारे प्रश्न विचारतात. त्यांच्या या अभिव्यक्तीतून जणू समकालीन वास्तवाचा आरसा आपल्यासमोर उभा ठाकतो. आणि सामाजिक चिंतांकडे अंगुलीनिर्देश करत br> राहतो.
-
Valmikiramayana (वाल्मीकिरामायण)
श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे. रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे; परंतु फक्त मूळ वाल्मीकिरामायण समोर ठेवून त्यावर प्रवचने होणे हे मराठीत तसे अपूर्वच. श्री. माधवराव चितळे यांनी अशा या ८८ प्रवचनांचा प्रपंच पाच वर्षांत पूर्ण केला. त्याचेच हे संपादित रूप! वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून सुंदर आहेच; पण ही नुसती रामकथा नाही. त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, त्यातील चालीरीती, राज्यव्यवस्था, राजाकडून असलेल्या अपेक्षा, मानवी संबंध अशा अनेक विषयांची विस्तृत मांडणी आहे. अगदी आपल्याला आश्चर्य वाटेल अशी! या प्रवचनांमध्ये अशा सर्व पैलूंवर प्रकाश टाकलेला दिसेल आणि आजच्या संदर्भातले याचे महत्त्वही कळेल. तसेच काही रूढ समजुती - उदा. सीतास्वयंवर, अहल्येची, शबरीची कथा याबद्दलही वाल्मीकींनी वेगळेच सांगितलेले दिसेल. वाल्मीकींचा हनुमान तर आपल्या कथांमधून येणार्या हनुमानापेक्षा कसा वेगळा होता तेही महत्त्वाचे आहे. राम हा विष्णूचा अवतार म्हणून जन्माला आला असला तरी रामायणात त्याचे एक कर्तबगार मानव असेच चित्रण आहे, ‘राम’ असाच उल्लेख आहे. मग आपण त्याला ‘प्रभू राम’ असे का म्हणावे, ते ह्या प्रवचनांमधील प्रदीर्घ विवेचन वाचून आपल्याला समजेल. शेकडो वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी ही रामकथा मूळ स्वरूपात आजच्या संदर्भाने कथन करण्यात आलेली असून, नवीन पिढीलाही हा ग्रंथ तितकाच रोमांचक वाटेल.
-
Drushtidata (दृष्टि दाता)
When a crippling disease shattered his lifelong ambition Dr V venkataswamy chose an impossible new dream to cure the world of blindness the tiny clinic he founded in India defied conventional business logic and is now the largest provider of eye care on the planet.
-
Syria Sagale Virudh Sagale (सीरिया सगळे विरुद्ध सग
Good read. Value for money. Do buy and read. Should not take more than a few hours to read. Entertaining. Brilliant book by VP Kale. He writes close to life. Light hearted & relaxing.
-
Loksatta Anyatha (लोकसत्ता अन्यथा)
Collection of popular column on various National, International issues by editor Girish Kuber in the daily Loksatta
-
Bandookdweep (बंदूकद्वीप)
बंदूक. तसं म्हटलं तर एक साधासा शब्द पण ह्याच शब्दामुळे डीन दत्ताच्या दुनियेत उलथापालथ घडून येते. दुर्मिळ पुस्तकं विकणारा आणि चार भिंतीतल्या शांत आयुष्याची सवय झालेला डीन. मात्र त्याच्या ठाम समजुतींना धक्के बसायला लागतात आणि सुरू होते एक विलक्षण यात्रा! वाटेत भेटणाऱ्या माणसांच्या आठवणींच्या आणि अनुभवाच्या गुंत्यातून वाट काढत ही यात्रा त्याला भारतातून लॉस एंजेलिस आणि तिथून व्हेनिसला घेऊन जाते. वाटेत त्याला ह्या प्रवासाची चक्रं फिरवणारी त्याच्यासारखीच बंगाली-अमेरिकन पिया भेटते; टिपू नावाचा एक धडपड्या तरुण पोरगा आजकालच्या जगण्यातलं वास्तव डीनच्या डोळ्यासमोर उलगडून दाखवतो; कोणा गरजवंताला मदत करायचा आटोकाट प्रयत्न करणारा रफी भेटतो; आणि ह्या सर्वांना गुंफणाऱ्या कथेचा दुवा सांधणारी एक जुनी मैत्रीण चीन्ता भेटते. स्वतःविषयीच्या, लहानपणापासून ऐकलेल्या बंगाली लोककथांबद्दलच्या आणि आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्याच्या समजुती पार उलट्या-पालट्या करून टाकणारा हा प्रवास आहे. अमिताव घोष ह्यांची बंदूकद्वीप ही काळ आणि अवकाशाच्या विस्तारात संचार करणारी एक उत्कृष्टरित्या साकार झालेली कादंबरी आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाची, वाढत्या स्थलांतराची आणि अनिरुद्ध परिवर्तनाची ती कहाणी आहे. मात्र ही कहाणी आशादायकही आहे. ज्या माणसाची जगावरची आणि भविष्यावरची श्रद्धा दोन असामान्य स्त्रियांमुळे दृढ होत जाते त्याची ही कथा आहे.