-
Me Deshala Kay Deu Shakto (मी देशाला काय देऊ शकतो)
देशातील सर्वांत लाडक्या शिक्षकाच्या स्मृत्यर्थ ‘याचि सम हा’ असे अत्युत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. कलाम ओळखले जातात. त्यांचे बोल, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली अनेक दृष्टींनी स्वतंत्र वस्तुपाठ आहेत. त्यांचा जवळून सहवास लाभलेले आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शिष्य सृजन पाल सिंग यांनी हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे. आपल्या गुरूच्या नीतिमूल्यांची, त्यांनी केलेल्या प्रतिज्ञांची, त्यांनी तरुणांना दिलेल्या संदेशांची लेखक या पुस्तकातून उजळणी करतात. लेखकाने वर्गाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन डॉ. कलाम यांचे विचारधन गोळा केले, ते या पुस्तकातून ते वाचकांना वाटतात. डॉक्टरांची दिनचर्या, त्यांचे दौरे, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील त्यांचे विचार, काही आख्यायिका, काही कोपरखळ्या अशा विविधांगी विषयांची ‘उत्कंठा वाढवणारी जादूची पोतडी’ लेखकमहाशय वाचकांसमोर खुली करतात आणि त्यात वाचक इतके समरसून जातात, की हा समकालीन भारताचा थोर सुपुत्र जणू काही आपला दोस्त आहे, अशी त्यांची भावना होते. डॉ. कलाम यांच्याविषयीच्या आजवर अपरिचित असलेल्या अनेक किश्श्यांनी, त्यांच्या दुर्मिळ फोटोंनी, काही नमुनेदार मजेशीर ‘कलामी’ पदबंधांनी सजलेल्या त्यांच्या या आठवणी वाचकांसाठी स्फूर्तिदायक आणि उद्बोधक ठरतील.
-
Propganda (प्रोपगंडा)
आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? सत्य मानत असतो ते सत्यच असते का? की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे? तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते? साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात? हे सारे करणारे असते तरी कोण? अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार! ही कहाणी आहे या सगळ्याची. अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची. आपल्याला वेढून टाकणार्या प्रोपगंडाची. त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट, परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.
-
Bhartiya Udyojika (भारतीय उद्योजिका)
भारतीय उद्योगविश्वात तळपणार्या महत्त्वाकांक्षी स्त्रियांच्या या संघर्षकथा आपल्याला स्तिमित करतात. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अत्युच्च स्थान प्राप्त करणं ही खचितच सोपी गोष्ट नव्हे. अढळ आत्मविश्वास, असामान्य बुद्धिमत्ता, निर्णयकौशल्य, यासोबतच स्त्री म्हणून तोंड द्यावा लागणार्या कौटुंबिक व व्यावसायिक पातळीवरच्या अनंत अडचणींवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या बळावरच या स्त्रियांनी उत्त्तुंग झेप घेतली. कठोर परिश्रम व बांधिलकीच्या जोरावर त्यांनी खाचखळग्यांनी भरलेला स्पर्धेचा काटेरी मार्ग तुडवला आणि त्या यशोशिखरावर विराजमान झाल्या. मल्लिका श्रीनिवासन. राजश्री पॅथी. वंदना लूथरा. प्रीथा रेड्डी. अखिला श्रीनिवासन. अनू आगा. डॉ. अमृता पटेल. इंद्रा नूयी. इंदू जैन. एकता कपूर. कल्पना मोरपारिया. किरण मजूमदार शॉ. चंदा कोचर. जरीना मेहता. जिया मोदी. ज्योती नाईक. तर्जनी वकील. नीलम धवन. नैना लाल किदवई. पिया सिंह. प्रिया पॉल. फाल्गुनी नायर. मीरा सान्याल. मेहर पद्मजी. रंजना कुमार. रितू कुमार. रेणुका रामनाथ. रेणू सूद कर्नाड. ललिता डी. गुप्ते. सुधा नारायण मूर्ती.
-
The Mind Gym Relationships (द माइंड जिम रिलेशनशिप्
माणसामाणसांतील संबंध कसे सुधारावेत, हे सांगणारं पुस्तक आहे ‘द माइंड जिम रिलेशनशिप्स.’ या पुस्तकात एकूण चार विभाग आहेत. ते चार विभाग आणि त्यात चर्चेसाठी घेतलेले मुद्दे असे आहेत – संबंध जुळलेले - या विभागात योग्य मन, तुमची नाडी तपासा, शांत राहणं, संकोचणारा ते चमकणारा. एकत्र येणं - आपण ऐकता का?, आनंदी शाळा, लक्ष द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. कठीण हे प्रेम! -फाइट क्लब, विष काढा, व्यवहार किंवा व्यवहार नाही, त्रास असल्याचा संशय, कठीण शब्द. त्वेगळ्या पद्धतीचे संबंध - चाकोरीबाहेर, कठोर बोलणं, तापदायक माणसं, सन्माननीय सुटका. तसेच या पुस्तकात काही कार्यक्रम आणि ‘ऑनलाइन माइंड जिम’ या संकल्पनेचा अंतर्भाव आहे. संबंध सुधारण्याचं सखोल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
-
Coronachya Krushnachhaye (करोनाच्या कृष्णछायेत)
कोरोनाचा विषाणू बघता बघताएका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला.सगळ्या जगावर हे सावट पसरलं.कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती.बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं.हा विषाणू कुठून आला, कसा पसरला,जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत,भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे –अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारंआणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं,औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानंयाचाही लेखा-जोखा मांडणारं पुस्तक!भविष्यात अशा किती लढायांना माणसाला सामोरं जावं लागू शकेल,कुणास ठाऊक? त्यामुळे या विषयाची सामान्य माणसालासोप्या भाषेत ओळख करून देणं हीच आजची सर्वात मोठी गरज!औषधनिर्मितीच्या क्षेत्रांत जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्याअभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेलीधोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणीकोरोनाच्या कृष्णछायेत….
-
Inshaallah (इन्शाअल्लाह)
दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन.एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली.वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली.जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता.कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का?त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह.
-
Gabhulalelya Chandrabanat (गाभुळलेल्या चंद्रबनात)
बाकेराव एक गुणी तमाशा कलावंत. त्याच्या उतारवयात रंगकली या सोळा-सतरा वर्षाच्या कलावतीचा त्याच्या जीवनात प्रवेश होतो. त्या दोघांच्या एकत्र येण्याने त्यांचं कलाजीवन बहरतं; पण नंतर त्यांच्या नात्याला उतरती कळा लागते. तमाशा कलावंतांची कला आणि त्यांचं जीवन यांच्या एकमेकांत गुंफलेल्या धाग्यांचं वास्तव चित्रण. Tamasha, the traditional Marathi folk theatre was standing on four major pillars- drama, erotic sensual lavani songs and traditional rhythmic music played on percussional instruments like dholki. Along with such social and historical dramas played in the Tamasha mobile theatres in the jamboree of village fairs, the galaxy of many great actors and female artists had also created their own significant lore. Vishwas Patil has interwoven his new novel on that backdrop of mobile Tamasha troops’ heritage and culture. Here, protagonists are Bakerao, who is a great singer, musician and a prolific actor. Beautiful Rangakali is the creator of her own nebula of songs, dances and acting. This is a painful love story between Bakerao and Rangakali’s passion and attraction towards each other’s legendary artistic virtues. Their seperation is unavoidable but their reunion is enchanting, and finally, that purest love marches towards the cobwebs of destiny. A powerful novel written by today’s major Indian novelist on the backdrop of folk songs, drama and culture, will surely enamor the readers and will take them through an entirely new, unknown and captivating world.
-
-
Bhabnagulo (भाबनगुलो)
Taslima nasrin is known for her writing on women's oppression and criticism of religion, despite forced exile and multiple fatwas calling for her death. & in this essays she once again rightly pointed out the various social issues. ‘भाबनागुलो’ अर्थात चिंताच चिंता..समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे संवेदनशील मनात उमटणारे पडसाद या पुस्तकात प्रतिबिंबित होतात. कवीमनाच्या तसलिमा नासरिन नानाविध विषयांवर मुक्त चिंतन करतात. मुल्ला-मौलवीच्या फतव्यांमध्ये घुसमटणारं स्त्रीमन...मूलतत्त्ववादाच्या भोवऱ्यात अडकलेला राष्ट्रवाद...स्थलांतरातली अपरिहार्यता...अशा प्रश्नांची सल तसलिमा नासरिन यांना टोचणी देत br> राहते. त्यातून त्या अंतर्मुख करणारे प्रश्न विचारतात. त्यांच्या या अभिव्यक्तीतून जणू समकालीन वास्तवाचा आरसा आपल्यासमोर उभा ठाकतो. आणि सामाजिक चिंतांकडे अंगुलीनिर्देश करत br> राहतो.