-
Rujwai (रुजवाई)
नकळत्या वयात संजूला हेतुतः दुर्लक्षित करणाऱ्या मानसीची योगायोगाने त्याच्याशी भेट होते आणि जुन्या ‘ऋणानुबंधा’ची जाणीव ठेवत त्याने केलेली पाठराखण तिला स्पर्शून जाते. मुकुंदाची आई ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मुलाला मोठे करते; पण सून आल्यावर या आईवर बेघर होण्याची वेळ येते; मात्र तिचा कसा कायापालट होतो, ते सांगते ‘कायापालट’ ही कथा. ‘नातिचरामि’ कथेतील माधवीने एका कलंदर कलाकाराच्या प्रेमात पडून पस्तीस वर्षे त्याला मनापासून साथ दिली. आयुष्याच्या उतरणीवर त्यानेही खुल्या मनाने त्याचे श्रेय तिला दिले, पण एक अबोध अदृश्य सल तिला सतत खुपत होता... मानवी भावना व नातेसंबंधाच्या मनोहारी अनुबंधाचं मनोज्ञ दर्शन घडविणाऱ्या कथांचा संग्रह ‘रुजवाई’...
-
Madam Butterfly (मदाम बटरफ्लाय)
ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घटी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..
-
Hows That (हाऊज दॅट)
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.
-
Ruk Jaana Nahi (रुक जाना नाही)
ही जीवन गाथा आहे भावेश भाटिया यांची. राष्ट्रपती पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आलेले भावेश भाटिया म्हणजे ‘सनराईज कॅन्डल्स’ या उद्योगाचे संस्थापक. पूर्णत: दृष्टिहीन असूनही त्यांनी निश्चय व मेहनतीच्या बळावर महाबळेश्वरमध्ये एका हातगाडीवर मेणबत्त्यांचा व्यवसाय सुरू केला. आज कोटींत उलाढाल असलेला हा उद्योग हजारो दृष्टिबाधित बंधूभगिनींच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो आहे. नेत्रदिपक व्यावसायिक भरभराटीसोबतच भाटिया यांनी क्रीडा क्षेत्रातही अतुलनीय योगदान देत ‘राष्ट्रीय पॅरालिम्पिक’ व ‘इंडियन ब्लाइन्ड स्पोर्ट्स असोसिएशन’ची एकूण ११४ पदके जिंकली आहेत.
-
Karnalok (कर्णलोक)
‘अनाथ' शब्दाची चीड असलेला बारा-चौदा वर्षांचा एक मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला' नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या' सुखदुःखांशी बांधला जातो... त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं.... तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी...म्हणजेच ‘कर्णलोक.
-
Cocktail Carnival (कॉकटेल कार्निव्हल)
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणाऱ्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
-
Nabhantmani (नभांतमणी)
ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी स्वीकारतो... यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका त्याच्या प्रेमात पडते... धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायऱ्या चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो....धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’
-
No Not Never (नो नॉट नेव्हर)
ही कहाणी आहे वऱ्हाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात. स्वैर, उच्छृंखल मंकी आपल्या अनिर्बंध जगण्यासाठी वेळोवेळी राणीला वेठीस धरते. आणि राणीचं पुण्यातलं जगणं आव्हानांनी भरून जातं. तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी
-
Jalianwala Baug (जालियनवाला बाग)
१३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका क्रांतिवीराची धगधगती कहाणी..सत्यकथेवर आधारित कथाबीज असलेली विलक्षण कादंबरी
-
Atmavanchana (आत्मवंचना)
सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
-
Lady Jallad (लेडी जल्लाद)
जल्लाद...हा शब्दही अंगावर शहारे आणणारा. स्त्रियांच्या नाजूक स्वभावाकडे पाहता हे काम कुणी स्त्री करू शकेल, याबाबत क्वचितच कुणाला विश्वास बसेल. पण बावीस वर्षीय चेतना मुल्लीक वर जल्लाद या वडिलोपार्जित कामाची जबाबदारी येते. आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं नवं वळण घेतं. सामाजिक गृहितकांना धक्का देत वेगळ्या वाटा धुंटाळणारी ही चेतनाची कहाणी अनेक अर्थ्यांनी वाचकांसाठी उत्कंठावर्धक आहे
-
Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha (सांस्कृ
दक्षिण आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरिया या देशांतील निवडक लोककथा या पुस्तकात आहेत. या सर्व देशांत भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपासून प्रसार झालेला आहे. या प्रदेशाला 'बृहत् भारत' असेही म्हणतात किंवा आजच्या भाषेत आपण त्याला 'विस्तारित भारत' असेही म्हणू शकतो. सर्व दक्षिण आशियातील देशांत भारतीय संस्कृती व भारतीय जीवनमूल्यांचा फार खोलवरचा प्रभाव आहे. या सर्व देशांची लोकसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इथे लोककथांचे प्रचंड भांडार उपलब्ध आहे. या पुस्तकात प्रत्येक देशाच्या दहा कथा निवडताना ज्या कथांतून भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडेल अशा कथा निवडल्या आहेत. या कथांतून भावासाठी बलिदान देणारी बहीण, आईची रक्षा करणारा वाघ, एकनिष्ठ पत्नी, एकनिष्ठ पती, कर्तव्यदक्ष राजा, गुंतागुंतीच्या प्रकरणात न्याय करणारा न्यायाधीश, मधाच्या एका थेंबासाठी राज्य कसे गेले, अशा अनेक विषयांवरच्या कथा वाचायला मिळतात. यातील प्रत्येक कथा आपल्याला भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडवील आणि त्या देशांचे आपल्या देशाशी नाते आहे हे लक्षात येईल. यातील कथा या सर्व देशांना भारतीयांशी जैविकरीत्या जोडणाऱ्या आहेत. हे सर्व देश म्हणजे आपल्या संस्कृतीचा विस्तार आहेत.
-
Dr.Babasaheb Ambedkar Anubhav Aani Aathavani (डॉ.
डॉ. आंबेडकरांचे काही इतस्तत: विखुरलेले अनुभव आणि त्यांचे सहकारी व निकटवर्तीय यांच्या आठवणी येथे एकत्र केल्या आहेत. बुद्धिमान, कष्टाळू आणि संवेदनशील अशा डॉ. आंबेडकरांच्या वाटेत पूर्वग्रहांची अभेद्य व चिरेबंद भिंत कशी आडवी आली होती आणि तिने त्यांचे जीवनकार्यच कसे संकटात आणले होते हे वाचकाला येथे दिसेल. समजूतदार आस्थेवाईकपणे टिपलेल्या त्यांच्या सशक्त व चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या खुणा त्याला येथे आढळतील. त्यांचे धवल चरित्र आणि उज्ज्वल यश पाहून प्रशंसेची दाद त्याला द्यावीशी वाटेल. ते त्यांच्या काळातील स लक्षणीय व होते. त्यांचे अल्पज्ञात पैलू, चारित्र्य आणि तत्कालीन गुंतागुंतीच्यी परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकल्यामुळे हा एक अमूल्य ग्रंथ झाला आहे. पुढेही तो तसाच राहील.
-
Kameru (कामेरू)
मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे परिचित आहेत. कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी आपल्या लेखणीतून समर्थपणे उभा केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाङ्मयप्रकारात त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचं एकूण लेखन आहे. घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात. त्यांच्या ‘कामेरू’ या कादंबरीचा विषय कामभावना असला तरी वैविध्यपूर्ण विषय यात येतात. ग्रामजीवनापासून सुरू होणारी ही कथा शहरी जीवनात स्थिरावते. कामवासनांचे, सुखदु:खांचे चित्रण विलक्षणतेने येते. आदिम कामेच्छांचे चित्रण अस्वस्थ करते. अनीतिमानतेवरही प्रकाशझोत टाकते. एकूणच कामभावना आणि त्याभोवती येणारे आदी विषय पेंडसे सूक्ष्मपणे ‘कामेरू’मधून रेखाटतात.
-
Lifestyle (लाईफस्टाईल)
तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी? हे ठरवायचं तुमचं तुम्हीच! तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच, इतर कुणालाही नाही.
-
Love In The Time Of Corona (लव्ह इन द टाइम ऑफ करोन
Neeraja Ganesh Matkari Shreekant Bojevar Hrushikesh Palande Pranav Sakhadev Pravin Dhopat Manaswi Lata Ravindra Paresh Jayshree Manoharएका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill ! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशलडिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल! ८ लिहिते लेखक.... त्यांच्या खास ८ कथा... कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या..... गावाकडच्या ओढीच्या.... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या.... करोनाच्या पार्श्वभूमीवर `प्रेम' ही संकल्पना कवेत घेणाऱ्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना!
-
Saad Ghalto Kalahari (साद घालतो कालाहारी)
This is the story of the Owens' Travel and life in the Kalahari desert. Here they met and studied unique animals and were confronted with danger from drought, fire, storms, and the animals they loved. This best-selling book is for both travellers and animal lovers. ‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता. मध्य कालाहारी कितीही मोठे असले, तरी त्यामध्ये तेथील अस्थिर प्राणिसृष्टीसाठी पे अन्न-पाणी नाही, चरणाऱ्या आणि शिकारी दोन्ही प्राण्यांसाठी! त्या अभयारण्यात एकही कायमस्वरूपी पाणवठ्याची जागा नाही; त्यामुळे पिल्लांची व स्वतःची सुरक्षितता आणि बदलत्या ऋतूमानानुसार कालाहारीतील हायना (तरस), सिंह, हरणे, कोल्हे आणि इतर अनेक प्राणी सतत आपली निवासाची जागा बदलत असतात. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडप्याने आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास केला. यामध्ये या जोडीने दिवसा तसेच रात्री-अपरात्री पा वेळ देऊन अनेक प्राण्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले व अभ्यास केला आणि वेळोवेळी त्याच्या नोंदी केल्या.
-
Teen Mulanche Char Diwas (तीन मुलांचे चार दिवस)
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) - आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव. Three students Adarsh Patil ( 22), Vikas Walke (22) and Shrikrishna Shewale (24) from Pune decided to travel with bicycles in the very remote area of Adiwasi, to understand their life
-
Tatvadnyani Dr.Babasaheb Ambedkar (तत्वज्ञानी डॉ.
यशवंत मनोहर यांनी 'तत्त्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकात बाबासाहेबांचे विश्वपुनर्रचनेचे तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे.