-
Rang Roop Abhangache (रंगरूप अभंगाचे)
‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात संत तुकाराम यांच्या अभंगगाथेतील निवडक अभंगांमधून स्फुरलेल्या चित्रांवरील लेखनाचा ऊहापोह आला आहे. तुकारामांच्या गाथेतील अभंगांची वैशिष्ट्ये, जसे की मनुष्यस्वभावातील बारकावे, वैश्विक जाणीव, निसर्गादि घटकांची मांडणी अशा बाबी ह्या पुस्तकातून जशाच्या तशाच साकारल्या गेल्या आहेत. विशिष्ट अभंग आणि त्यावर स्फुरलेले चित्र यांचा गद्यात्मक स्वरूपाचा लेखाजोखा इथे मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे, ‘तुझे रूप माझे नयनी’ जणू असाच शब्दप्रपंच आहे. तुकारामांच्या अभंगगाथेला अर्पण केलेली आदरांजली आहे
-
Gagan Jeevan Tejomay (गगन जीवन तेजोमय)
छाया महाजन यांनी लिहिलेल्या अनेक ललितलेखांचे संकलन या पुस्तकात आहे. एखादा विषय आणि त्याभोवती गुंफले गेलेले मुक्त चिंतनाचे पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणे, इथपासून ते अगदी कुमारगंधवार्र्ंचे गाणे अशा विविधांगी विषयांनुषंगाने मनात सहजगत्या स्फुरलेल्या विचारांचा हा लेखसंग्रह आहे. आकलनाच्या दृष्टीने अत्यंत सहज, ओघवती भाषा आणि त्यातून आलेली विषय मांडणी हा या पुस्तकाचा विशेष होय. लेखिकेची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणार असल्याने वाचकांचा लेखिकेसोबतचा हा विचारप्रवास निखळ आनंद देणारा ठरतो.
-
Choukat Vatoli (चौकट वाटोळी)
‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती अधोरेखित करते. या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळाची म्हणजेच जागतिकीकरण ऐन उंबरठ्यावर उभे ठाकण्याच्या काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे आज बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.
-
Martin Luther King (मार्टिन लुथर किंग)
वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘निग्रो आणि संविधान’ हा विषय मार्टिनने निवडला होता आणि स्पर्धेत पहिलं बक्षीस पटकावलं होतं. स्पर्धेहून घरी जाताना मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला बसमध्ये बसायला लगेच जागा मिळाली, पण गोर्या प्रवाशांनी बस हळूहळू तुडुंब भरली. पुढच्या थांब्यावर दोन गोरे प्रवासी चढल्यावर त्यांना बसायला जागा नसल्याने कृष्णवर्णीय असलेल्या मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला चालकाने अतिशय उद्धटपणे जागेवरून उठायला सांगितलं. दोघं खूप दमले असल्याने आणि दोघांनीही आधी चढून जागा मिळवल्या असल्याने चालकाचं न ऐकता ते तसेच बसून राहिले. मग चालकाने भडकून त्यांना शिव्या घालायला सुरुवात केली. अखेरीस, त्यांना त्या जागेवरून उठावंच लागलं ! मार्टिनचं संपूर्ण आयुष्य अशा अनेक कडवट प्रसंगांनी भरलेलं होतं; पण त्यामुळे मार्टिन खचला नाही. माणसाच्या रंगावरून त्याचं माणूसपण जोखणार्या व्यवस्थेशी तो शेवटच्या श्वासापर्यंत लढला. त्याच्या प्रखर, पण अहिंसक लढ्याची ताकद सगळ्या जगाने अनुभवली. म्हणूनच मार्टिन लुथर किंग आणि त्याचा ध्येयवेडेपणा आजही प्रेरणा देत राहतात !
-
Rajashri Shahu Chatrapati : Ek Abhayas (राजर्षी श
तसे पाहिले, तर अगदी सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही असंख्य पैलू असतात. मग शाहूंसारख्या क्रियाशील राजाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते, यात आश्चर्य नाही. वसुधा पवार यांनी आपल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून या पैलूंचे दर्शन घडविले आहे. अस्पृश्यतानिवारण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, वसतिगृहांची स्थापना, दुष्काळावर आणि साथीच्या रोगांवर केलेली मात, आरक्षण, मुलींचे शिक्षण, आंतरजातीय विवाहास मान्यता देण्याचा कायदा, फासेपारधी वगैरेंचे पुनर्वसन, जलसंधारण, चहा-कॉफी लागवड इ. प्रकारे सामाजिक जीवनाच्या असंख्य क्षेत्रांमध्ये ‘राजर्षी शाहूंनी’ काळाच्या पुढे पावले टाकली असे दिसते. काळ राजाला घडवतो की राजा काळाला घडवतो, याचे ‘राजा कालस्य कारणम्’ हे प्राचीन काळी देण्यात आलेले उत्तर भारताच्या इतिहासातील ज्या मोजक्या राजांना यथार्थतेने लागू पडते, त्यांमध्ये शाहू महाराजांचे स्थान फार वरचे आहे, यात शंका नाही. वसुधा पवार यांच्या प्रस्तुत पुस्तकातून हे सर्व उत्तम रीतीने व्यक्त झाले आहे.
-
Chatrapati Sambhaji (छत्रपती संभाजी)
"छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, व्रूâर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणारी कागदपत्रं, संशोधकांनी त्याची केलेली चिकित्सा आणि संभाजीराजांचे गुणविशेष अधोरेखित करणारी कागदपत्रं, यांचा सम्यक आढावा घेणारं पुस्तक म्हणजे...‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा.’ संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणाNया विविध ऐतिहासिक साधनांचा आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते. त्याचं कारण काही ऐतिहासिक कागदपत्रांत असं सांगितलं गेलं आहे, की एका ब्राह्मणकन्येवर संभाजीराजे फिदा झाले होते. तिच्याशी त्यांचे अनैतिक संबंध होते. शिवाजी महाराजांना हे समजल्यावर ते संतापले. आता ते आपल्याला कडक शिक्षा देतील असं संभाजीराजांना वाटलं. म्हणून ते मोगलांना जाऊन मिळाले. काहींच्या मते रायगडावर हळदी-वुंâकवासाठी आलेल्या एका ब्राह्मण युवतीवर संभाजीराजांनी बलात्कार केला. त्याबद्दल शिवाजी महाराज त्यांना कडक शासन करतील या भीतीने ते मोगलांना जाऊन मिळाले. आपली चूक उमगल्यावर ते स्वराज्यात परत आले. त्यांची आणि शिवाजी महाराजांची दिलजमाई झाली; पण संभाजीराजे मोगलांकडून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या भेटीचंही काही इतिहासकारांनी विपर्यस्त वर्णन केलं. त्यानंतर थोड्याच अवधीत शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजीराजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला, असाही एक आरोप संभाजीराजांवर केला गेलेला काही कागदपत्रांत आढळतो."
-
Shivachatrapati (शिवछत्रपती)
"राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.. वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?...... शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?... ‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत. "
-
Rajarshi Shahu Chatrapati : Ek Magova (राजर्षी शाह
राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनकार्यावरील हा लेखसंग्रह आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत पाक्षिक लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, दै. पुढारी, दै. सकाळ इत्यादी विविध नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेले लेख आहेत. याशिवाय दोन लेख कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर केलेले ‘शोधनिबंध’ आहेत. ‘ब्राह्मण ब्युरॉक्रसी’ व ‘क्षात्रजगद्गुरू’ या विषयांवरील लेख २००१ मध्ये आम्ही प्रकाशित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’या ग्रंथातून घेतले आहेत. अखिल भारतीयांचा उद्धार करण्याचे व्रत घेतलेल्या या थोर पुरुषाचा तत्कालीन वरिष्ठ वर्णीयांच्या इंग्रजांविरुद्ध चालविलेल्या स्वराज्याच्या हक्काच्या चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन काय होता, हे त्यावरून समजून येते. राजर्षी शाहू छत्रपतींचा लढा अशा दुसऱ्याला स्वातंत्र्याचे हक्क नाकारणा ऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांविरुद्ध होता. इंग्रजांकडून राजकीय स्वातंत्र्याचे हक्क मागणारे लोक आपल्याच देशातील आपल्याच बांधवांना सामाजिक स्वातंत्र्याचे, सामाजिक न्यायाचे हक्क नाकारत होते. इतिहासाचे विकृतीकरण करणा ऱ्याना सत्येतिहासाचे सादरीकरण करूनच उत्तर देणे, हा सुसंस्कृत समाजाचा राजमार्ग मानला जातो. प्रस्तुत संग्रहातील कोल्हापूर गॅझेटिअरवरील लेख या मार्गावरील लेखकाच्या मतानुसार केलेली वाटचालच आहे.
-
Dr. Anand Yadav -Ek Sahityik Pravas (डॉ. आनंद यादव
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली. असे असले तरी स्वतःत न रमता, त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले; ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही सामाजिक बांधिलकी मोठी आहे. ‘कलावंत केवळ स्वतःत रमणारा असतो,’ या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकरऱ्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मतं देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले. वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे; परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले. यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. त्यांच्या दृष्टीने धरला. स्वतःच्या कथा, कविता, कादंबऱ्यामधून त्यांनी बोली भाषेतून निवेदन व संवादलेखन केले. स्वतंत्र लेख लिहून त्यांनी बोली भाषेचे सामथ्र्य जाणकारांच्या लक्षात आणून दिले. यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त झाले. अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरुवात केली. आजही ही परंपरा सुरू आहे. ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ’ सुरू करून यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले. विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाङ्मयीन दृष्टी प्राप्त करून दिली.
-
My Daughter My Mother (माय डॉटर माय मदर)
"१९८४ साली एका शिशु खेळगटात दोन आया एकमेकींना भेटतात. त्यांची मैत्री वाढत जाते आणि त्या आपलं आयुष्य एकमेकींसोबत वाटून घेतात– अगदी सगळ्या रहस्यांसकट. जोआन – गोड, लाजरी मुलगी जिला दिवसेंदिवस स्वत:च्या नवऱ्याची भीती वाटते आहे. तिने ज्याच्यावर प्रेम करून लग्न केलं तो देखणा, हसतमुख तरुण हिंसक, विरोधात जाणारा का होतो आहे; हे तिला उमजेनासं झालं होतं. हे इतर कुणालाही सांगायची तिला लाज वाटत होती. जोआनची आई – मार्गारेट –हिला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. तेव्हा प्रथमच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे कळलं की, आपल्या आईच्या आयुष्यात असं बरंच काही घडून गेलंय, ज्याची आपल्याला सुतराम कल्पना नाही. मार्गारेटला युद्धकाळात सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं होतं आणि तिने आपलं उभं आयुष्य त्या आठवणी गाडून टाकण्यात घालवलं. सुकी – जिने एका लग्नाचा भयाण अनुभव घेतला असून, सध्या स्वत:च्या माहेरी राहते आहे. अशा रीतीने ‘बदनाम’ होणं सोपं नव्हतं. तिच्या आईने – मीनीने – तिच्याबरोबर अबोला धरला आहे. सुरुवातीला हा अबोला सुकीला न केलेल्या गुन्ह्याची अन्याय्य शिक्षा वाटत होता. पण हळूहळू तिला कळत गेलं की, तिच्या आईच्या मनात खूप विचित्र गुंतागुंत आहे. हा अबोला फक्त वरवरचा आहे आणि तिच्या आईला तिची – तिच्या मुलीची – नितांत गरज आहे. ही गोष्ट आहे दोन अस्वस्थ, तरुण मुलींची ज्यांना अपघातानेच आपापल्या आयांच्या आयुष्यातील हृदयद्रावक सत्यं समजतात. आई मुलीला कसं घडवते आणि मुलीकडून जगणं कसं शिकते, याची सुंदर गोष्ट! भूतकाळात अडकलेल्या आया आणि वर्तमानाला आव्हान देऊन भविष्य घडवू पाहणाऱ्या त्यांच्या तरुण मुलींची कहाणी! "
-
Tinka Tinka Tihar (तिनका तिनका तिहार)
महिला कैद्यांच्या मनातल्या अगतिकतेचं मनोबलात रूपांतर करण्याच्या भावनेला मूर्त रूप देण्याचंच फलित म्हणजे हे पुस्तक. तिहारमधील बंदी महिलांनी आपली व्यथा मांडणाऱ्या, आयुष्य सावरण्याची स्वप्नं पाहणाऱ्या काही भावना आपल्या कवितांतून व्यक्त केल्या आहेत.
-
Samudrakathache Ek Varsh (समुद्राकाठाचे एक वर्ष)
‘अ इयर बाय द सी’ ही कथा आहे लेखिका जोआन आणि तिचा पती यांच्या नात्याची. विरत चाललेलं पती-पत्नीमधील नातं एका अशा वळणावर येतं की, जिथं या नात्याची सांगता होऊ शकेल. त्या वेळी लेखिका जोआन निर्णय घेते तो घटस्फोट न घेता वेगळं राहण्याचा. थोडक्यात, या नात्यात एक ‘ब्रेक’ घेण्याचं ती ठरवते. नवरा नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या शहरात जाऊन स्थायिक होतो. त्या वेळी जोआन मात्र केपकॉर्ड या आपल्या मूळ गावी राहायला येते. जुन्या आठवणी मनात उजळत असतानाच तिची तिथल्या कोळ्यांशी मैत्री होते. समुद्रकाठी वसलेलं हे गाव निसर्गसौंदर्यानं नटलेलं असतं. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं ती आपली लेखिका म्हणून असणारी प्रतिष्ठा विसरून ‘क्लॅम्प्स’ पकडण्याचे काम करू लागते. ‘जोआन एरिकसन’ नावाची एक मैत्रीणही तिला याच दरम्यान भेटते. त्या ठिकाणी तिला आपले वेगळं विश्व तयार झालं आहे आणि ते आपलं हक्काचं आहे, असं वाटू लागतं. ती या विश्वात आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधू लागते. आपल्या दबलेल्या इच्छा- पुन्हा एकवार बालपण जगण्याची तिची ऊर्मी- उफाळून येते. याच दरम्यान ती आपल्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघू लागते. पती-पत्नीच्या नात्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. या वर्षभराच्या ‘ब्रेक’मध्ये तिला अनेक अनुभव येतात. हळूहळू पती-पत्नी दोघांनाही आपण काय हरवलं आहे किंवा आपल्याला नव्यानं काय गवसलं आहे, याचा गांभीर्यानं विचार करू लागतात. एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून आपल्या ‘एकटेपणा’तली मजा उपभोगताना तिला आपल्या नवऱ्याविषयी असणाऱ्या भावना समजतात. पती-पत्नीचे काही काळानं गुळगुळीत, यांत्रिक होणारं नातं एखादा ‘ब्रेक’ घेऊन नव्या दमानं सुरू करण्यात असणारी मजा ही कथा सांगते.
-
Matiche Mama Avaghe Jivan (मातीचे मम अवघे जीवन)
‘द डर्टी लाइफ’ कथा आहे मुक्त पत्रकार असणारी क्रिस्टीन आणि शेतकरी मार्क यांची. शहरी जीवनात रमणारी क्रिस्टीन शेतकरी मार्कची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने त्याच्या गावी जाते. हाडाचा शेतकरी असणाऱ्या मार्कचे रांगडे रूप तिला आवडते. केवळ गंमत म्हणून शिकार न करता आपल्या पिकांचे संरक्षण व अन्न मिळवण्यासाठी शिकार करणारा मार्क तिला प्रभावित करतो. मार्कबरोबर शेतावर राहण्यात, त्याच्या कृषिकार्यात मदत करण्यात तिला आनंद वाटू लागतो. शाकाहारी असूनही मार्कने बनविलेले मांसाहारी पदार्थ तिला चविष्ट वाटू लागतात. मार्कच्या गोठ्यातील डुकरं, कोंबड्या, गाई, घोडे व त्यांच्याशी संबंधित माहितीतही तिला रस वाटू लागतो. मार्क आणि क्रिस्टीन यांच्यातील प्रेम हळूहळू फुलू लागतं. मार्कलाही क्रिस्टीन आवडू लागते. विवाह ठरल्यानंतरचा बराच काळ ते एके ठिकाणी पडीक शेत कराराने घेऊन ते फुलवण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. हळूहळू क्रिस्टीन शेतीसंबंधित सर्व कामे शिकून करू लागते. खरंतर कृषिकर्मांची सवय नसतानाही क्रिस्टीन तिच्या मनातील शहरातील सुखसोयीयुक्त जीवनाचे विचार दूर सारून मार्कच्या प्रेमाखातर त्याच्या बरोबरीने शेतावर कष्ट करते. दोघांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असणारी क्रिस्टीन शेत, पाळीव प्राणी, त्यांचं जीवन याविषयी खूप अनुभव घेते. शहरी जीवनात ज्या गोष्टींपासून ती अनभिज्ञ होती, अशा सर्वच गोष्टी तिला फार जवळून अनुभवायला मिळतात. शेतीकाम करताना करावे लागणारे कष्ट, येणाऱ्या अडचणी यामुळे काही वेळा खचणारी क्रिस्टीन हळूहळू शेतीलाच आपलं सर्वस्व मानू लागते. विवाहानंतर एकमेकांच्या मदतीनं ते आपल्या शेतवाडीला खूपच समृद्ध करतात आणि शहरात वाढलेल्या क्रिस्टीनचे कष्टांनी ‘अवघे जीवन मातीचे’ होऊन जाते.
-
Avani Ek Navi (अवनी एक नवी)
एकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत याची त्याला जाणीव होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागतं. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचं त्यांना भान नसतं. ज्यांना हे भान असतं त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. बुद्ध, जीझस आणि अन्य अनाम आत्मे मनुष्य चेतनेच्या बहराची उमलण्याची साक्ष आहेत. त्यांनी मनुष्यजातीला दिलेल्या संदेशांचे आज विकृतीकरण झाले आहे. मनुष्यजातीची मनोरचना यांत्रिक झाली आहे. तिच्या जडतेतून चैतन्याचा प्रकाश आरपार जाऊन ती पारदर्शक होईल का? नाम, रूप, व्यक्तिमत्त्व, अहं यांच्या पिंजऱ्यातून ती मुक्त होईल का? या आंतरिक परिवर्तनाची गती कशी वाढवता येईल? अहं केंद्रित अशा चेतनेच्या प्राचीन काळापासून असलेल्या स्थितीला कसं ओळखायचं? नव्याने उदित होत असलेल्या मुक्त चेतनेची तरी खूण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सृष्टिविकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणं आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.