-
Niragastecha Najarana (निरागसतेचा नजराणा)
बालकांच्या मनोविश्वातील स्वर्गीय रंगांची दुनिया कलावंत किती संवेदनशीलतेने... तरलतेने आपल्यासमोर खुली करतात. बालमनाची निरागसता केवळ मौनातून, मंद-स्मितातून बोलती करतात. बालकांचे निरभ्र... नितळ... निर्मळ मन... जाती, धर्म, देश, रंग, रूप यांच्या सीमा पार करून आपल्याशी संवाद साधतं. कोमेजलेल्या मनाला पुलकित करण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यांचं रूपडंच मुळात आरस्पानी! त्यांच्या पारदर्शीपणात आपण आपलं प्रतिबिंब पहावं... आणि आपणच लख्ख होऊन जावं !!
-
Ranbhuliche Pradesh (रानभुलीचे प्रदेश)
विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी लिहिलेलं 'रानभुलीचे प्रदेश' हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. यामध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या अनेक रचनांविषयी अतिशय रसाळ पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्या रचनांचं संगीत आणि काव्य आणि त्या रचनांमध्ये किस्से, त्यातल्या संगीतामधले बारकावे हे अतिशय छान पद्धतीनं उलगडून सांगितलेलं आहे.
-
Shubhparva (शुभपर्व)
रघुकुलातील, आमच्या घरातील, पहिले अपत्य, माझी सर्वात मोठी चुलत बहीण शुभदा. जिच्या आगमनाने आमच्या घराची भरभराट सुरू झाली. बाबाकाकांच्या कष्टाने लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली आणि ताईच्या विद्वत्तेला सरस्वतीचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. शालेय जीवनापासून ताईच्या यशाची कमान उंचावत गेली. टिळकनगर विद्यामंदिरातील आदर्श विद्यार्थिनी, रुईयामध्ये तत्त्वज्ञान विषयात सुवर्णपदक विजेती झाली. मुंबई विद्यापीठामध्ये शुभाताई रुजू झाली आणि दोन-तीन वर्षांपूर्वीच सुरू झालेल्या तत्त्वज्ञान विभागाच्या अंकात्मक आणि गुणात्मक विकासामध्ये विभाग प्रमुख म्हणून तिने मोलाचे योगदान दिले. तिने तत्त्वज्ञान विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवले. संपूर्ण आयुष्य तत्त्वज्ञान या विषयासाठी काम करत राहावे आणि तेच तत्त्वज्ञान जगण्याचा एक भाग होऊन जावे, असे हे 'शुभ पर्व' !
-
Jina Shoshitanchan (जिणं शोषितांचं)
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली. त्याचा उत्सवही दिमाखात झाला. परंतु गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक-आर्थिक न्यायाची गाडी पुढे सरकली का हा प्रश्न उरतोच. नेमक्या याच प्रश्नाला थेट भिडणारं हे पुस्तक आहे. ज्यावेळी एखादा आयएएस अधिकारी ‘मला या शहरात एकही झोपडी नको` असं म्हणतो तेव्हा या लेखिकेची होणारी तगमग काळजाला हात घालते. बलात्कार, बाललैंगिक शोषण, आरोग्याविषयीचे प्रश्न, मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक खच्चीकरण अशा प्रश्नांवर जमिनीवर लढतानाचे सजग प्रसंग विलक्षण अस्वस्थ करून जातात. गेल्या साडेतीन दशकांत वृषाली मगदूम यांनी शोषितांच्या प्रश्नाला हात घालत ते धसास लावताना आलेले अनुभव दाहक आहेत, म्हणूनच ते वेधक ठरतात. आपल्याबरोबरच पण आडबाजूला जगणाऱ्या एका समुदायाच्या शोषणाची, हतबलतेची, संघर्षाची ही जिवंत चित्रे तर बोलतातच, पण राज्यकर्ते, प्रशासन आणि समाजाच्या तळातली माणसे यांच्यातले वाढत जाणारे अंतर विदीर्ण करणारे आहे. अशा परिस्थितीत लेखिकेचा हात त्या अंधाऱ्या विश्वाला आश्वासक वाटतो, हे खरे आहे
-
Charles Darwin (चार्ल्स डार्विन)
डार्विन या शास्त्रज्ञाच्या आठवणीचा कोलाज असं या आत्मचरित्राच्या अनुवादाचं वर्णन करता येईल. एका थोर वैज्ञानिकाचं जगणं सर्वसामान्य जनतेसमोर त्याच्याच शब्दांतून मांडण्याचा हा अनुवादी प्रयत्न निःसंशय कौतुकास्पद आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक याविषयी आपल्या समाजातील उदासीनता दूर करण्यासाठी अशाप्रकारच्या वेधक शैलीतील लिखाणाची आज खरोखरच गरज आहे. एका वैज्ञानिकाच्या आत्मचरित्राच्या निमित्तानं वैज्ञानिकाचं अंतरंग, त्याची मानसशास्त्रीय जडणघडण, विज्ञान क्षेत्रातील त्याचा सर्जनशील प्रवास याला भिडणारं असं हे पुस्तक आहे
-
Rajdhurandar Tararani (राजधुरंधर ताराराणी)
सर्व इतिहाथ सत्याला साक्षी ठेवून आमचे मित्र श्री. राजेंद्र घाडगे यांनी प्रस्तुतच्या त्यांच्या ताराबाई चरित्रात साधेत मांडला आहे. त्यांची कथनशैली ओघवती व स्वर्षस्पष्ट आहे. ज्या विषयावर लेखन करायचे आहे, तो विषय पूर्णपणे आत्मसात करूनच त्यास हात घालायचा, ही त्यांची लेखनपद्धती आहे, ताराबाई चरित्रासाठी त्यांनी त्या काळाशी संबंधित असणारे सर्व सिद्ध व साधन ग्रंथ यांचे काळजीपूर्वक वाचन, चिंतन व संशोधन केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. २०-२२ वर्षांपूर्वी जेव्हा माझी व त्यांची पहिली भेट साताऱ्यात झाली, तेव्हा ते 'कवी' होते. मी त्यांना इतिहास-पंढरीची वाट धरावयास लावली. त्यांनी त्या वाटेवरून जात राजर्षी शाहू छत्रपती, शहाजीराजे भोसले या इतिहासातील नायकांवर चरित्रग्रंथ लिहिले आहेत. प्रस्तुतचा ताराबाईसाहेबांवरील हा चरित्रग्रंथ त्यांच्या अभ्यासाची साक्ष देत इतिहासप्रेमी वाचकांच्या दर्शनास येत आहे. त्याचे स्वागत महाराष्ट्रात खात्रीनेच होईल, अशी माझी आशा आहे.