-
Statistics Sankhyashastra (स्टॅटिस्टिक्स संख्याशास
पुराणकाळापासून स्टॅटिस्टिक्स रोजच्या व्यवहारात कळत-नकळतपणे वापरलं जात आहे. आजच्या डेटा सायन्सच्या काळात तर त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स हा डेटा सायन्सचा आत्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण कॉम्प्युटरवर काम होत असलं तरी मूळ संकल्पना स्टॅटिस्टिक्समधल्याच असतात. स्टॅटिस्टिक्सचा आपण जगत असलेल्या विश्वाशी, माणसांशी घनिष्ठ संबंध असतो. कारण यात लागणारा डेटा हे विश्व, त्यातली माणसं आणि त्यांची माहिती याविषयीचा असतो. अशा डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातले परस्परसंबंध कसे ओळखायचे हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये येतं. आर्टिफिशियल इंटेलिजंसमधलं जे मशीन लर्निंग आहे, त्यात मोठा डेटाच इनपुट म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे त्यातही स्टॅटिस्टिक्स लागतंच. स्टॅटिस्टिक्सला आजचं स्वरूप कसं प्राप्त झालं, त्याचा इतिहास, त्यातल्या संशोधकांचे संघर्ष, त्यांच्यातले वादविवाद, तसंच प्रॉबॅबिलिटी ही संकल्पना जुगारातून कशी निर्माण झाली, तिच्या विकासाचे टप्पे हे सगळं मनोरंजक पद्धतीनं यात लिहिलं आहे. कोणत्याही क्षेत्रात स्टॅटिस्टिक्स वापरायचं असेल, तर त्यातली मूलतत्त्वं समजली पाहिजेत. इथे ती सोप्या पद्धतीनं सांगितली आहेत. त्यामुळे फक्त स्टॅटिस्टिक्सचेच नव्हे, तर इतर विषयाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. नोकरी व्यवसायात स्टॅटिस्टिक्स किती महत्त्वाचं आहे, याचं भान विद्यार्थी आणि पालकांना यावं याची काळजी या पुस्तकात घेतली आहे. तांत्रिक गोष्टी आवश्यक तेवढ्याच घेऊन सोपेपणा आणि रंजकतेला प्राधान्य दिलं आहे. तसंच स्टॅटिस्टिक्सची भीती कमी होऊन कुतूहल वाढावं या उद्देशानं हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लोकांनी कादंबरीसारखं वाचावं.
-
Hey Ram Gandhi Hatyakandacha Pramanik Dhandola (हे
गांधीहत्येचे सत्य केवळ इतकेच नव्हे की, ३० जानेवारी १९४८ दिनी संध्याकाळी गोडसेने बिर्ला भवनात येऊन गांधींवर तीन गोळ्या झाडल्या. किंबहुना, गांधीहत्येला पूर्णपणे समजून घेण्यासाठी, त्याच्या पार्श्वभूमीचा वस्तुस्थितीदर्शक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकात गांधीहत्येशी संबंधित संपूर्ण कालखंडाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा, मुस्लिम लीगकडून पाकिस्तानची मागणी, जातीय दंगली, देशाची विनाशकारी फाळणी, लुटलेल्या निर्वासितांची समस्या, मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक, पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा गांधींचा हट्ट, बहुसंख्या हिंदूंच्या मनात निर्माण झालेली उपेक्षेची भावना आणि क्षोभ! सत्ता आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वात पडलेली फूट ... अशा अनेक कारणांनी गांधीहत्येची पार्श्वभूमी आधीच तयार झाली होती. गोडसेने झाडलेल्या तीन गोळ्यांप्रमाणे हे सर्व मुद्दे सुद्धा गांधीहत्येला तितकेच जबाबदार आहेत. पण दुर्दैवाने गांधी हत्येची चर्चा होते तेव्हा या मुद्द्यांवर मौन पाळले जाते. ‘माझ्या मृतदेहावर पाकिस्तान बनेल’ असे म्हणणाऱ्या गांधींनी आमरण उपोषण का केले नाही, फाळणीविरुद्ध कोणतेही आंदोलन का केले नाही, या मुद्द्यावर कधीच गंभीर चर्चा होत नाही? कटाच्या तळापर्यंत जाण्यासाठी सदर पुस्तकाच्या लेखकाने हजारो पानांचा पोलीस तपास अहवाल, केस डायरी, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण न्यायालयीन कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला आहे. एकंदरीत, प्रमाणित इतिहासलेखनाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिले तर लेखक प्रखर श्रीवास्तव यांनी प्राथमिक स्रोतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने आणि समंजसपणाने केल्याचे जाणवते.
-
Athak (अथक)
पुनर्वसन केंद्रातील अपंग जवानांच्या वास्तव कहाण्यांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली कादंबरी आहे ‘अथक.’ कर्नल मुखर्जी या पुनर्वसन केंद्राचे प्रमुख आहेत. नायक सुरेश कार्की यांचं छातीपासून खालचं शरीर एका अपघातामुळे लुळं झालं. पुण्यातील खडकीच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल झाले. आता त्यांनी बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य प्राप्त करून जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. मृदुल घोष हा जवान विमानांची देखभाल-दुरुस्ती करणारा. अपघातात त्याचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडलं; पण आता तो तोंडात ब्रश घेऊन उत्तम चित्र काढतो. अशा आणखी काही जवानांच्या कहाण्या यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेफाली आणि क्षितिज हे तरुण-तरुणी सर्वसामान्य अपंगांसाठी कन्नू मेहता सेंटर सुरू करतात. जवानांच्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य अपंगासाठी सेंटर सुरू करणार्या शेफाली आणि क्षितिजची ही प्रेरणादायक कहाणी.
-
Maharani Bayajabai Shinde (महाराणी बायजाबाई शिंदे)
बायजाबाई शिंदे यांचा हा जीवनपट आहे. घाटगे घराणं हे त्यांचं माहेर. स्वातंत्र्याचा व शौर्याचा वारसा त्यांना आपले पिता सर्जेराव घाटगे यांच्याकडूनच मिळाला. त्या सौंदर्यवती होत्या. त्यांचा विवाह महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर राज्यकारभारात, युद्धात बायजाबाईंचा सहभाग असायचा. पतीच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास त्यांनी सुरुवात केली; त्यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी व्यवसाय, व्यापार वाढवून आपली राज्यातील तिजोरी, कोषागार समृद्ध केले. सैन्याची चोख व्यवस्था करून आपल्या राज्यातील पेंढारी व ठग लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याचा प्रयत्न केला. जनकोजी या त्यांच्या दत्तक पुत्रामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. त्यांचे नातू जयाजीराव शिंदे यांनी मात्र बायजाबाई साहेबांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप जपले. भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून लौकिक मिळवणार्या बायजाबाई यांचा प्रेरक जीवनप्रवास.
-
Indias Railwayman (इंडियाज रेल्वेमॅन)
भारताचे रेल्वेमॅन डॉ.श्रीधरन यांचं हे चरित्र आहे. त्यांचं बालपणीचं जीवन, त्यांची बहीण-भावंडं, त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचं विवाहोत्तर कुटुंब, रेल्वेतील नोकरी, पाम्बनच्या पुलाचं काम, जहाजबांधणीच्या कामाच्या वेळचा अनुभव, निवृत्तीनंतर कोकण रेल्वेच्या कामाची आलेली जबाबदारी, कोकण रेल्वेचं काम करताना अध्यक्ष असूनही मिळणारं नियमबाह्य वेतन, त्यासाठी त्यांना द्यावा लागलेला लढा आणि त्यांचा झालेला विजय, कोलकाता मेट्रोचं काम, भारतात मेट्रो सुरू करण्याचं श्रेय, चेन्नई आणि मुंबईत केलेली कामं, दिल्ली मेट्रोचं आव्हानात्मक काम, त्या कामादरम्यान झालेला अपघात, राजीनाम्याची केलेली घोषणा आणि नंतर मागे घेतला राजीनामा, त्या कामाच्या दरम्यान आलेला हृदयविकाराचा झटका, मेट्रो रेल कायदा, ब्रॉड गेज-स्टॅन्डर्ड गेज वाद, त्यांच्यावर झालेली टीका आणि त्याला श्रीधरन यांनी दिलेली उत्तरं इ. बाबींवर आणि त्यांच्या शिस्तप्रियता, कार्यतत्परता, ऋजुता इ. गुणांवर या चरित्रातून प्रकाश पडतो. यशस्वी व्यक्तिमत्त्वाचं प्रेरणादायक चरित्र.
-
The Hidden Hindu Part 1 (द हिडन हिंदू भाग १ )
"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.
-
Nisargaputra (निसर्गपुत्र)
‘निसर्गपुत्र’ ही अॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.