-
Mala N Kalalele Baba (मला (न) कळलेले बाबा)
मी व बाबा चोवीस तास सहवासात असे. निदान हजार दिवस तरी असतील. दोन्ही भारत जोडो यात्रा, कसरावदचे दोन महिन्यांचे दोन-तीन मुक्काम, दिल्ली-बेळगाव-कलकत्त्याचा प्रवास, मुंबई इथली बाबांची शस्त्रक्रिया व शेवटी बाबा रक्ताच्या कर्करोगानं आजारी असतानाचे सहा महिने, मी बाबांचा निकट सहवास अनुभवला, तरीही मला बाबा दोन टक्केही समजले नाहीत. बाबा कसे होते, याचा प्रत्येक वेळी वेगळा भास होत असे. नक्की कसे ते ठरवता येत नाही. कदाचित माझ्या सामान्य बुद्धी-क्षमतेनं असेल, बाबांच्या जवळपास राहण्यासाठी येणारे पाहुणे, भक्तगण आम्हाला बाबांची माणसं म्हणून ओळखत. त्यात त्यांचा मोठेपणा होता. तरी बाबांच्या सोबतच्या शेकडो आठवणी आहेत, त्या लिहाव्या का? त्या लोक वाचतील का? माझ्या आयुष्यातली बत्तीस वर्षं मी ह्या मोठ्या, खर्या माणसासोबत घालवली आहेत. मी बाबांना प्रथम भेटलो तेव्हा 31 वर्षांचा होतो. भारावून जाण्याचं वय नव्हतं. मी बाबांकडे कसा आलो? का आलो? ह्याला अनेक कारणं आहेत. ती पुढे कुठं तरी येतील. पण इतक्या वर्षांनंतर नक्की कोणतं कारण हे सांगता येणार नाही. माझ्यासमोर गेल्या तीस वर्षांत अनेक कार्यकर्ते गेले. मी का राहिलो हेही सांगता येणार नाही, कारण बाबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रचंड भोवर्यात मी अनेकसांसारखा गरगर फिरत राहिलो आहे.
-
Vyavasthapanatil Kathakali (व्यवस्थापनातील कथाकली)
व्यवस्थापनावर चटकदार लेखन असू शकते हे पटायला श्री नारायण जोगळेकर ह्यांचे "व्यवस्थापनातील कथाकली" हे पुस्तक वाचावे. हातात धरले कि पूर्णपणे वाचून झाल्याशिवाय ठेववत नाही. अगदी गृहिणींपासून ते एम.बी.ए. विद्यार्थी, प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी आणि कार्खान्दारांपर्यंत सर्वांनाच जोगळेकरांची शैली वेधक वाटावी. एस.एस.सी. ला बोर्डात चवथा नंबर , आय.आय.टी. पदवीधर , वीस वर्षे प्रत्यक्ष शॉप फ्लोरचा अनुभव, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य, अपंग पुनर्वसन संस्थेचे डायरेक्टर, उत्पादकता सल्लागार अशा रीतीने चौफेर क्षेत्र विस्तार्तांनाच त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया , टाटा प्रेस , सकाळ, महाराष्ट्र टाईम्स मधील विपुल लेखनाने त्याचा प्रत्यय, लाभ वाचकांना दिला आहे. छोट्या मोठ्या प्रत्यक्ष घटना, किस्से, केस स्टडी ह्यांबरोबरच स्वतः काढलेल्या रेखाचीत्रांचीही त्यांनी मुबलक पखरण केली आहे. सर्वांनी मजेत वाचायचे असे पुस्तक.
-
Lokarhati (लोकरहाटी)
आईने बालपणी माझ्यात रुजवलेलं अनागर संस्कृतीचं बीज माझ्या आत कधी फोफावलं ते कळलंच नाही. मग केवळ माझं खेडेगावच नाही, पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भटकताना प्रत्येक ठिकाणची अनागर संस्कृती खुणावत राहिली. ठिकठिकाणची माणसं, तळी, मंदिरं, रस्त्यात पडलेले दगडगोटे, जुन्या वास्तू, चालीरीती... एवढंच नव्हे, गावोगावच्या खाद्यसंस्कृतीचं वेडही यातूनच लागलं. एकदा पायाला माती लागली की त्या मातीतलं सारं आपलंसं वाटतं; असंच काहीसं झालं. मातीतून उगवणार्या झाडा-झुडपांपासून ते त्या मातीतल्या गाण्याबजावण्यापर्यंत सारंच ‘माझं’ झालं. आता ही अनागर संस्कृती आणि ही संस्कृती स्वत:त नांदवणारी-खेळवणारी लोकरहाटी माझ्यात भिनलीय. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञान संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेऊ पाहत असताना, माझ्यावरचं अनागर, म्हणजेच ग्रामीण संस्कृतीचं गारुड मात्र कायम आहे. या गारुडाचा उत्तम दाखला म्हणजे हे ‘लोकरहाटी’ पुस्तक!