-
Statistics Sankhyashastra (स्टॅटिस्टिक्स संख्याशास
पुराणकाळापासून स्टॅटिस्टिक्स रोजच्या व्यवहारात कळत-नकळतपणे वापरलं जात आहे. आजच्या डेटा सायन्सच्या काळात तर त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स हा डेटा सायन्सचा आत्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण कॉम्प्युटरवर काम होत असलं तरी मूळ संकल्पना स्टॅटिस्टिक्समधल्याच असतात. स्टॅटिस्टिक्सचा आपण जगत असलेल्या विश्वाशी, माणसांशी घनिष्ठ संबंध असतो. कारण यात लागणारा डेटा हे विश्व, त्यातली माणसं आणि त्यांची माहिती याविषयीचा असतो. अशा डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातले परस्परसंबंध कसे ओळखायचे हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये येतं. आर्टिफिशियल इंटेलिजंसमधलं जे मशीन लर्निंग आहे, त्यात मोठा डेटाच इनपुट म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे त्यातही स्टॅटिस्टिक्स लागतंच. स्टॅटिस्टिक्सला आजचं स्वरूप कसं प्राप्त झालं, त्याचा इतिहास, त्यातल्या संशोधकांचे संघर्ष, त्यांच्यातले वादविवाद, तसंच प्रॉबॅबिलिटी ही संकल्पना जुगारातून कशी निर्माण झाली, तिच्या विकासाचे टप्पे हे सगळं मनोरंजक पद्धतीनं यात लिहिलं आहे. कोणत्याही क्षेत्रात स्टॅटिस्टिक्स वापरायचं असेल, तर त्यातली मूलतत्त्वं समजली पाहिजेत. इथे ती सोप्या पद्धतीनं सांगितली आहेत. त्यामुळे फक्त स्टॅटिस्टिक्सचेच नव्हे, तर इतर विषयाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. नोकरी व्यवसायात स्टॅटिस्टिक्स किती महत्त्वाचं आहे, याचं भान विद्यार्थी आणि पालकांना यावं याची काळजी या पुस्तकात घेतली आहे. तांत्रिक गोष्टी आवश्यक तेवढ्याच घेऊन सोपेपणा आणि रंजकतेला प्राधान्य दिलं आहे. तसंच स्टॅटिस्टिक्सची भीती कमी होऊन कुतूहल वाढावं या उद्देशानं हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लोकांनी कादंबरीसारखं वाचावं.
-
Hey Ram Gandhi Hatyakandacha Pramanik Dhandola (हे
गांधीहत्येचे सत्य केवळ इतकेच नव्हे की, ३० जानेवारी १९४८ दिनी संध्याकाळी गोडसेने बिर्ला भवनात येऊन गांधींवर तीन गोळ्या झाडल्या. किंबहुना, गांधीहत्येला पूर्णपणे समजून घेण्यासाठी, त्याच्या पार्श्वभूमीचा वस्तुस्थितीदर्शक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकात गांधीहत्येशी संबंधित संपूर्ण कालखंडाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा, मुस्लिम लीगकडून पाकिस्तानची मागणी, जातीय दंगली, देशाची विनाशकारी फाळणी, लुटलेल्या निर्वासितांची समस्या, मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक, पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा गांधींचा हट्ट, बहुसंख्या हिंदूंच्या मनात निर्माण झालेली उपेक्षेची भावना आणि क्षोभ! सत्ता आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वात पडलेली फूट ... अशा अनेक कारणांनी गांधीहत्येची पार्श्वभूमी आधीच तयार झाली होती. गोडसेने झाडलेल्या तीन गोळ्यांप्रमाणे हे सर्व मुद्दे सुद्धा गांधीहत्येला तितकेच जबाबदार आहेत. पण दुर्दैवाने गांधी हत्येची चर्चा होते तेव्हा या मुद्द्यांवर मौन पाळले जाते. ‘माझ्या मृतदेहावर पाकिस्तान बनेल’ असे म्हणणाऱ्या गांधींनी आमरण उपोषण का केले नाही, फाळणीविरुद्ध कोणतेही आंदोलन का केले नाही, या मुद्द्यावर कधीच गंभीर चर्चा होत नाही? कटाच्या तळापर्यंत जाण्यासाठी सदर पुस्तकाच्या लेखकाने हजारो पानांचा पोलीस तपास अहवाल, केस डायरी, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण न्यायालयीन कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला आहे. एकंदरीत, प्रमाणित इतिहासलेखनाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिले तर लेखक प्रखर श्रीवास्तव यांनी प्राथमिक स्रोतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने आणि समंजसपणाने केल्याचे जाणवते.