-
Modi 3.0 Avval,Uttung,Abhedya (मोदी ३.0 अव्वल,उत्त
मोदी ३.0 अव्वल ,उत्तुंग,अभेद्य प्रदीप भंडारी अनुवादक - रोहन अंबिके दिलीप राज प्रकाशन पुणे दिलीपराज घेऊन येत आहे.रिपब्लिक भारत, झी न्यूज, इंडिया न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार, जन की बात चे संस्थापक आणि बेस्टसेलर लेखक प्रदीप भंडारी यांचे नवीन पुस्तक आयोद्ध्या मतदारांचे मर्मस्थळ.२०२४ च्या निवडणुकीचे संपूर्ण विश्लेषण.मोदींचा करिष्मा आणि भारताची पुढील वाटचाल जाणून घ्या.
-
Pratiksha Shivachi (प्रतीक्षा शिवाची)
● (प्रतीक्षा शिवाची) हे काशीच्या या महाकाव्यावर अधिकारवाणीने भाष्य करणारे, वस्तुनिष्ठ, तथ्यांचा परामर्श घेणारे आणि तरीही भावनेने ओतप्रोत भरलेले दाहक पुस्तक आहे. डॉ. आनंद रंगनाथन, लेखक आणि शास्त्रज्ञ ● ज्ञानवापीची कित्येक काळ दडपून ठेवलेली गुपिते अगदी निगुतीने प्रकाशझोतात आणली गेली असल्याने हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. अॅड. श्री हरि शंकर जैन ● इथला बारीक सारीक तपशीलही पुराव्यानिशी मांडला आहे. या विषयाशी संबंधित सर्व कागदपत्रांचे नीट संपादन केल्यामुळे या विषयाला पूर्ण न्याय मांडला आहे. ॲड.ए.एस. श्री विष्णु शंकर जैन ● सर्वसामान्य वाचकापासून आजवर झाकून ठेवलेली सगळी तथ्ये डॉ. संपत अतिशय उत्कंठावर्धक, सहज आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता, तरीही नेटकेपणाने आणि स्पष्टपणे प्रकाशात आणतात. डॉ. H.R. मीरा, संशोधिका आणि लेखिका ● भारतातील धर्म निरपेक्षतावाद आणि सांप्रदायिक सलोखा याचे आधुनिक युगाच्या संदर्भाने असणा महत्त्व आणि काशी विश्वनाथ मंदिराची सखोल रुजलेली संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा समजून घेणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.
-
Rang Tya Nabhache (रंग त्या नभाचे)
पुनः प्रत्यय देणाऱ्या आश्वासक कथा डॉ. नितीन करमरकर यांचा पाच कथांचा संग्रह 'रंग त्या नभाचे' या नावाने प्रकाशित होत आहे. याआधी त्यांचा 'समर्पण' हा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संग्रहातील आणि यातील अशा दोन्ही कथांचा विचार केला तर या कथांची प्रकृती दीर्घत्वाकडे झुकणारी अशी आहे. म्हणजे या कथा एका अर्थाने दीर्घ स्वरूपाच्या आहेत. त्यांना आपल्या कथांमधून जाणिवेपेक्षा अधिक काही वेगळे, अलक्षित असे सांगायचे असते, ते विस्तृत स्वरूपात सांगायचे असते, असे त्यांच्या कथा वाचून ठरवता येईल. मानवी जगण्याचे, सत्याचे दर्शन सर्जनात्मक पातळीवरून घडविणे हा सर्जनशील लेखकाचा धर्म असतो. आणि या धर्माला जगणारे लेखक म्हणून डॉ. नितीन करमरकर यांच्याकडे पाहावे लागते. आपल्याला आलेली अनुभूती ते कथेच्या माध्यमातून सांगता सांगता जीवनाच्या काही अलक्षित, काही लक्षित बाबींकडे, प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधतात. त्या प्रश्नांची आच आपल्याला कशी आणि किती लागली, याचे पुनःप्रत्यंतर ते आपल्या लेखनातून दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे ही कथा आपली वाटते, आपलीशी वाटू लागते. हेच या कथांचे खरे मर्म आहे, असे म्हणावे लागते
-
Ek Patra Aaicha (एक पत्र आईचं)
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! आपला प्रवीण दवणे
-
Tya Tithe Rakhatali (त्या तिथें रुखातळीं)
लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांनी त्यांच्या वाघरू आणि त्या दशमांश रुखताली या दोन कादंबऱ्या एकत्र करून ‘एक वाघरू त्या तिथे रुखातळीं’ या पुस्तकात साकारल्या आहेत. वाघरूमध्ये, लेखकाने राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका परिसराचे प्रेम वर्णन केले आहे - बाबुडा टायगर क्लबकडे. दुसरीकडे, भिवगडच्या पायथ्याशी असलेल्या ३०० वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाखाली घडलेल्या काही वास्तविक घटनांचे वर्णन त्या तिथी रुखातळींमध्ये केले आहे. त्यामुळे या दोन गो.नी.दांडेकरांच्या छोट्या कादंबऱ्या म्हणून वर्गीकृत करता येतील.
-
Nivdak AbhidhaNantar (निवडक अभिधानंतर)
अभिधा सुरू असताना ग्लोबलायझेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. आमच्या काही कविता आणि याच दरम्यान स्वतःला आलेलं जगण्याचं नवं भान, ग्लोबलायझेशनमुळे बदललेला भोवताल आणि या सर्वांमुळे उमजलेले लिहिण्याचंही नवीन भान ह्या ‘अभिधा’मधून आम्ही दिलेल्या किंवा आम्ही मिळविलेल्या काही गोष्टी. १९९९ मध्ये अभिधानंतर सुरू केलं तेव्हा ग्लोबलायझेशनचा परिणाम असलेले साहित्य आम्ही प्रसिद्ध करू असे धोरण होते आणि २०१४ साली अभिधानंतर बंद करेपर्यंत आम्ही ते लावून धरले. ग्लोबलायझेशननंतर जीवनाप्रमाणे साहित्यही बदलत होतं. हा बदल पकडण्याचा, डॉक्युमेण्ट करण्याचा, नवीन साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. हा अवकाश ग्लोबलायझेशन 'नंतर' चा आणि एका अर्थाने 'अभिधा' 'नंतरचा' अवकाश होता. या पुस्तकातून अभिधानानंतरमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक कविता, लेख, मुलाखती आणि संपादकीय देत आहोत. या सर्व लिखाणांमधून ग्लोबलायझेशन आणि डिजिटालायझेशननंतर निरंतर बदलत असलेली भाषा, संस्कृती,आणि जगणं अधोरेखित होतं. मराठीत सध्या लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, विचार करणाऱ्या, भाषेची आणि संस्कृतीची चिंता करणाऱ्या आणि भाषेसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकेल याची खात्री आहे.
-
Moneychi Smart Psychology (मनी ची स्मार्ट सायकोलॉज
मनीची स्मार्ट सायकोलॉजी मनीच्या सर्व पैलूंना समजवणारा एक मास्टरपीस इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये उपलब्ध मनीच्या मागे धावू नका... मनीला तुमच्यामागे धावू द्या! मनी कमवायची स्मार्ट पद्धत काय आहे? मनीची कमतरता दूर कशी करायची? मनीला हुशारीने मॅनेज कसं करायचं? इनव्हेस्टमेंट पॉवरचा योग्य उपयोग कसा करायचा? फायनान्शिअल प्रॉब्लेम्स आणि मनी ट्रॅप्सपासून कसा बचाव करायचा? मनीच्या स्मार्टनेसला कसं टॅकल करायचं? या प्रश्नांची उत्तरं शोधणं आजच्या आधुनिक युगात जगण्यासाठीच नाही तर प्रगती करण्यासाठीही आवश्यक आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं मनीची सायकोलॉजी सखोलतेने समजून घेतल्यावरच शोधली जाऊ शकतात. तर याच संदर्भात ‘मी मन आहे’, ‘मी गीता आहे’ आणि ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ अशा अनेक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी मनीवर आपलं बहुप्रतिक्षित पुस्तक ‘मनीची स्मार्ट सायकोलॉजी’ सादर करत आहेत. दीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे की मनी कमवणं एवढंही कठीण काम नाही जेवढं ते दिसतं. खरं तर मनी कमवण्याच्या योग्य अप्रोचच्या अभावी अधिकाधिक लोकांना मनी कमवणं कठीण दिसत आहे. सरळ भाषेत लिहिलेलं हे पुस्तक मनी कमवण्याचा योग्य अप्रोच शिकवण्यासोबत आपल्या मनाला मनासारखी मनी कमवण्यासाठी सेटही करते. सोबतच लेखकाने या पुस्तकात इनव्हेस्टमेंटच्या पॉवरलाही समजवलं आहे आणि त्यानुसार मनीची गुंतवणूक करण्याचे उपायही सुचवले आहेत. सर्वात खास गोष्ट ही की लेखकाने या पुस्तकात मनी कमवण्यासह मनीमुळे होणारे स्ट्रेस आणि भांडणं मिटवण्याचे सोल्यूशन्स दिले आहेत. एका वाक्यात सांगायचं तर हे पुस्तक मनीसंबंधित सर्व प्रॉब्लेम्सचं वन पॉइंट सोल्यूशन तर आहेच, सोबतच एक मास्टरपीसही आहे जो मनीच्या सर्व पैलूंना वेगवेगळ्या केस स्टडीजच्या माध्यमातून सोप्या भाषेत स्पष्टपणे समजावते. एकंदर हे पुस्तक आजच्या आधुनिक युगात कुठल्याही मनी प्रॉब्लेमशिवाय एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठीचं एकमेव गाइड आहे.
-
Vishwamitra Bharat (विश्वामित्र भारत)
जागतिक क्रमवारीत उन्नत होण्याचा भारताचा प्रयत्न हा एक संतत प्रवास आहे. परंतु आपण केलेल्या प्रगतीचा आढावा घेत असताना आणि पुढील आव्हानांचा अंदाज घेत असताना, हा प्रवास प्रखर राष्ट्रीय बांधिलकी आणि आत्मविश्वासाने प्रेरित असणे ही गोष्ट खरेच खूप आश्वासक आहे. स्वतःच्या वारसा आणि संस्कृतीतून बळ मिळवणारा असो किंवा लोकशाही आणि तंत्रज्ञानाच्या आशेवर आव्हानांना सामोरा जाणारा असो, हा नक्कीच नवा भारत आहे. स्वतःचे हितसंबंध ठरवू शकणारा, स्वतःची भूमिका स्पष्ट करणारा, स्वतःचे उपाय स्वतः शोधू शकणारा आणि स्वतःचे मॉडेल पुढे नेणारा भारत. थोडक्यात एक असा भारत, जो अधिक भारत आहे.
-
Gosht Sangnyacha Anand Arthat Tekdimagche Gaon (गो
परतून कुणीही घराकडे जाऊ शकत नाही हे आधुनिक साहित्यातील एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. तरीही माणसे आपल्या भूतकाळाकडे जाऊ पाहतात. काय हवे असते त्यांना? त्यांना जे मिळते ते खरेच मौल्यवान असते का? माणसे जे प्रश्न घेऊन मागे जातात त्यांना त्यांची उत्तरे मिळतात का? असे प्रश्न घेऊन आपल्या भूतकाळाकडे वळलेल्या आणि हा प्रवास शब्दबद्ध करू पाहणाऱ्या एका लेखकाला अचानक एक रचनाबंध गवसतो-कलाकृतीचा आणि जीवनाचाही. त्याला जाणवत जाते, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असा अट्टहास नकोच बाळगायला, कारण या प्रवासात एक आगळा आनंद आहे आणि तसाच तो या प्रवासाची गोष्ट सांगण्यातही आहे. स्वतःला शोधता शोधता स्वतःमधील लेखकाला लागलेला आयुष्याबद्दलचा हा एक शोध आहे- आत्मशोधाच्या दिशेने जाणारी विजय पाडळकर यांची एका आगळ्या प्रवासाची ही नवी कादंबरी. वाचकांना गोष्ट ऐकल्याचा आनंद देत, स्वत:च्या आतही पाहायला भाग पाडत राहते... अंतर्मुखतेचा प्रत्यय देत...