-
Smita, Smit Aani Me (स्मिता स्मितं आणि मी)
मला दिसलेली, मला उमजलेली, मला जाणवलेली, मी अनुभवलेली आणि मी समजून घ्यायचा प्रयत्न केलेली - अशी ही स्मिता. आणि म्हणूनच या पुस्तकातली स्मिता सुरवातीपासून शेवटपर्यंत माझाच संदर्भातली. तिचं असणं आणि तिचं जिवाला चटका लावून जाणं, सगळंच कसं मनावर कोरल्यासारखं आखीव-रेखीव! असं वाटतं, कुठच्याही क्षणी तिची हाक ऐकू येईल - कशी आहेस? आणि पाठोपाठ तिचं ते मुक्त, मोकळं, मनापासून हसणं! दुर्दैवानं तिचं हे 'असणं' आणि 'हसणं" आता उरलंय फक्त आठवणीतून.
-
Kabandha (कबंध)
गूढकथा म्हणजे काय ? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले. परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का ? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्ति-चित्रण, मनाची पकड घेणार्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण-निर्मिती, या सार्यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणार्याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल. एवढी खात्री नक्कीच आहे.
-
Rangandhala (रंगांधळा)
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी 'खळ्ळ्' आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले ! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखा-यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हाता-याने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे ? अगदी नेहमीच्या वास्तवातून उठवून, रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणा-या, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
-
Paulvatevarle Gav (पाऊलवाटेवरले गाव )
एखादीच रिकामी होडी किनार्याला. संथ पाण्यावरून पक्षी या तीरावरून त्या तीराकडे उडतात. दुपार कलते. थोडी थंड हवा सुटते. कदाचित पाऊसच येईलही... हे तिच्या मनात राहून गेलेलं गाव तिलाही आता इतक्या काळानंतर जसंच्या तसं सापडणार नाही हे तिला कळलं, आता हे पाणी संथ होतं. पण अशाही वेळा असतातचनं की जेव्हा हे बेभान होतं, आपले तट सोडून सैरावैरा धावतं. त्या पाण्याला मग कुणीही कळत नाही. त्या वेळी ते पाणी नसतंच... प्रलयच असतो. तो प्रलय केवळ पाण्यातच शिरत नाही. तो मस्तकातच भिनत जातो. या सगळ्यात माणसाच्या इच्छा अनिच्छेचा सन्मान कुठला !
-
Brahmavakya (ब्रह्मवाक्य)
तुमचं एक चौकोनी शहरी कुटुंब आहे? तुम्हाला स्वेच्छानिवृत्तीची झळ लागलेली आहे? तुमचे नातेवाईक अमेरिकेत राहतात? आणि आपल्या भारतभेटीत उदंड कौतुक वसूल करून घेतात? तुमची पुढची पिढी तुम्हाला जुमानत नाही? तुम्हाला आधुनिक फॅशनच्या चटपटीत मुलाखतीला तोंड द्यावं लागतं? तुम्ही… तुमचं… तुम्हाला… तसं कशाला, तुमचं काहीही होवो. या पुस्तकातल्या कथांमध्ये तुम्हाला आरसा दाखवल्यासारखं वाटणारच. मिश्कील खेळकर कथांचा संग्रह.
-
Tumbadche Khot Khand - 3 Ani 4 (तुंबाडचे खोत खंड ३ आणि ४)
श्री. ना. पेंडसे यांनी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी लिहीली. ती म्हणजे तुंबाडचे खोत. मुळातच या द्वीखंडी कादंबरीचा आवाका प्रचंड आहे. तुंबाडचे खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटीश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड आहे. तरी स्थळ मात्र एकच : तुंबाड आणि तुंबाडचा परिसर.
-
Richard Fenman
एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. 'आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट' असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र
-
Kadambari Don (कादंबरी दोन )
’शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रद्धा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवतो, परंतु असे काही घडविल्याच्या आरोपातून नामनिराळा राहतो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.’ आटपाट नगरासारख्याच एका अजब नगराच्या कहाणीतून ’कादंबरी दोन’ सुरू होते. फक्त इथे उंदीर धटिंगण आणि माणसे उंदरांप्रमाणे जिवाला भिऊन जगतात. अत्यंत निष्णात शल्यविशारदानं संपूर्णपणे शवविच्छेदन करून शरीराचा कानान् कोपरा उघडून दाखवावा त्याप्रमाणे राजकारण आणि राजकारण्यांना सोलून काढणारी ही - ’कादंबरी दोन’