-
Igin ( ईगीन )
महादेव मोरे यांच्या 'ईगीन' या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखीत करतात. काही गंभीर, तर काही गंमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलित-पददलितांचे, कष्टकर्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्ष-खेदाच्या, व्यथा-विवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हींग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणार्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणार्या, विचार करायला लावणार्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मित हास्याची रेषा फुलविणार्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तीचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे.
-
Pagora (पागोरा)
आत्मकथनपर लेखनाचे सामर्थ्य घेऊन अवतरलेली रमेश अंधारे यांची एक लक्षणीय कादंबरी.
-
Bhatkyacha Bharud (भटक्याचं भारुड )
राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्रविधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्ता-निमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्नविचारले, प्रस्ताव मांडले, त्यातील निवडकसाहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्यरोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलतीहा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो तेव्हा...
-
Urmila (उर्मिला )
'उर्मिला'त प्रत्येक महत्वाची व्यक्तिरेखा स्पष्ट व पूर्ण स्वरूपात प्रगट झालेली दिसते. विषय सामाजिक स्वरूपाचा आहे म्हणजे तो एखाद्या मोठ्या समूहाचा आहे असे नव्हे, किंबहुना, हेच वाक्य पूर्ण फिरवून म्हणायचे तर तो विषय मानवी समूहाचा, सबंध मनुष्याजातीचा आहे. उर्मिला ही कादंबरी केवळ उर्मिला आणि विश्वास या दोन पात्रांची नाही केवळ या एका जोडप्याची नाही. ही कादंबरी एका अनिवार्य नैसर्गिक नात्याची तर आहेच, पण स्त्रीचा आदिम हक्काची आहे. स्त्रियांच्या हक्काला हळुवार स्पर्श करणारी ही कादंबरी स्त्रीच्या हक्कासंबंधी, म्हणजे व्यक्ती म्हणून पुरुषाइतकेच महत्व असेल्या व्यक्तींसंबंधी आहे. तिला तो हक्क कसा मिळतो, नव्हे तो ती कसा मिळवते हे दाखवणारी ही कादंबरी आहे. -के.ज. पुरोहित
-
Pachat (पाचट)
बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतील मोठा दलित समाज ऊसतोडीच्या कामाला लागला. दैन्य कायम राहिले, परंतु त्या जोडीला अस्थिरता आली. ‘पाचट’मध्ये येते ती अशाच एका कुटुंबाची कथा. १९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे ती गहिरी बनते. ऊस तोडकरी साखर कारखान्याच्या आश्रयाने राहतात. कामाचे हंगामी स्वरूप आणि असंघटित वर्ग यांमुळे त्यांच्या व्यथावेदनांकडे समाजाचे लक्ष वेधले जात नाही. हे पुस्तक ही या लक्षावधी कामगारांची कैफियतही होते...
-
Udhavast (उद्ध्वस्त )
दारिद्रय, निरक्षरता, बेकारी, बिमारी, बकालपणा यांनी माणसं गंजून; वैभवाच्या शिखरांना सीमा नाही आणि दारिद्र्याच्या तळाला अंत नाही. घर घरात राहिलेलं नाही, माणूस माणसातनं हरपलाय आणि घराघरातील माऊली घराच्या तळाला गाडली जात आहे... हे वर्णन आहे लक्ष्मण माने यांनी केलेल्या आजच्या समाजस्थितीचं. त्यांना जगाविषयी कुतूहल आहे, मनुष्यजीवनाविषयी आस्था व प्रेम आहे; परंतू त्यांचे मान पीडलेले आहे भटक्या- विमुक्तांच्या, आदिवासींच्या, पददलितांच्या दुःख वेदनांनी. त्यांच्यातल्या कार्यकर्ता अशा स्थितीतही परिवर्तनाची लढाई लढू पाहात आहे आणि त्यांच्यातील लेखकाचं मन आक्रोशत आहे. 'या दुःखाला वाचा फोडता आली तर पाहावी' म्हणून त्यांनी मांडलेला हा कथांचा प्रपंच...
-
Palavarach Jag ( पालावरचं जग )
भटक्या आणि विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची स्थितिगती आणि त्यांचे प्रश्न लेखकाने या पुस्तकात भेदकपणे मांडले आहेत.
-
Paanikam
अलिकडच्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक चलनवलनाचा वेध घेणारं, बेगडी, ढोंगी आणि कांगावखोर वृत्तींचा समाचार घेणारं जळजळीत लेखन.
-
Reshepalikadil Lakshman ( रेषेपलीकडील लक्ष्मण )
एक सर्वसामान्य मुलगा स्वत:च्या कर्तबगारीनं लेखक, विचारवंत, कलावंत, गुणवंत, साहित्य अकादमी ते पद्मश्रीसारखे पुरस्कार घेणारा कार्यकर्ता, प्रेमळ-वत्सल पती, पिता आणि एक चांगला माणूस कसा बनतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मण माने. या व्यक्तीला शब्दांत बांधणं तसं कठीणचं, तरी त्यांच्या सहवासात आलेल्या विविध स्तरांवरील व्यक्तीच्या अनुभवातून त्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
-
Sankalpa ( संकल्प )
संजीव खांडेकर यांच्या पुनर्प्रस्तावनेसह - सामाजिक चळवळीतील तरुणांच्या जाणिवांचा शोध.
-
Trikon ( त्रिकोण )
नौना ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल यांची उच्चशिक्षित कन्या. अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली. संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी, पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य प्रलोभनांच्या भोव-यात गुरफटू लागलं. आशा, आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरूझाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो की अन्य कोणी, या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.
-
Tequila Takatak ( Tequila टकाटक )
जगभर पसरलेल्या, काही परतून भारतात आलेल्या या मराठी सुजनांचे, मराठी व इंग्रजीतूनही जीवनाभुव, विचार वाचताना त्यांचं भौगोलिकच नव्हे तर अनुभवांचंपण वैविध्य आणि व्याप्ती जाणवत राहिली.