-
Bharatmuniche Natyashashtra (भारतमुनींचे नाट्यशाश्
नाट्य आणि शास्त्रीय नृत्य यातून निर्माण झालेल्या नाट्यशास्त्राची मोहिनी आजही कलाक्षेत्रावर आहे. हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भारतमुनींनी नाट्यशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्याचा अभ्यास, प्रत्यक्ष प्रयोगासाठी उपयोगिता, मर्यादा याचा विचार व त्याविषयीची मते डॉ. सरोज देशपांडे यांनी भारतमुनींचे नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडली आहेत. यात नाट्य, अभिनय याचबरोबर त्याचे रंगमंचावर सादरीकरण, प्रयोगासाठी इतर कलांचा विचार, प्रेक्षकांचा अनुभव या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. नाट्यशास्त्राचा अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी आहे.
-
Death Was Not Painful (डेथ वॉज नॉट पेनफुल)
१९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय फायटर पायलट्सचे अनुभव.
-
Rahul Virchit Mahabhartatil Ufarata Ghatotkachha (
राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे काँग्रेसचा कसा ऱ्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचूक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
-
Bhedile Suryamadala (भेदिलें सूर्यसमंडळl)
आदर्श लोकनेतृत्व, नि:स्वार्थ समाजकारण आणि प्रपंचाभिमुख परमार्थ ही समर्थ रामदासांच्या विचारधारेची मूळ त्रिसूत्री. ती जाणून घेणे व जाणवून देणे ह्या विचाराने लिहिली गेलेली ही समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी.
-
Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!