-
Mana Sarjana
मानवी जीवन 'त्रिमित' आहे. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे. माणसाचे खरे मोठेपण या तिस-या मितीवर ठरते. अशा व्यक्ती समाजात चारित्र्यसंपन्न आणि आदर्श ठरतात. त्याग, साधेपणा, इतरांच्या गरजांची जाणीव अशा अनेक पैलूंचे दर्शन ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातून घडते, त्यापैकी डॉ. अनिल गांधी 'कनिष्ठिकधिष्ठित' आहेत. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी आपल्या वैद्यकीय विषयाखेरीज, आर्थिक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे.
-
Garvel
आपल्या बाळपणापासून शिवा त्या गारवेलाचा संसार बघत आला होता. एवढी दांडगी, डेरेदार चिंच गारवेलानं निम्मी झाकली होती. वर्षानुवर्ष भरतकाम करावं तसे टाके घालीत बसला होता. दरसाल आपलं जाळं विणतच होता. बघावं तिकडं सगळीकडं त्या झाडावर ती हिरवी वेलबुट्टी आणि फुलं दिसत होती. किती पावसाळे आणि किती उन्हाळे त्यानं पाहिले होते ! किती वादळांशी झोंबी घेतली होती ! गरजणा-या वळवानं झोडलं, झंझावातानं झिंजाडून विस्कटून बघितलं; पण आजवर त्यानं कधी कुणाला दाद दिली नव्हती, नमतं घेतलं नव्हतं. असा हा एवढा जिद्दीचा गडी, पण लागोपाठ पडलेल्या या तीन वर्षांच्या दुष्काळात डेंगला होता. त्याची सगळी रयाच गेली होती. यंदाच्या ह्या उन्हाळ्यात तर अंगावर एक हिरवं पान नव्हतं - मग फूल कुठलं ? नुसत्या जाळ्या राहिल्या होत्या. त्याही वाळून पळकाट्या झाल्यागत दिसत होत्या. तरी तग धरली होती. एवढा उन्हाळा पार झाला असता म्हणजे त्याला डग नव्हता. पुन्हा टाके घालत बसला असता. ती हिरवी जरतार खुलली असती. पण जगाहर्त अशा ह्या दुष्काळानं त्यालाही नाक घासायला लावलं. ना वादळ, ना वारा. एकाएकी कोसळला बाबा. संपला त्याचा शेर ! ती म्हातारी चिंचसुध्दा गदगदली. हे काय झालं, म्हणून ओणवी होऊन बघत राहिली.
-
Shreeganesha (श्रीगणेशा)
गंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडकलाटेचे डोळे तिच्याकडं लागून आहेत. तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे; कारण गंगीचं अंग चांगलं उफाड्याचं आहे आणि थोरवड अंगाच्या ह्या गंगीचं कातडंही हळदीगत गोरंपान आहे. तिच्या नाकाचा शेंडा जरासा खुडल्यागत दिसतो; पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे. तिच्या गो-या गालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीळ आहे, तो तिला पाहणा-याच्या मनावर ठसल्याशिवाय राहत नाही. तिच्यासारखा वाकडा भांग गावातल्या दुस-या कुठल्या पोरीनं अजून काढला नाही, अनेक कुभांडं त्या गावानं तिच्यावर रचली आहेत. तिच्यासारखे कानावर फुगे पाडणारी पोर त्या गावात निपजायला अजून किमान दहा वर्षं तरी जावी लागतील !
-
Bhetigathi
तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे. हे बघून लोक त्याला 'बशा' म्हणायचे. बशा बौल म्हणून सर्जाचं नाव बद्दू झालं. म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला. त्याच्या गुणाला बट्टा लागला.... मृगाचा पाऊस सुरूझाला आणि सर्जाचं हाल कुत्र खाईनासं झालं. म्हशीपुढची काढलेली चिपाडं, शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला. पोट जाळायला तो तेसुद्धा खायचा - हपापून अपरूबाईनं खायचा. पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाहीत. आतडी रिकामी राहिली. त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली.
-
K Five
कोकणातून प्रथमच मुंबईत आलेल्या कोवळ्या, भाबड्या, लाजर्या सुंदर फुलराणीची – जुईलीची. हिंदुस्तान बेचिराख करण्यासाठी पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या ‘राकट, दणकट, विकृत, प्रशिक्षित अतिरेकी रहिमतखानाची.भारतीय कमांडो युनिट कोब्रा थर्टीनच्या निर्दयी, भावनाहीन, मानवी कत्तलखाना असलेल्या कमांडो के फाईव्ह याची.... दंगलीच्या पार्श्वभूमीवरील मन गोठवून टाकणार्या थरारनाट्याचा पुन:प्रत्यय तितक्याच दाहकतेने देणारी, संवेदना गोठविणारी विलक्षण कादंबरी....
-
Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा)
माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे म्हणून हे महाराष्ट्र! इतिहास अनेकांनी शब्दबद्ध केला. अनेकदा तो शब्दबंबाळही केला. महाराष्ट्र जसा आहे तसा दाखवायचा तर फक्त कॅमेरा-लाईटच्या शब्दांतच तो दिसावा. महाराष्ट्र भूमी समृद्ध करणार्या अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक 'स्थळां'चे हवाईछायाचित्रण करून महाराष्ट्र कॅमेर्यात शब्दबध्द केला.