-
Vishvalli
सगळेजण त्याला त्वेषाने मारू लागले. त्याला फरफटत, मारतच सगळे वाड्याकडे आले आणि पायरीवर टाकून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर "पाणी पाणी" करत दिगूनं प्राण सोडला. मरताना त्याच्या मनात एकच भावना थैमान घालत होती. सूड ! सूड ! गावाचा सूड ! इतकी वर्ष मला तुम्ही एकटं ठेवलंत, तळमळत ठेवलंत. आता मला रक्त हवंय. मी माझी सोय केलीय. कायमची. डॉक्टरचा भयानक चेहरा आणि ओठांबाहेर येणारे तीक्ष्ण सुळे ती बघतच राहिली.
-
Dhage Aadave Ubhe
ज्या ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर? किंवा कामाठीपुर्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर? या समूहांमध्ये जन्मणार्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता-बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.
-
Karyarat
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
-
Vanat Janat
जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो. मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो. `सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.
-
America
अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथं. फक्त जरा श्रीमंती थाटाचं. पण तसं ते नव्हतं. ते वेगळंच होतं आणि ते पाहणं फार आवश्यक होतं. कारण ते आपल्याकडे येऊ घातलंय आणि तेही अधिक विकृत स्वरूपात. उद्या आपल्याकडे काय प्रश्र्न असणार आहेत, याचा अंदाज आजची अमेरिका पाहून लावता येतो.
-
Sonayachya Dhurache Thaske
सौदी अरेबियासारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या, कट्टर इस्लामी राज्यात उपेक्षा, अन्याय नि हालअपेष्टा सहन करत, आयुष्यातील उमेदाची पंचवीस वर्षे वास्तव्य करणार्या डॉ. उज्ज्वला दळवी यांनी त्या देशाच्या अंतरंगात शिरून, ते उकलून आपल्यापुढे ठेवले आहे. सहजसुंदर लिखाणामुळे वाचकप्रिय ठरले आहे.