-
Netaji Subhash
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या धगधगत्या रणकुंडात अनेक देशभक्तांनी उडी मारली. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशमुक्तीसाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे एक स्वतंत्र लढाच आहे. उच्चविद्याविभूषित सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून देशवासीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी हाक दिली. परदेशी नेत्यांची मदत घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले. त्यांच्याबद्दल भारतातच नव्हे, तर अन्य देशांतही आदर व्यक्त केला जातो. त्यांच्या राजकीय वाटचालीतून त्यांची जीवनगाथा सितांशू दास यांनी ‘नेताजी सुभाष’ मधून कथन केली आहे. त्याचा मराठी अनुवाद श्रीराम पचिंद्रे यांनी केला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका तेजस्वी पर्वाचा वेध यातून घेतला आहे.
-
Nivdak Dhananjay Trutiya Netra (निवडक धनंजय तृतीय
1961 ते २००० मधील धनंजय दिवाळी अंकांच्या निवडक कथांचा संग्रह.
-
Punyachi Apurvai (पुण्याची अपूर्वाई)
ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात. त्या साध्यासुध्या मळक्या कपड्यांतल्या, धुळीने भरलेल्या लोकांनी ओढलेच मला त्यांच्यात. त्यांच्या कामातली मग्नता खूप आवडली. आणि एकमेकांशी असलेली संलग्नताही. नंतर कुतूहलाने भरलेले डोळे पुण्याच्या आणखीही काही भागांवरून फिरले. या सगळ्या जागा होत्या; तशी त्यातली माणसेही होती. आजच्या अफाट वाढलेल्या पुण्यात मी माझं पुणं असं जपून ठेवलं आहे.