-
Shala Aahe Shikshan Nahi
खेड्यांपर्यंत, आदिवासी पाड्यापर्यंत शाळेची इमारत पोचली. पण शिक्षण पोचलं का? शाळेच्या वर्गात पोरं बसली. शाळा भरली. पण पोरं शिकली का? शाळेत जाऊनही मुलं निरक्षर का? अनुदान असूनही आश्रमशाळेत लेकरं उपाशी का? अनागोंदी कारभार आणि आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षणाच्यादुरवस्थेचा शोध घेणारी एका कार्यकर्त्याची शोधयात्रा... भर पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, नांदेडजिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाऊन घेतलेला शिक्षणाचा हा शोध... शाळा आहे पण शिक्षण नाही ! हे कटू सत्य अधोरेखित करणारा...वाचकाला अस्वस्थ करत शैक्षणिक प्रश्नांविषयी जागा करणारा लेखजोखा...
-
Sat Na Gat
श्री. राजन खान हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. ते चांगले स्टोरीटेलर आहेतच, पण लेखकाने लिहिताना ज्या अर्थाने निर्दय व्हायचे असते, तसे ते फार जोरकसपणे होतात. ते त्यांच्या पात्रांत भावनिकदृष्ट्या अडकत नाहीत. त्यांच्या प्रेमात पडून अनुभवातला दाह ते निष्कारण कमीजास्त करीत नाहीत. एखाद्या स्थिर चौकटीतल्या चित्राची ओळख करून देण्याच्या पद्धतीने ते सुरुवात करतात आणि भराभर फटकारे मारत भरदार स्केच करीत जावे तशी पात्रे उभी करतात. त्यांची समूहचित्रणेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. नामी नावाच्या बलात्कारित स्त्रीची गोष्ट सांगता सांगता ते आपल्या एकूण सामाजिक वास्तवाचा खेळ उभा करतात. स्वार्थ आणि हितसंबंध राखणार्या खेळ्या सारे जण आपापल्या कुवतीनुसार खेळत असताना एखाद्याच्या सुखदुःखाला कवडीइतकेही मोल उरत नाही याचा प्रत्यय देऊन आपल्याला अस्वस्थ करतात, अंतर्मुख होण्याला प्रवृत्त करतात. एका घटनेचे धागेदोरे उभे करता करता खूप मोठा पट आपल्यासमोर साकार करणारी व समकालीन वास्तवाचे अतिशय भेदक चित्रण करणारी `सत ना गत’ ही आजची एक महत्त्वाची कादंबी आहे हे निःसंशय.
-
Jagaychay Pratyek second
डॉ. यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण. बूटपॉलिश करत, रेल्वेत तर्हर्हेच्या वस्तू विकत आणि नाना नोकर्या पत्करत त्यानं शिक्षण पूर्ण केलं. तो तेवढ्यावरच थांबला नाही, त्यानं अनेक कला, छंद जोपासले. रसिकतेनं जगला. आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा प्रयत्न केला.. आणि एका छोट्या अपघाताचं निमित्त होऊन मरण पावला. त्याच्या पत्नीनं कथन केलेली त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी.