-
Maranottar (मरणोत्तर)
रहस्यकथा आणि विस्मयकथा ह्यांच्यातील फरक तसा अंधूकसाच .....कुठलीही रहस्यकथा विस्मयकथा होऊ शकेल , पण कुठलीही विस्मयकथा , रहस्यकथा असेलच असे नाही ....... इथं कथेच्या अगदी शेवट मिळणारं वळण - कलाटणी पाहून नकळत उदगार येतात सही....... आणि हीच सु. शीं. ची खासियत .....त्यांच्या विस्मयकथा वाचकांना हि अनुभूती मिळवून देण्यात नेहमीच यशस्वी ठरल्यात , त्यापैकीच हि एक मरणोत्तर ..................
-
Gulmohar
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.
-
Me Manus Shodhtoy
वपुंच्या ह्या कथासंग्रहाचे नावच 'मी माणूस शोधतोय' असे आहे आणि ते त्यांच्या लेखनाशी व वृत्तीशीही सुसंगत नाही. वपु जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांनाच दिसणारी असतात पण वपु ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात व त्यांना 'टिपतात' ते चकित करणारे असते. आपल्या लक्षात हे कसे आले नाही असे जरी ते वाचल्यावर वाटले तरी आपल्या लक्षात येऊनही आपल्याला ते असे टिपता नसते आले हेही लक्षात येते न् मग ह्या लेखणीद्वारे कौतुक सप्तर्षी, दुर्वास, इत्यादी माणसाचा शोध वाचकांना खुलवून जातो. म्हणूनच ह्या शोधकथांचया संग्रहाच्या पंचवीस वर्षात चार आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Kahi Khar kahi Khota
"कथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची- जीवनाचे पुस्तक उघडल्याची" असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हटले गेले आहे ते खरे आहे- ह्या संग्रहातील 'जे.के.’, 'भदे’, यासारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा ह्याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक असतो. या फरकामुळे हे जीवन अधिकच 'जिवंत’ झालेले असते. वपु नेमके तेच हेरतात आणि ते इतक्या सहज शैलीत वाचकांना विश्वासात घेत वाचकांपुढे ठेवतात की त्यांनाही वाटते, जगावे तर हे असे. वपुंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांबरोबरच जीवन चेतना देणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य !