-
Manjirya (मंजिऱ्या)
श्री. वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्यलेखांचा हा संग्रह आहे. श्री. खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला, तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय` या साप्ताहिकात ते नियमितपणे लिहीत असत. त्यानंतर `अखंड भारत` या साप्ताहिकात त्यांनी असेच सातत्याने लेखन केले. लघुनिबंधाशी जवळचे नाते सांगणारे हे लेखन आहे. त्यातील विषय प्रासंगिक स्वरूपाचे असले, तरी त्यावरील हे लेखन चिंतनगर्भ असे आहे. त्यावर श्री. खांडेकरांची स्वतंत्र अशी मुद्रा उमटलेली आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वींची मराठी संस्कृती कशी होती, याचे नेमके चित्रण या सतरा ललित गद्यलेखांच्या संग्रहातून अभ्यासू वाचकाला आढळेल.
-
Manzadhar (मंझधार)
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Pahile Pan (पहिले पान)
श्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमवूÂ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री. खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Ragini (रागिणी)
"‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी...’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणा-या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.
-
Sakshep (साक्षेप)
डॉ. रवींद्र शोभणे यांचे समीक्षालेखन म्हणजे सगळ्यातून सर्जनशील लेखनाचा शोध घेण्याचा प्रयत्न होय. या सर्जनाच्या पाठीमागे काही घटक असतात. काही स्रोत असतात. अशा घटकांचा, स्रोतांचा शोध घेणे हे खरे तर सर्जनशील समीक्षकांचे काम असते. आणि समीक्षक हा जर मुळात सर्जनशील लेखक असेल तर तो त्या अंगाने समोर असलेल्या कलाकृतीचा असा शोध घेत असतो. अर्थात हा शोध म्हणजे अंतिम सत्य नसते, पण त्या सत्याच्या वाटेवरून जाण्याचा तो एक मार्ग ठरतो. हा मार्ग, हा प्रवास सर्जनशील समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या भूमिकेतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी केलेल्या या समीक्षालेखनच्या) निमित्ताने वाचकांना पुन्हा नव्याने त्या त्या कलाकृतीकडे, लेखकांकडे जाता येईल. वाचकांना मिळणाऱ्या या पुनः प्रत्ययाच्या आनंदातच या लेखनाचे यश आहे.
-
Pravah (प्रवाह)
प्रवाह' ही कादंबरी वाचकाला जगण्याच्या प्रवाहाशी जोडून घेते. ह्यावं मुख्य कारण ह्या प्रवाहातल्या लाटा, भारती-ओहटी, भोवरे, बादळं, श्वास कोंडणं, किनारा दिसणं, निसटणं, कधी आनंददायी डुंबणं, तर कधी स्वतःच्याच मस्तीत स्वार होणं, कधी खोल गर्तेत जाणं... अशा अनेक भावावस्था प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर एका वेगळ्या अर्थाने अनुभवायला वा पाहायला मिळतात. कादंबरी हा रूपबंध मानवी आयुष्याचा विशाल पट वाचकांसमोर उलगडत असतो. 'प्रवाह' कादंबरीचा हा पटफ्राईडच्या 'जगण्याच्या धडपडीकरिता कामवासनेचं सर्वव्यापी असणं, या सिद्धांताचा धागा आणि त्याचे अनेक रंग वाचकांसमोर आणतो. तारा ही व्यक्तिरेखा ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भावविश्वातले, तिचे आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचे, अनेक क्षणांचे घटितार्थ एक टोकदार, जळजळीत वास्तव उमं करतात. ताराच्या आणि इतर व्यक्तिरेखांच्या भावजीवनातले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवरचे प्रश्न दुर्देवाने अनुत्तरीतच राहतात. तथाकथित सांकेतिक, संयमित, सुसंस्कृत प्रतीकांचं आशयाला अवगुंठन न देता मानवी मनातल्या उल्या पालथींना ही कादंबरी अस्सल स्वरूपात व्यक्त करते. माणसाच्या जगण्याच्या प्रवाहात भूक आणि कामवासना ह्या आदिम प्रेरणा अपरिहार्य असल्याचं ती स्पष्टपणे सुचवते. जीवनाचं हे बिरूप दर्शन सुद्धा बाचकांना निश्चितच अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं आहे.
-
Hidden Measurement (हिडन मेजरमेंट)
'हिडन मेजरमेंट' या कादंबरीत धरणाच्या निर्मितीची, धरणग्रस्तांची आणि धरणाच्या निर्मितीनंतर आकाराला आलेल्या नव्या समाजव्यवस्थेची कथा आहे. आर्थिक सुबत्तेची, त्या सुबत्तेमुळे आलेल्या नैतिक अधःपतनाची मांडणी गोविंद काळे करतात. तसेच धरणग्रस्ताच्या घरातील तरुणाने उभारलेल्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. या कादंबरीतील अनुभवविश्व नवे, अनोखे आहे आणि गोविंद काळे त्या अनुभवाला साध्या, सोप्या ग्रामीण भाषेचा साज चढवून आकर्षक रूप देतात. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. इतकेच नाही, तर मराठी कादंबरीच्या प्रांतात या कादंबरीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
Arjunacha Putra Abhimanyu (अर्जुनाचा पुत्र अभिमन्य
अभिमन्यू, अर्जुनाचा जीव की प्राण आणि भारतातील ऐतिहासिक पौराणिक कथांमधले सगळ्यात प्रभावी आणि मनात रेंगाळणारे व्यक्तिमत्त्व! पाप-पुण्य, योग्य-अयोग्याचे वेगवेगळे निकष लावून अनेक कुकर्मे जिथे घडली ते कुरुक्षेत्र म्हणजे अभिमन्यूला सद्गती प्राप्त करून देणारी बीरभूमी! अभिमन्यू हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाचे द्योतक होता. त्याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे पण किती जण या उत्तमातील उत्तम अशा तरुणाला अंतरबाह्य जाणतात? 'अर्जुन' या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका अनुजा चंद्रमौली अतिशय घडाडीने लोकांच्या कल्पनाशक्तीला जागवत या तेजस्वी राजकुमाराला शब्दातून साकार करतात. एक तेजस्वी धूमकेतू ज्याच्यात त्रिभुवनाला उजळवून टाकण्याची ताकद होती परंतु नशीबाने शापित असल्याने अल्पावधीतच तो अस्तंगत झाला! माहित असलेली कथा, लेखिका अतिशय सृजनात्मक पद्धतीने खुलवतात आणि ताज्या दमाने सादर करतात. अतिशय सहृदय तीव्रतेने घेतलेला अभिमन्यूच्या व्यक्तिमत्वाचा वेध अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवतो ज्या काळाच्या ओघात हरवल्याने या व्यक्तिमत्वाचे काही पैलू कधी प्रकाशात आलेच नव्हते. ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि महाभारतातल्या या तेजस्वी नायकाच्या दुर्दैवी अंताने मन पिळवटून टाकते
-
Hurda (हुरडा)
ही जी घटना घडली तिला कोण जबाबदार? ज्यांनी कोवळ्या मुलींवर अत्याचार केला, बलात्कार व खून केला, ते ? की त्यांचे आई - वडील? ज्यांनी त्यांना वेळेत आवरले नाही, पाठीशी घातले ते? हा दोष कोणाचा? ज्या न्यायदेवतेकडून न्यायाच्या अपेक्षा असूनही न्याय मिळाला नाही ती? त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने कायदा हातात घेऊन जनतेच्या दरबारात त्यांनी न्याय दिला ते दोषी ? ते बरोबर की, हे याचा फैसला कोण करणार? याचा फैसला काळच करणार. कारण पुढील काळात असा गुन्हा करणारे दहा वेळा या घटनेचा विचार करतील. संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना बातमीच्या रूपाने पसरली. लोकांना वाईट वाटले नाही. जनतेने शेवटी न्याय केला. जनतेच्या दरबारात जे काय होते ते नेहमी लोकांनी स्वीकारले आहे.
-
Savalya Vitthalachya Deshat (सावळ्या विठ्ठलाच्या द
वर्षाताईंचा मुलगा धनंजय केनिया देशात नोकरीनिमित्त गेला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी प्राची, त्यांचा छोटासा अहान आणि वर्षाताई असे सगळेच केनियाला गेले. एका संपूर्णपणे अनोळखी देशात, अनोळखी संस्कृतीत, मनातलं कुतूहल कायम जागतं ठेवणाऱ्या वर्षाताईंनी तिथलं संस्कृती विश्व, त्याची वैशिष्ट्यं टिपली नसती तरच नवल! त्या स्वतःही पुस्तकात अगदी सहज याचा उल्लेख करून जातात 'जेवढी म्हणून इथली माहिती मिळतेय ती जमवायला आवडतेय मला. वर्षाताई, तुमच्या शब्दांची, लेखनाची शक्ती अशी, की आम्ही तिथं न जाताही आम्हाला आता हा परिसर, प्रांत आपलासा वाटू लागलाय. सावळा विठ्ठल असाच आहे. 'पंढरीला न जाताही तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. तिथं जाऊन आलेली, उराउरी भेटून आलेली मंडळी भावभारित असं त्याचं जे वर्णन करतात त्यामुळे त्या सावळ्याबद्दलचं प्रेम अधिकच वाढतं.' तुम्ही त्या रंगाने काळ्या मंडळींत सावळा विठ्ठल पाहिलात. या तुमच्या कृष्णदृष्टीला मनोभावे वंदन ! --धनश्री लेले
-
Adhyatmik Bharatacha Rahasyamay Shodh (आध्यात्मिक
गहन साक्षात्कार प्रत्येक मानवी जीवनात दैवी स्वरूप स्वत:ला व्यक्त करीत असतं; पण मानवाने त्याच्याकडे काणाडोळा केला, तर असा साक्षात्कार म्हणजे खडकाळ जमिनीत पेरलेलं बीज ठरेल, जे कधीच रुजत नाही. या दैवी जाणिवेतून कोणालाही वगळले जात नाही. किंबहुना मानवच स्वत:ला त्यातून वगळून टाकतो. नेहमीच हिरव्या फांदीवर झुलणाऱ्या प्रत्येक पक्ष्याने, आपल्या मातेचा प्रेमळ हात धरून ठेवणाऱ्या मुलाने जीवनाचे गूढ कोडे केव्हाच सोडवलेले असते आणि त्याचं उत्तरही त्याच्या मुद्रेवर झळकत असतं. तिथे मानव मात्र जीवनाच्या अर्थाविषयी आणि रहस्यांविषयी केवळ औपचारिक आणि अहंमन्य चौकशी करीत असतो. मग जीवनाची गूढ रहस्यं त्याला उमजत नाहीत. ‘मी कोण आहे’, हा प्रश्न तुम्हाला या रहस्यांच्या तळापर्यंत घेऊन जाईल. त्यानंतर एका गहन साक्षात्काराच्या, जाणीवेच्या रुपात ते उत्तर आपोआप तुमच्यासमोर प्रकट होईल… अदृश्य पण अत्यंत समृद्ध, साधा परंतु संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारा असा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.
-
Majya Katha Tujya Katha (माझ्या कथा तुझ्या कथा)
जीवनातल्या साऱ्या व्यथा ! तगमगत्या शापित जशा. ! आयुष्याचे पंख पसरूनी ! उधळती चौरंगी दिशा ! सहज सोप्या, "माझ्या कथा तुझ्या कथा."