-
Samajsevika Sudha Murty Jeevan Charitra (समाजसेविक
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर सुधा मूर्ती या आदर्श उदाहरण आहेत. इन्फोसिससारख्या भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रगण्य कंपनीच्या 'इन्फोसिस फाऊंडेशन' या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. शालेय शिक्षणापासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वच क्षेत्रांतील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. इंजिनिअरिंग, आयटी, लेखन, सामाजिक कार्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वच क्षेत्रांवर त्यांनी स्वतःचा सकारात्मक ठसा उमटवला आहे. * बालपण ते आदर्श व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास * समाजसेवेला वाहून घेणारं परोपकारी व्यक्तिमत्त्व * सुधाजींकडून शिकता येण्याजोगे महत्त्वपूर्ण पाठ * फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले समाजकार्य.... * तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन * आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या आदर्श गोष्टी * शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील कामगिरी * नेतृत्व, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील योगदान * उद्योजिका, लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्तींचा प्रेरणादायी प्रवास * वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधणारी आदर्श महिला
-
Manashakti Vadhwa (मन:शक्ती वाढवा)
तुमचे मनावर नियंत्रण तुमच्या जीवनावर नियंत्रण इस बेस्टसेलिंग किताबात लेखक आणि लाइफ कोच गौर गोपाल दासते सांगतात कि आमचे मन कसे काम करते. तुमची सर्वोत्तम किस्सागोई शैली कशी आहे ते समजावून सांगू शकता की आम्ही तुमचे दिल-ओ-दिमाग समजावून सांगू शकता आणि पुन्हा त्याला अनुशासित करू शकता. या संपूर्ण किताबामध्ये ते याप्रमाणेच व्यायाम, मेडिटेशन तंत्रज्ञान आणि वर्कशीट्स पाठ सोबत सामायिक करतात ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या आत बदल करून तुमचे विचार आणि व्यवहार तुमच्या नियंत्रणात ठेवू शकतो.
-
Abhagi Kanya (अभागी कन्या)
अभागी कन्या एकूणच सुभाष खिलारे यांचा 'अभागी कन्या' हा कथासंग्रह मराठी कथात्मक साहित्यात महत्त्वाचा ठरणार आहे. याचे वेगळेपण म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये बदललेले समाजदर्शन यातून घडते. समकालीन मानवी जीवनात निर्माण झालेल्या नव्या प्रश्नांची मांडणी यात येते. बेरोजगारी, भ्रष्टाचार, कर्जबाजारीपण, एड्स, अंधश्रद्धा इ. कळीच्या सामाजिक समस्यांचा शोध येथे खिलारे यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सुभाष खिलारे यांचा 'अभागी कन्या' हा कथासंग्रह नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरेल. त्यातील विचारप्रबोधनाच्या चळवळीला साह्यभूत ठरणार असून जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणा मानून लेखन करणाऱ्या नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल.
-
Alvar (अलवार)
नसतेच कुणी । जन्मभर जागे । बुद्धीचे ही धागे । निजतात ।। अगदी सोप्या शब्दात जगण्याचं वास्तव मांडणाऱ्या ऋग्वेद देशपांडे यांच्या या चार ओळी वाचकाला आपल्या वाटून जातात. आपल्या 'अलवार' या काव्यसंग्रहात कवी म्हणून व्यक्त होताना उगाचच कुठल्याही कपोल कल्पनांत न रमता आपल्या रोजच्या जीवनात आलेल्या अनुभवांना, अनुभूतींना आणि जागृत होणाऱ्या जाणिवांना शब्दबद्ध करण्याचा ऋग्वेद देशपांडे यांचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. त्यासोबतच काव्य लेखनाच्या कुठल्या एका विशिष्ट चौकटीत अडकून न राहता गजल, अष्टाक्षरी, ओवी, मुक्तछंद, मुक्तशैली अशा विविध अंगाने त्यांनी आपली कविता मांडली आहे. ऋग्वेद देशपांडे यांची हळूहळू फुलत, उमलत जाणारी काव्यप्रतिभा उत्तरोत्तर बहरत जावो. त्यांच्या या 'अलवार' जाणिवेला आणि काव्यसंग्रहाला मनःपूर्वक शुभेच्छा.. - गुरु ठाकूर
-
Katha Shivray (कथा शिवराय)
स्वराज्य निर्मिती अन् स्वधर्म रक्षण, कल्याणकारी योजना, शेती व व्यापार वृध्दी, सक्षम आरमार निर्मिती.. थोडक्यात शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे शिवगाथा! कुशाग्र बुध्दी, चतुर युक्ती, कठोर शिस्त, अविश्रांत परिश्रम, सूत्रबद्ध नियोजन आणि शुद्ध चारित्र्य म्हणजे शिवगाथा ! इंग्रजीचा अट्टाहास नव्हे तर स्वभाषेचा अभिमान, पुतळे उभारणे नव्हे तर गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हणजे शिवगाथा! चंगळवाद अन् बेशिस्त नव्हे तर कठोर शिस्त आणि पोकळ घोषणा नव्हे तर ध्येयाची उत्तुंग झेप म्हणजे शिवगाथा ! ही यशोगाथा साध्या सरळ आणि रंजक शैलीत कथन करण्याचा हेतू हा की ती छोट्या मोठ्यांना.. सर्वसामान्यांना समजावी, उमजावी! ही यशोगाथा सर्वांना कळावी, आकळावी, समजावी, उमजावी, तनमनात झिरपावी.. श्वासात भिनावी आणि कृतीत उतरावी ही प्रार्थना !
-
Doicha Padar Aala Khandyavari (डोईचा पदर आला खांद्
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार्या आकांक्षांना तिलांजली देत, ‘पापणीआडचा पाणपडदा' लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? ‘पाऊल वाकडं पडलं’, तर ‘तिचं’ ! ‘निसरड्या वाटेवर घसरली’, तर ‘ती’च चुकलेली ! ही ‘ती’च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार्यार कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.
-
Nirgathi Ani Chandrike Ga Sarike Ga (निरगाठी आणि च
गौरी देशपांडे ह्यांच्या ह्या दोन दीर्घकथांपैकी ‘निरगाठी’ ह्या कथेत एका कुटुंबातल्या आईनं लिहिलेली पत्रं, डायरी आणि स्वगतं ह्यांतून कथा उलगडते. मुलांच्यामुळं आईवडिलांना जीवनात विविध अनुभव येतात, त्यामुळं त्यांचं जीवन सार्थकी लागतं, हे लेखिकेला अधोरेखित करायचं आहे आणि त्यात ती यशस्वीही झाली आहे. दुसरी कथा ‘चंद्रिके गं सारिके गं’ ही मनाला चटका लावणारी आहे.
-
Sandhiprakash (संधिप्रकाश)
अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्याा प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.
-
Aispais Gappa Neelamtainshi (ऐसपैस गप्पा नीलमताईंश
राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्यार कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार्याा नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार्याा कुशल व्यवस्थापक. तिसर्यार जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार्या् अभ्यासक. उत्तम वक्त्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
-
Hiravi Portrets (हिरवी पोर्ट्रेट्स)
`हिरवी पोर्ट्रेट्स' हा ललित लेखसंग्रह म्हणजे कोकणच्या अंत:स्पंदनांची रम्य स्मरणयात्रा. बेर्डेंमधला लेखक - दिग्दर्शक - चित्रकार - नेपथ्यकार - पार्श्वसंगीतकार - जाहिरात कलाकार - वाद्यवृंदकार कसा घडत गेला, नावारूपाला आला, याचीही प्रेरणादायक कहाणी या ललित गद्यामधून आपल्याला कळते. कोकणची भूमी अनेक कलावंतांची जन्मदात्री आहे. संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, चित्र, शिल्प अशा अनेकविध क्षेत्रांत कोकणपुत्रांनी व कोकणकन्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. स्वतंत्र प्रज्ञा, जिद्द, उद्यमशीलता, साहसीपणा, एखादं काम अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेण्याची आकांक्षा, श्रद्धाशीलता या गुणांमुळे आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा राष्ट्रीय स्तरावर उमटविणारे अनेक गुणीजन कोकणभूमीत निर्माण झाले. आपले भूमिसंस्कार घेऊन स्वत: वाढत राहिले. राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म, विविध कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कर्तृत्ववान माणसांनी जे योगदान दिले; त्याचे `हिरवी पोर्ट्रेट्स'मधून अंशत: दर्शन घडते. हे लेखन केवळ `कोकण प्रशंसापुराण' नाही. त्यातील आत्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अंतर्मुखता, वास्तव निरीक्षणे आणि समकाळाशी जोडून घेण्याची सकारात्मकता लक्षणीय आहे. डॉ. महेश केळुसकर
-
Shivsena, Lokadhikar Ani Mi (शिवसेना, लोकाधिकार आण
मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार्या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
-
Tablet (टॅब्लेट)
मुंबईमध्ये एका बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीत केमिस्ट म्हणून महेश नोकरीला लागतो. ही नोकरी त्याला केवळ त्याच्या हुशारीवर मिळालेली असते. दैव मात्र ती हिसकावून घेणार असते पण त्याचे नशीब बलवत्तर असल्यामुळे ती नोकरी त्याला मिळते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात 'टाय' लावून जाणाऱ्या व्यक्तीकडे नशीबवान नोकरदार म्हणून पाहिले जायचे पण तिथे कामाची जबाबदारीही तितकीच असे. औषधे बनवणाऱ्या या कंपनीत विश्लेषक केमिस्ट म्हणून महेश लागतो. पण त्याच्या हुशारीवर तो उत्पादन खात्यात जातो कारण इथे कर्तृत्व दाखवण्याची जास्त संधी असते. इथे कामगारांशी संबंध येतो. त्यांच्या युनियनशी बोलावे लागते हे सर्व अत्यंत जबाबदारीने करणे जरूर असते. त्याचबरोबर कंपनीने दिलेले उत्पादनाचे 'टारगेट' कामगारांच्या सहकार्याने पुरे करणे जरुरीचे असते. औषधाच्या उत्पादनात अनेक अडचणी येतात. उत्पादनाची मशीन्स व्यवस्थित राखणे, त्यावर काम करणाऱ्या कामगाराकडून उत्पादन प्रोग्रामप्रमाणे काढून घेणे, एकीकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे तर दुसरीकडे कामगारांमध्ये एकोपा राखणे, या सगळ्यात एक-एक तासाने उत्पादनाचा दर्जा तपासण्याकरिता येणाऱ्या गुणवत्ता विभागाच्या 'केमिस्टच्या' तक्रारी दूर करणे एक का अनेक अडचणी. हे सर्व महेश कसे पार पाडतो आणि शेवटी Managementची मर्जी संपादन करीत एक एक प्रमोशन घेत VICE PRESIDENT (PRODUCTION) या उच्च पदापर्यंत कसा पोचतो आणि शेवटी कंपनीच्या नियमाप्रमाणे साठाव्या वर्षी निवृत्त होतो. पण तो खरोखरीच निवृत्त होतो का? या प्रश्नाचे उत्तर कादंबरी शेवटपर्यंत वाचल्यावरच कळेल....
-
Plasi Panipat Ani Baksar (प्लासी, पानिपत आणि बक्सर
१७५७ साली झालेली प्लासीची लढाई ही बऱ्याच इतिहासकारांच्या मते लष्करी दृष्ट्या केवळ चकमक म्हणावी या दर्जाची होती. इंग्रज आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झालेली ही लढाई ही खरे म्हणजे पीडलेल्या मुघल अधिकाऱ्यांनी आणि अन्यायग्रस्त हिन्दू व्यापाऱ्यांनी इंग्रजांच्या मदतीने सिराज उद्दौलाच्या क्रूर आणि मनमानी राजवटीविरुद्ध केलेले बंड होते. १७६१ साली पानिपत येथे अहमद शहा अब्दाली विरुद्ध महायुद्धासमान झालेल्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला, पण या पराभवामुळे हिन्दुस्थानच्या राजकारणात झालेली मराठ्यांची पिछेहाट जेमतेम दहा वर्षे टिकली, तरीही पानिपतच्या पराभवाची सल ही मराठी अंत:करणातून काही जात नाही.पनिपतचे युद्ध ही मराठी माणसाच्या शौर्याची, त्याच्या अस्मितेची, त्याच्या पराक्रमाची, त्यांच्या पराकाष्ठेच्या परिश्रमांची तशीच त्यांच्यातल्या आपसातल्या हेव्यादाव्यांची, त्यांच्यातल्या भाऊबंदकीची, त्यांच्यातल्या मुत्सद्दीपणाच्या अभावाची आणि शेवटी त्यांच्या हौतात्म्याची कथा आहे. १७६४ साली बक्सर येथे इंग्रजांविरुद्ध बंगालचा पदच्युत नवाब मिर कासीम, अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शहा आलम २ यांनी एकत्र दिलेल्या लढाईचे नावही जरी अनेकांनी ऐकले नसले तरी या मध्यम श्रेणीच्या लढाईतील विजयामुळे इंग्रजांना मुघल बादशहाकडून बंगाल सुभ्याचा महसूल वसूल करण्याचे अधिकार कायमचे प्राप्त झाले व त्यामुळे इंग्रजी सत्तेचे पाय हिन्दुस्थानात भक्कमपणे रोवले गेले. एका वेगळ्या दृष्टीकोनातून हिन्दूस्थानातल्या या तीन भिन्न श्रेणींच्या लढ्याचे केलेले वर्णन आणि विवेचन रसिक वाचकांच्या मनाचा वेध घेईल यात शंका नाही.