-
Rajmata Jijau (राजमाता जिजाऊ)
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर... जिजाऊंची जडणघडण कशी झाली? त्यांनी शिवरायांना कसे घडवले? जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता? जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. सर्वसमावेशक, सकलजनवादी परंपरेच्या पाईक जिजाऊ. महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
-
Pankh Sakaratmakateche (पंख सकारात्मकतेचे)
लेखक डॉ. ओस्तवाल हे जरी डॉक्टर असले तरी हे लेख म्हणजे निव्वळ आरोग्यावरचे कथन नाही. ते स्वत: या सगळ्या अनुभवांतून गेलेले आहेत. या सर्व प्रसंगात त्यांनी सकारात्मकता कृतीत उतरवली आहे. अत्यंत अवघड प्रसंगांमध्ये परिस्थितीवर फक्त आणि फक्त सकारात्मकतेने कशी यशस्वी मात करता येते, याचे वस्तुनिष्ठ अनुभव या पुस्तकात सर्व वाचकांना वाचायला मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक कथा ओघवत्या शैलीमध्ये लिहिली आहे. या कथा वाचकांसाठी अत्यंत बोधप्रद ठरतील आणि त्यातून त्यांना जीवनभरासाठी सकारात्मकतेची ऊर्जा मिळेल.
-
Kali Kala (काली काला)
काली आणि काला अर्थात कृष्ण हे दोन्ही अवतार दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीवर सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अवतरले. अहिंसेची, शांततेची पुनर्स्थापना आणि सौख्यदायी नवसर्जनासाठी अपवादात्मक परिस्थितीत हिंसा गरजेची आहे, असा संदेश महाकाली व काला म्हणजेच कृष्ण या अवतारांनी दिला आहे. काली कालाच्या उत्पत्तीपासून त्यांनी जनमानसावर पिढ्यान् पिढ्या उमटवलेल्या अमिट ठशाची विविधांगी कारणमीमांसा शोधणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक.
-
Rashtrachya Shodhat Bharat (राष्ट्राच्या शोधात भार
'सगळ्या विविधता, भेदाभेद यांच्यापलीकडे जाऊन 'एकमय भारतीय' होण्यासाठी राज्यघटनेने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे अनुसरणे अपरिहार्य आहे. या अनुशासनातूनच भारत एकसंघ, बलशाली राष्ट्र बनू शकेल, हा विचार प्रभावीपणे मांडणारे चिंतनपर पुस्तक. आपण खरोखर एक 'राष्ट्र' आहोत का? कसे बनते एक राष्ट्र? राष्ट्र म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य चळवळीत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करू शकलो नाही का? विविध धर्म-वंश-जाती-भाषा-संस्कृती असणारा हा खंडप्राय भूभाग खरंच एक राष्ट्र बनू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. विद्यार्थ्यांसाठी, राजकीय नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी... प्रत्येक सजग भारतीय नागरिकासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तक राष्ट्राच्या शोधात भारत
-
Teen Divsanchi Narmada Parikrama (तीन दिवसांची नर्
नर्मदा नदी ज्याठिकाणी गुजरात मध्ये तिलकवाडा जवळ उत्तरवाहिनी वाहते त्याठिकाणची उत्तरवहिनी नर्मदा परिक्रमा. ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांचेसाठी तितकीच पुण्यदायी आणि आनंददायी पर्वणी. संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी.
-
Sunahare Geet (सुनहरे गीत)
हिंदी चित्रपट संगीत कायम प्रवाही राहत आले, बदलत आले आणि म्हणून प्रत्येक पिढीला त्यांची त्यांची नवीन गाणी मिळत राहिली आहेत. गाणी येतात, गाजतात, कानाआड जातात. मात्र, बदलांचे प्रवाह पचवून आजही तेवढेच लोकप्रिय असलेले संगीत ढोबळमानाने १९५० ते १९७५ या पंचवीस वर्षातले! हजारो वेळा या काळातील गाण्यांवर बोलले गेले, लिहिले गेले असले तरीही कोणी या गाण्यांविषयी, त्यांच्या कर्त्याविषयी नव्याने लिहितो तेव्हा आपण त्याच रसिकतेने वाचतो. ती गाणी आठवतो आणि गुणगुणतोही. पद्माकर पाठकजी यांच्या पुस्तकातील लेख वाचताना तसेच होते.
-
Afsana Likh Rahi Hoo (अफ़साना लिख रही हूँ)
एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू! अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई. चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं… अफ़साना लिख रही हूँ!
-
Jagala Pokharanari Davi Valavi (जगाला पोखरणारी डाव
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणाऱ्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा.
-
JRD - Ek Chaturastra Manus (जेआरडी - एक चतुरस्त्र
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला. नीतीमूल्यांची बूज राखत व्यवहार, उद्योग चालवणारे हात अन् मने जपणे, समाजातून मिळवलेली संपत्ती समाजाच्या विकासासाठी वापरणे, उद्योग उभा असलेल्या परिसराचा विकास ही टाटा उद्योगसमूहाची संस्कृती आहे. नव्याचे स्वागत करत जेआरडींनी अनेकजणांना घडवले, नव्या वाटा खोदल्या, नवे मापदंड निर्मिले. त्यांना लाभलेला उज्ज्वल वारसा, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, नवे आयाम मिळत विकसित झालेले त्यांचे समृद्ध, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व याची ओळख या पुस्तकातील लेख करून देतात. विशेषत: अनेकविध भूमिकांना पुरून वर दशांगुळे उरणारा त्यांच्यातील सहृदय, रसिक, संभाषण चतुर, आनंदी ‘माणूस’ वाचकाला अधिक भावतो.