-
Aadaranjali (आदरांजली)
विविध क्षेत्रांमध्ये अनेक कर्तबगार होऊन गेले. अलीकडे अनेक चांगल्या व्यक्ती हे जग सोडून गेल्या. खूप लोकप्रिय अशा. सर्वच नसतील, पण गुणी नक्कीच होत्या. काही तर थोड्याशा ‘‘खल’’ म्हणता येतील अशा होत्या. पण त्यांच्यात सुद्धा काही चांगले गुण होते. ज्या व्यक्तींची नक्कीच समाज दखल घेऊन होता. अशा व्यक्तींचे निधन झाल्यावर त्यांच्यावर लिहिण्याची संधी लेखकाला मिळाली. ते मृत्यू लेख प्रसिद्ध झाले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे ‘‘आदरांजली’’ हे पुस्तक होय. थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारचे लेख म्हणजे त्या व्यक्तीला वाहिलेली श्रद्धांजली... आदरांजली असते. त्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याचा तो एक मार्ग असतो. तो मार्ग चोखाळत हे लेख लिहिले गेलेत आणि त्याचे पुस्तक तयार करून आदरांजली वाहिली आहे. ही गेल्या काही वर्षात गेलेल्या गुणी माणसांची दखल आहे आणि त्यांच्या स्मृतींची उजळणी आहे. खूप काळ गेलेला नसूनही ह्यातील काही व्यक्ती लगेच विस्मृतीत गेल्याचे लेखकाला हे पुस्तक तयार करताना जाणवले.
-
Narayaniya-Nivadak Na.Ga.Gore(नारायणीय-निवडक ना. ग
आतापर्यंत मी कोणालाही गुरु केलेले नाही, गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे त्यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षू असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परीस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. - ना. ग. गोरे
-
Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V K
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली. शिक्षण म्हणजे सर्वस्व नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झालेले पाहिले. आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी आपली कुवत जाणली होती त्याचबरोबर आपली ताकद ही पूर्णपणे जोखली होती. त्यांच्या ध्येयाच्या वाटेवर कोणकोणती आव्हाने आहेत? कोणते धोके पत्करावे लागतील? हे ते ओळखून होते. शिक्षणाची संधी जरी हुकली तरी, त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. तो उत्तरोत्तर वाढतच गेला. संकटाचे संधीत रूपांतर करणे आणि आपली प्रगती करणे, ही शिकवण आजच्या युवा पिढीला त्यांच्या चरित्रातून घेता येण्यासारखी आहे.