-
Karunecha Swar (करुणेचा स्वर)
22 मे 2016, या दिवशी डॉ.किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपालपदी निवड झाली. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेत असताना त्यांचं ध्येय पक्कं ठरलं होतं. पॉंडिचेरीला संपन्न राज्यात परिवर्तित करणं आणि तिथल्या जनतेची सेवा करणं. हे ध्येय साध्य करताना राज्यपाल हा नामधारी असतो, हा आजवरचा रबर स्टॅम्प त्यांनी मिटवून टाकला आणि नवा इतिहास घडविला. सामान्य जनतेसाठी राजभवनचे दरवाजे खुले केले. त्यांच्यातील करुणेनं जनतेचं मन जिंकलं. करुणेला दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्यांना करुणेचं महत्त्व पटवून दिलं. डॉ.किरण बेदी यांच्या करुणामयी कारकिर्दीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक.
-
Aaji Ajobanchya Potaditlya Goshti (आजी आजोबांच्या
2020 सालात कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची दारं बंद केली. राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. इकडे शिगावला आजी-आजोबांच्या घरी नातवंडांसह कमलु आजीचा प्रवेश झाला. नातवंडांनी या काळात आजीआजोबांना अनेक कामांमध्ये हातभार लावला. पण त्याचसोबत त्यांच्यासाठी गोष्टींचं एक अफलातून जग खुलं झालं. राजा-राणी, जादुमंतर, प्राण्यांचं गमतीदार जग या गोष्टींच्या रूपाने मुलांनी अनुभवलं. आणि त्यांची टाळेबंदीतील सुट्टी खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी ठरली. एकदा हाती घेतल्यावर संपवूनच खाली ठेवावं, असं दमदार, खुसखुशीत पुस्तक.
-
Shelka Saj (शेलका साज)
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
-
Moravala (मोरावळा)
हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!
-
Mauli (माऊली)
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी
-
The Picture Of Dorian Gray (द पिक्चर ऑफ डोरियन ग्र
डोरियन ग्रे...अंतर्बाह्य सुंदर असलेला विशीचा तरुण... बेसिल हॉलवर्ड या चित्रकाराने डोरियनचं चित्र रेखाटलंय...बेसिलचा मित्र लॉर्ड हेन्री आणि डोरियनची भेट होते... डोरियन हेन्रीच्या प्रभावाखाली येतो...तो नाटकात काम करणाऱ्या सिबिलनामक सुंदर युवतीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्नही ठरवतो...पण एका प्रयोगात सिबिल खूपच वाईट अभिनय करते आणि तो प्रचंड संतापतो...तिच्याशी भांडून थिएटरमधून बाहेर पडतो...त्याच रात्री सिबिल आत्महत्या करते...ती बातमी कळल्यावर डोरियन विव्हळ होतो...पण काहीच क्षण...या प्रसंगानंतर सुरू होते डोरियनची आत्मिक अधोगती...काही लोकांच्या विनाशाला, आत्महत्येला तो कारणीभूत ठरतो...व्यसनं आणि स्त्रियांच्या मोहपाशात गुरफटतो...चिरतारुण्याचा वर मिळाल्यामुळे ही अधोगती चालूच राहते...इतकी की तो बेसिलचाही खून करतो...त्याच्या या अधोगतीचे पडसाद त्याच्या चित्रावर उमटतात...त्याचा चित्रातला चेहरा विद्रूप होतो...मनोवास्तवाचं प्रभावी चित्रण द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे.
-
Ukhadleli Zade(उखडलेली झाडे)
उखडलेली झाडे` या संग्रहात आनंद यादवांची कथा विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटते. ग्रामीण भागातील वर्तमान वास्तवाचे, समाज मनाचे, शहर व खेडे यांच्या अनेकविध संबंधांचे यादवांचे भान इथे प्रखर आणि मर्मभेदी झालेले जाणवते. ग्रामीण भागात सुधारणांच्या हेतूने आलेले शिक्षण, उद्योगीकरण, विकास योजना, पाणी योजना, पंचायतपरिषदा, ग्रामविकास, शेतीविकास इत्यादींचा ग्रामीण जीवनावर प्रत्यक्षात कसा विपरीत आणि विकृत परिणाम होत चालला आहे आणि त्यात सगळा अधस्तरीय ग्रामीण समाजच कसा पिळून, भरडून निघत आहे, कायमचा उखडला जात आहे याचे अस्वस्थ करणारे अतिशय कलात्म दर्शन ते घडवीत आहेत. याचबरोबर एकूण मराठी समाजातील जाती-वर्गांचे परस्पर संबंध, शहर आणि खेडे, बुद्धीजीवी मध्यम वर्ग यांचे सांस्कृतिक नातेही ते शोधू पाहत आहेत. त्यांचा हा संग्रह म्हणजे `वर्तमान मराठी खेड्यावरचे` आणि त्या संदर्भात एकूणच मराठी समाजावरचे प्रातिनिधिक भाष्य वाटावा, अशा योग्यतेचा आहे. - डॉ. दत्तात्रय पुंडे.
-
Panbhavare (पाणभवरे)
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)
-
Aadital.. (आदिताल)
‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या तालातूनच निर्माण झालेली सृष्टीची लयकारी... त्याला आदिताल सापडल्यासारखं वाटलं.’
-
Ugvati Mane (उगवती मने)
मानवी जीवनात ‘मूल’ या घटनेला एक अजोड स्थान आहे. वंशसातत्याचं मूळ रुजणं म्हणजे मूल असणं. मूळ म्हणजेच मूल. ते असेल तरच संसारवृक्ष बहरतो, फुलतो आणि फळाला येतो. नसेल तर कोमेजतो, वाळतो, निष्पर्ण होऊन शेवटी नष्ट होतो. मूल असणं म्हणजे स्वत:च पुन्हा नव्यानं जन्माला येणं. नवं शरीर, नवं मन घेऊन पुन्हा जगण्यास प्रारंभ करणं. कुणाचं तरी आईबाप, बहीणभाऊ होऊन जगणं, हे आपल्या सड्याफटिंग, एकट्या जगण्यापेक्षा किती वेगळं असतं, याचे पडताळे येऊन आपण रसिक इथं थरारून जातो; समृद्धही होतो.
-
Akherchi Ladhai (अखेरची लढाई)
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.
-
Bhumikanya (भूमिकन्या)
ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाऱ्या, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत. भूमिकन्यांचे शोषण त्यांच्या जन्मापासूनच सुरू असते. "मुलगी जन्मल्याचे" दु:ख घरादाराला मनोमन होते. तेव्हापासूनच मुलगीच्या आयुष्याची काळजी तिच्या आईला विशेष घेरते. अपुऱ्या जीवनसुविधांच्या कुटुंबात तर बालिका, कुमारी, युवती, गृहिणी, वृद्धा या सर्वांनाच अपुरेपणाची, अभावग्रस्ततेची आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक उपासमारीची झळ सतत आणि जास्तीत जास्त सोसावी लागते.
-
Khalal (खळाळ)
आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती. कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला. त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती, दीनदुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ हे सर्व गुण जातिवंत व कसदार होते पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा असा उत्कट ध्यासही त्यांना होता. या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामथ्र्यांची कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले. या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला. या शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले. मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे....’’ प्रा.म.द. हातकणंगलेकर
-
Gavati Samudra (गवतीसमुद्र)
‘द सी ऑफ ग्रास’ या इंग्रजी कादंबरीचा ख्यातनाम कवयित्री आणि अभ्यासू लेखिका शान्ता शेळके यांनी केलेला ‘गवती समुद्र’ हा हृद्य अनुवाद आहे. ही साधी-सोपी गोष्ट आहे अमेरिकेतील सॉल्ट फोर्वÂ या गावातली. ल्यूटी कॅमेरॉन- जॉय ब्यू्रटन-जिम ब्य्रूटन या तीन प्रमुख पात्रांभोवती ही कथा गुंफली आहे. जॉय ही कथा आपल्याला निवेदन करतो. कर्नल जिम उंचापुरा- भारदस्त- शिस्तप्रिय- सर्वांवर करडा वचक असलेला सदगृहस्थ असतो. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या कुरणात जॉयच्या काकाचा पशुपालनाचा व्यवसाय असतो. हे कुरण जिमने निर्वासितांच्या वसाहतीसाठी द्यावे, यासाठी कोर्टात केस सुरू असते. सरकारी वकील ब्राइस चेम्बरलेन याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे हे विशाल कुरण निर्वासितांच्या वसाहतीसाठी देण्यासंबंधी सूतोवाच केलेले असते. जॉयच्या काकाचे- कर्नल जिमचे- ल्यूटीशी लग्न होणार असते. ल्यूटी शिक्षणासाठी जॉयला शहरात पाठवण्याची व्यवस्था करते. त्यामुळे जॉयच्या मनात होणाऱ्या काकूविषयी गैरसमज निर्माण होतो. काकाच्या आदेशानुसार तो तिला आणायला रेल्वे स्टेशनवर जातो. ल्यूटीची साधी, सुंदर छबी आणि मनमोकळा स्वभाव पाहून जॉयच्या मनात तिच्याविषयी आदरयुक्त आकर्षण निर्माण होते. कुरणाविषयी कोर्टात सुरू असलेली केस सुरुवातीला कर्नल जिंकतो. दरम्यान कर्नल-ल्यूटीच्या संसारवेलीवर ब्रॉक-जिमी ही दोन मुले आणि सारा बेथ ही मुलगी अशी तीन फुले उमलतात. कर्नलचा कुरणावरील वसाहतीला विरोध पाहून ल्यूटी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपले मातृवत छत्र दुरावल्यामुळे जॉयला दु:ख होते. कर्नल मात्र निर्धाराने हा धक्का पचवतो. बघता बघता १५ वर्षे उलटतात. कर्नलची मुले मोठी होतात. थोरला ब्रॉक बेफिकीर वृत्तीचा... आईसारखा देखणा असतो. त्याला जुगार आणि दारूचे व्यसन जडते. जॉय मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होतो. रुग्णांची सेवा करण्यासाठी तो गावी परततो. जुगाराच्या पबमध्ये झालेल्या भांडणात ब्रॉककडून एकाचा खून होतो. जज्ज झालेला चेम्बरलेन त्याला जामिनावर सोडवतो. चेम्बरलेन आणि ब्रॉकमधील साम्यामुळे ल्यूटी आणि चेम्बरलेन यांच्याविषयी प्रवाद निर्माण झालेला असतो. डॉ. जॉयला एका अत्यवस्थ रुग्णावर उपचारासाठी बोलावण्यात येते. तो ब्रॉक असतो. पुÂप्पुÂसात गोळी घुसल्यामुळे तो अखेरच्या घटका मोजत असतो. अचानक ल्यूटी परत येते. जॉयच्या दृष्टीने तो सुखद धक्का असतो. तिचा मुलगा ब्रॉक याच्या मृत्यूची बातमी तिला कशी सांगायची, कठोर काका कर्नलची ल्यूटी परत आल्यानंतरची प्रतिक्रिया कशी असेल, १५ वर्षे आपण कोठे होतो यावर ल्यूटीचे स्पष्टकरण कसे असेल, असे थरारक प्रश्न जॉयपुढे निर्माण होतात. पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कवयित्री असलेल्या शान्ताबार्ईंच्या हळुवार लेखणीतून उतरलेली ‘गवती समुद्र’ ही कादंबरी वाचायला हवी... नातेसंबंधामधील गोडवा काव्यमय गद्यातून वाचकांना अनुभवायला मिळेल, यात शंकाच नाही...
-
Saprshkamale (स्पर्शकमळे)
शृंगारिक वाङ्मयात स्त्रीला भोगलालसेच्या पलीकडे आणखी एक नितान्तसुंदर अस्तित्व असते. आस्वादाच्या पातळीवर तिच्या अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवता येते. आस्वादाच्या पातळीवर स्त्रीचे विविध रूपांतील सौंदर्य आविष्कृत करावे, या प्रेरणेने या संग्रहातील ललितलेख लिहिले आहेत. कधी ती बालअप्सरेच्या रूपात भेटेल, तर यौवनमुग्ध, ललितगात्रा मदनिकेच्या स्वरूपात जाणवेल, कधी ती नऊवारीतील खानदानी, कुलीन स्त्री होऊन येईल, तर कधी सहावारीतील धीट, नागर ललना होऊन भेटेल; आणि कधी आदिमायेच्या मूलभूत रूपात सखी, प्रिया, पत्नी, जननी यांसारख्या विविध नात्यांनी पुरुषाचा सांभाळ करणारी दैवी शक्तीही असेल. स्त्रीची अशी अनेकविध रूपे जेव्हा रसिक पुरुषमनाला सामोरी येतात, तेव्हाच असे ‘स्पर्शकमळे’ मधील शृंगारसमृद्ध ललित लेख घडतात.
-
City Of Bones (सिटी ऑफ बोन्स)
हॉलिवूड हिल्समधे एका कुत्र्याला हाड मिळते आणि त्यामुळे वीस वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटते . तसे हे प्रकरण नेहमीसारखेच ,भावनाशून्य ,पण त्यामुळे डिटेक्टिव्ह हॅरी बॉशच्या लहानपणीच्या ,तो अनाथ असण्याच्या आठवणी जाग्या होतात . आपल्या तपासात बॉश भूतकाळात जातो खरा ,पण त्याचवेळी ,पोलिसदलात नव्याने दाखल झालेली सौंदर्यवती त्याला भानावर आणते. चौकशीकाळात हे प्रकरण अनेक धक्के देते . बॉशची त्यासाठी तयारी झालेली नसते. अचानक लॉस एंजलिस शहरात रान उठते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी झगडणारा बॉश,कल्पनादेखील करता येणार नाही अशा निर्णयाप्रत येतो..
-
Origin (ओरिजिन)
गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक...प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध... पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या... हल्लेखोराचं पलायन... तो असतो नौदलातील माजी अधिकारी... कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग... पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान... अॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा... कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात...एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी...
-
Besharam (बेशरम)
तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी स्थलांतरितांच्या जीवनाची चित्तरकथा आहेण् आपली जन्मभूमि सोडून परक्या मुलखातए जगभरच्या कानाकोपऱ्यातए वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला रूजवू पाहणाऱ्यांची ही गोष्ट आहेण् अर्थात तसलिमा यांनी स्वतः हे आयुष्य जवळून अनुभवलेले आहेण् म्हणूनच स्वतः तसलिमा यांचं जगणंही यात प्रतिबिंबित होत राहतंण् त्यांच्या ष्लज्जाष् कादंबरीमुळे त्यांना कट्टरपंथी लोकांनी देश सोडायला लावलाण् लज्जामध्ये अनुभवाला येणाऱ्या प्रसंगांचीच पुढील आवृत्ती या कादंबरीत पाहायला मिळतेण् तसलिमा यांनी मोठा काळ देशाबाहेर व्यतित केला आहेण् आपली मूळे उखडली जाण्याची ही वेदना या कादंबरीत प्रकर्षाने येतेण् कादंबरीची सुरुवातच एका भेटीने होतेण् लज्जा कादंबरीतील पात्र असणारा सुरंजन लेखिकेला अचानक भेटायला येतोण् हा तोच सुरंजन असतोए जो लज्जा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेण् लेखिका या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की सुरंजन आणि त्याचे कुटुंब बांगलादेशातील 1993मधील सांप्रदायिक दंगलीवेळी स्वतःचा बचाव करत भारतात येण्यात यशस्वी झाले होतेण् या भेटीत लेखिकेला कळतं की सुरंजनचे वडील सुधामय यांचे निधन झाले आहेए तर त्याची आई आणि बहीण जिवंत आहेतण् या भेटीत सुरंजनच्या स्थलांतराचे गोष्ट समोर येतेण् या दोघांच्या संवादातून एकेक धागा उलगडत जातोण् याच धर्तीवर लेखिकेला एकेक पात्र भेटत जातेण् आणि त्यांच्या कथा समोर येत जातातण् हे पुस्तक कट्टरपंथीयांची बेशरमी वृत्ती अधोरेखित करत त्या विरोधात आवाज उठवण्याच्या संभावनांची चाचपणी करतंण् पण हे पुस्तक राजकीय नाहीए तर सामाजिक स्तरावरील स्थितीबाबत अधिक निवेदन करतंण् लेखिका अर्थात तसलिमा यांना सुरंजनए किरणमयीए माया आणि जुलेखा ही चार पात्र भेटतातण् आणि या पात्रांसोबतचा संवाद कादंबरी प्रवाहित करतोण्
-
I.C.184 Apaharnache 173 tas (आय.सी.८१४ अपहरणाचे १७
इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय्. सी. च्या सुमारे २०० प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचाNयांच्या दृष्टीने तो एक नरकाचा प्रवास होता... बंदिवासातील त्या आठ दिवसांमध्ये त्यांच्यांतील प्रत्येकाने नानाविध मानवी भावभावनांचा भयभीषण अनुभव घेतला. आपल्या परीने असाच अनुभव त्यांच्या अपहरणकत्र्यांनी घेतला. त्या बुरखाधारी अपहरणकत्र्यांनी स्वत:ची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर आणि भोला अशी घेतली होती. या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण अपहरणनाट्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यातील एकेक अनुभव रसरशीत, जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो. त्या १७३ तासांतील तो मानसिक ताण, ती दहशत आपल्याला वेगळ्याच भयावह जगात घेऊन जाते. मग ते काठमांडू असो, नाहीतर अमृतसर, दुबई असो, की वंÂदाहार! नवी दिल्ली येथील, सत्तावेंÂद्रे आणि अर्थात विमानांच्या अंतर्भागाचाही या अपहरणनाट्यात समावेश आहे. अपहरणाची ती संपूर्ण धाडसी योजना आखण्यापासून ते ती पूर्णपणे पार पडेपर्यंतचे सर्व दुवे एकसूत्राने गुंफण्यात आले आहेत... — आणि अखेर अपहरणकर्ते पाकिस्तानात जाऊन कसे भूमिगत होतात, त्याचेही दर्शन या पुस्तकातून घडवण्यात आले आहे.
-
Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
नैराश्य ही सबंध जगाला भेडसावणारी समस्या. दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली असते. नैराश्यातनं होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. पण तरी मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. हे पुस्तक नैराश्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरचं आपलं मौन सोडायला लावतं. डॉ. शैलजा सेन यांचा मानसिक आरोग्यातला प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या केसेस गोष्टरूपात या पुस्तकात समोर येतात. या गोष्टीतून आणि रूग्णांसोबतच्या त्यांच्या संवादातून प्रत्येकाला आपल्या मानसिक दुखण्यावरही इलाज सापडत जातो. मानसिक अनारोग्याबाबतची लांच्छनाची भावना, लाज यांच्याविरोधात आवाज उठवत हे पुस्तक तुम्हाला समजून घेणारी मैत्री बहाल करतं.