-
Dusare Jagatik Mahayuddha (दुसरे जागतिक महायुद्ध)
पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमुळे जर्मनीची दुर्दशा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जर्मन तरुणांच्या मनात सुडाचा अंगार पेटला होता. अशा परिस्थितीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर पार्टीची स्थापना झाली. त्याचा पुढारी म्हणून हिटलरची निवड झाली. त्याने कपटाने जर्मनीचं अध्यक्ष आणि पंतप्रधानपद मिळवलं. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हॉलंड, बेल्जियम, इटली, आफ्रिका इ. अनेक राष्ट्रांचा युद्धात सहभाग होत गेला. ते युद्ध कशा तर्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसर्या शहरावर काय परिणाम झाले, या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी इ.), त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले/वाईट परिणाम, सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ इ. माहिती इत्थंभूतपणे देणारं पुस्तक आहे ’दुसरे जागतिक महायुद्ध.’
-
Pahile Jagatik Mahayuddha (पहिले जागतिक महायुद्ध)
ऑस्ट्रियाच्या युवराजाचा बोस्नियन तरुणाने केलेला खून ही घटना पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरली. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर आणून तो देश घशात घालायचा होता, तसेच रशियन रेल्वे पूर्ण होण्यापूर्वी फ्रान्स आणि रशिया या दोन्ही देशांशी युद्ध करून त्यांचा पराभव करायचा होता; पण ऑस्ट्रिया व सर्बियादरम्यान छोट्या प्रमाणावर सुरू झालेले हे युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपभर पसरले. तसेच पुढे युद्धाची खुमखुमी, युद्धठास्त देशांना पाठिंबा आणि विरोध, या व अशा इतर अनेक कारणांमुळे त्या युद्धात तुर्कस्तान, इटली, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका आदी देशांचाही प्रवेश झाला. हे युद्ध जरी युरोपात झाले असले तरी जगातील बहुतेक सगळ्याच देशांना त्याची या ना त्या कारणाने झळ पोहोचली. पहिल्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी व कारणे, नानाविध कारणांमुळे त्यात सहभागी झालेले लहान-मोठे देश, लढाईचे वैविध्यपूर्ण प्रासंगिक वर्णन आणि परिणामांचा सार्थ आढावा.
-
Corpokshtera (कॉर्पोक्षेत्र)
महाभारताच्या कथेला आधुनिक साज चढवत व्यावसायिक पार्श्वभूमीवर ‘कॉर्पोक्षेत्र’ ही कथा घडते. त्यामुळे जुन्या हस्तिनापूर साम्राज्याचे रूपांतर ‘हस्तिनापूर एन्टरप्रायझेस’मध्ये होते. धृतराष्ट्र हा त्याचा अध्यक्ष बनतो. कृष्ण हा आधुनिक काळातला व्यवसाय सल्लागार म्हणून सामोरा येतो. वारणावत हे स्थळ ‘फॅमिली हॉलिडे होम`चे रूप घेते आणि हे सर्व नाट्य घडते ते व्यवसायातल्या भागभांडवलावर हक्क सांगण्यासाठी! हस्तिनापूर एन्टरप्रायझेसभोवती फिरणारं हे नाट्य महाभारतातील व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्यं कायम ठेवत घडतं. त्यामुळे महाभारतातील गुंतागुंत याही पुस्तकात प्रभावीपणे चित्रित झालेली दिसते.
-
Yashasvi Netrutva (यशस्वी नेतृत्व)
जगातल्या राजकीय आणि व्यावसायिक घडामोडींमधून आपल्याला नेतृत्वाचे महत्त्व उलगडते. जेव्हा ते नसते, तेव्हा सारे अस्ताव्यस्त होते. जेव्हा ते प्रेरित करते, तेव्हा गोष्टी सुधारतात. या पुस्तकाचा हेतू हा चांगल्या लोकांना मूळ तत्त्व सादर करून नेता होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश करत, प्रशिक्षण आणि प्रयत्नांनी कौशल्य प्राप्त करण्याचा मार्ग हे पुस्तक दाखवते. नम्रपणा, अननुभव किंवा साशंकता जरी मार्गात येत असली, तरी कुणीही नेता बनू शकते. या पुस्तकात सांगितलेला हा सात दिवसांचा कार्यक्रम वाचकांना त्यांची बलस्थाने ओळखून त्यावर निर्भर राहण्याचे मार्गदर्शन करतो. तसेच तो त्यांच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करून त्यावर चांगल्या पद्धतीने मात करण्यास मदत करतो. तथापि, जबाबदारी अंगावर घेणे, हे कधीच सोपे नसते. आठवडाभराच्या या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी नेतृत्वापुढील आव्हाने आणि फायदे यांचे स्वरूप विशद केले आहे.
-
Kasheer (कशीर)
काश्मिरच्या धगधगत्या होमकुंडाला कथात्म साहित्यात गुंफत ही कादंबरी देशातला एक महत्त्वाचा विषय कुशलतेने हाताळते. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, या तपशिलाचा शोध ही कादंबरी घेते. बशीर अहमद, त्यांचा मुलगा अन्वर, ड्रायव्हर सलीम यांसारखी धर्माच्या सीमा ओलांडून पाहणारी पात्रं, पुरातन वेदान्तात आजच्या समस्येवरचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित; काश्मीर सोडून जम्मूला आलेल्या बांधवांना लुटणारे हिंदू घरमालक, अशा अमानवी परिस्थितीत दांपत्य-जीवनाची फरफट होत असतानाही दांपत्य-जीवनातलं मूल्य जपणारे संजीव आणि आरती कौर अशा पात्रांच्या माध्यमातून काश्मीर नव्याने समजत जातो.
-
Asa Asava Baap (असा असावा बाप)
सर्वोत्तम पिता बनण्यासाठीचं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. पिता होण्याचा खराखुरा अर्थ...माता-पित्याच्या संगोपनातील फरक... मुलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचं संगोपन कसं करावं... आर्थिक स्थिती आणि मुलांचं संगोपन...मुलांना वेळ देण्यासाठी काय करावं...आई-वडील विभक्त झाल्यामुळे मुलांच्या मनावर होणारा परिणाम... पितृत्वाचा आनंद कसा उपभोगावा इ. मुद्द्यांसह या पुस्तकात सर्वोत्तम पिता बनण्यासाठी सखोल मार्गदर्शन केलं आहे आणि ते उपयुक्त आहे.
-
Kanbakth Nindar (कमबख्त निंदर)
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
-
The Missing (द मिसिंग)
शाळकरी डर्बी मॅककॉर्मिथ आणि तिच्या दोन खास मैत्रिणी. जंगलात पार्टीचा बेत आखतात. पार्टीसाठी प्रत्यक्ष जंगलात पोहचतातही. पण तिथं एक जीवघेणा थरार त्यांची वाट पाहत असतो. कुणीतरी खुनशी मारेकरी एका बाईचा खून करतो. या खुनाची साक्षीदार असलेली डर्बी आणि तिच्या मैत्रिणी कसाबसा जीव वाचवून पळतात. या घटनेच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर डर्बी एक धाडसी पोलीस अधिकारी झालेली असते. तिच्याकडं एका हत्यासत्राची सुत्रं सोपवली जातात. मध्यरात्री गायब होणाऱ्या बायका आणि त्यांचा मागमूसही मागं न ठेवणाऱ्या एका सायको किलरला शोधण्याचं काम सुरू होतं. आणि त्याचवेळी तिला भविष्यातलं अराजकही थांबवायचं असतं. या शोध मोहिमेत डर्बीचा वर्तमानकाळ तिच्या भुतकाळातल्या अनुभवांशी थरारक नाळ जोडू लागतो.
-
Mi Bhartiya (मी भारतीय)
इतिहासाची आणि मानवाच्या आदिमतेची पाळमुळं शोधणारं खातं म्हणजे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खातं. या खात्यात पुरातत्त्ववेत्ता म्हणून काम करताना के.के.मुहम्मद यांनी विलक्षण अनुभवांची शिदोरी जमा केली आहे. अयोध्येतलं वादग्रस्त उत्खनन असो की ताजमहल परिसरातला व्यापारी संकुल उभारणीचा तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींचा घाट उलथवून लावणं असो, मुहम्मद यांचा कार्यकाळ आव्हानांनी भरलेला आहे. यात अगदी चंबळच्या खोऱ्यातील डाकूंचा सामना करत वटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही प्रसंग आहेत. त्यामुळं हे आत्मकथन जणू भारतीय इतिहासाची सफर घडवत एका संशोधकाचा प्रवास मांडतं.
-
Anuchit (अनुचित)
माजी युएस मरीन कॅप्टन अनुराधा भगवती यांचं हे विलक्षण अनुभवकथन. आपल्या कठोर शिस्तीच्या भारतीय पालकांपासून मनाने दुरावलेली अनुराधा सैन्यात दाखल झाली. पण अमेरिकन नौदलातला स्त्री-पुरुष भेद आणि पुरुष सैनिक-अधिकाNयांकडून होणारं स्त्री सैनिकांचं लैंगिक शोषण, या गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं. तिची सैन्यातील कारकीर्द संपल्यानंतर स्वान या संस्थेमार्पÂत तिने यासंदर्भात आवाज उठवला. परिणामी अमेरिकी सैन्यातील जाचक अटीही बदलल्या गेल्या आणि अमुलाग्र बदल घडला आणि लढाईसंदर्भातील महिला अधिकाऱ्यांवरील बंदी उठवण्यात आली. अनुराधा यांच्या अनुभवांचं आणि त्यांच्या लढ्याचं हे दाहक दर्शन.
-
Amap Pani (अमाप पाणी)
द टाइम क्विन्टेट मालिकेतील हे चौथं पुस्तक. मरी कुटुंबातली मुलं आता मोठी झाली आहेत. सँडी आणि डेनीस ही जुळी मुलं तशी सर्वसामान्य मुलांसारखीच. पण पौगंडावस्थेतले हे दोघे आई-वडिलांच्या प्रयोगशाळेत असताना अनवधानाने एका चालू प्रयोगात ढवळाढवळ करतात आणि काळाच्या सीमा ओलांडून अतिप्राचीन काळातल्या निर्मनुष्य वाळवंटात जाऊन पोचतात. हा काळ असतो ‘नोहा आणि त्याचे जहाज’ या बायबलमधील पौराणिक गोष्टीतला...या काळाची वाट हरवलेल्या मुलांना पुढे अनेक बऱ्यावाईट अद्भुत प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यातला अप्रतिम कल्पनाविलास वाचकांना खिळवून ठेवतो.
-
Kalpatavaril Surkuti (कालपटलावरील सुरकुती)
वैज्ञानिक अद्भुतिकांमधील अफलातून कथानक म्हणजे हे पुस्तक. चार्ल्स वॉलेस वडिलांचा शोध घेत एका राक्षसी ग्रहावर पोहचतो. तिथलं सर्व जीवनमान ‘इट’ या आक्रमक शक्तीचे गुलाम बनले आहे. या आक्रमक शक्तीपासून पृथ्वीची आणि पर्यायाने आपल्या वडिलांचीही सुटका करण्यासाठी चार्ल्सचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात त्याची बहीण मेग, तिचा मित्र केल्विन आणि तीन अद्भुत व्यक्तीरेखांची त्याला साथ मिळते आहे. या अद्भुत व्यक्तीरेखा चार्ल्सला मार्ग तर दाखवतातच, पण आपल्या कारनाम्यांनी कथानकात रंगतही भरतात.
-
Vegane Kalnara Graha (वेगाने कलणारा ग्रह)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे तिसरं पुस्तक. पंधरा वर्षांच्या चार्ल्स वॉलेसपुढं नवं आव्हान ठेपलं आहे. ते आव्हान आहे, मॅड डॉग ब्रॅन्झिलोच्या विनाशकारी विचारांपासून पृथ्वीला वाचवण्याचं. या कामी चार्ल्सला सोबत लाभलीय एका एकशिंगी अद्भुत घोड्याची. चार्ल्सच्या या कालप्रवासात त्याला इतिहासातल्या व्यक्तीरेखांच्या आत प्रवेश करून भविष्यात विनाशकारी ठरणाऱ्या विचारांना थोपवायचं आहे. आशा आणि विश्वासाच्या रूजवणीचा हा चार्ल्सचा प्रवास एका अद्भुतिकेला जन्म देणारा आहे. ज्यात त्याची बहीण मेग कायथिंग करून चार्ल्सचं मनोबल वाढवण्यासाठी सज्ज आहे.
-
Anukul Kaal (अनुकूल काळ)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे पाचवं पुस्तक. पॉली ओ’कीफ नुकतीच तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहायला आलेली असते. तिचे आजोबा-आजी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अॅलेक्स आणि केट मरी. पॉली तिच्या वर्तमानकाळापासून तीन हजार वर्षे आधीच्या भूतकाळात भरकटत जाते. ‘बहुतेक तो अपघात नसावाच’ असं तिला दोन ड्रूइड्स सांगतात. ते तिला सांगतात : ‘जेव्हा जेव्हा काळाचं द्वार उघडतं, तेव्हा तेव्हा त्याला निश्चित कारण असतं’. पॉली आणि तिचा गंभीर आजारी मित्र झॅकरी, भूतकाळात गेल्यावर लगेच काळाचं दार बंद होतं, तेव्हा त्यामागचं कारण स्पष्टपणे समजू लागतं. काळाचं दार पुन्हा खुलं होईपर्यंत अशा निराशाजनक काळात पॉली स्वत:ला आणि झॅकरीला जिवंत ठेवू शकेल का? ते दार उघडलं तरच ते घरी परत येऊ शकणार आहेत.
-
Daratil Vadal (दारातील वादळ)
ए विंड इन द डोअर अर्थात दारातील वादळ हे द टाइम क्विन्टेट मालिकेतील दुसरं पुस्तक. मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसच्या धाडसाची ही नवी कहाणी. पण यात मेगचा मित्र कॅल्विनचीही प्रमुख भूमिका आहे. या गोष्टीत काल्विन मेगचा पाठीराखा आणि सोबती म्हणून खऱ्या अर्थाने समोर येतो. पृथ्वीच्या विनाशावर टपलेले इक्थ्रॉय आणि प्रोगिनॉस्कीसच्या मदतीनं मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसनं त्यांच्या विरोधात दिलेल्या लढ्याची ही गोष्ट. प्रत्येक वेळी, जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होतो, तेव्हा आणखी एका इक्थ्रॉयनं लढाई जिंकलेली असते.
-
Benjamin Graham (बेंजामिन ग्रॅहॅम)
वॉरन बफे हे नाव ‘शेअरबाजारात अभूतपूर्व यश मिळवणारा मनुष्य ’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. अशा वॉरन बफेचा गुरू असलेला माणूस म्हणजे काय जबरदस्त प्रकार असेल! बेंजामिन ग्रॅहॅम हे त्याचं नाव. विलक्षण गरिबीतून वर आलेल्या ग्रॅहॅमनं आपल्या आईनं शेअरबाजारात केलेली गुंतवणूक पूर्णपणे बुडताना अनुभवली. अफाट बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी यांच्या जोरावर ग्रॅहॅमनं वैयक्तिक पातळीवर ही परिस्थिती साफ बदलून तर टाकलीच; पण शिवाय यशस्वी गुंतवणूक कशी करायची याचे वर्ग घ्यायलाही सुरुवात केली. भरपूर पैसे कमावून झाल्यावर तितक्याच शांतपणे ग्रॅहॅम गुंतवणुकीच्या विश्वातून आणखी लोभ न बाळगता बाहेर पडला. सगळ्यांना आपल्या ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ या संकल्पनेचा फायदा मिळावा आणि गुंतवणुकीच्या संदर्भातले बारकावे समजावेत यासाठी ग्रॅहॅमनं लिहिलेली पुस्तकं अजूनही ‘बेस्टसेलर’ मानली जातात. त्याचं ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक तर गुंतवणुकीचं बायबल म्हणूनच ओळखलं जातं. उलथपालथींनी भरलेलं अतिशय नाट्यमय आयुष्य जगलेल्या ग्रॅहॅमची ही कहाणी.
-
The Cut Out Girl (द कट आउट गर्ल)
दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंवरील अत्याचार म्हणजे मानवी क्रूरतेची परिसीमा. या क्रूरतेला आपली पोर बळी पडू नये म्हणून लिनच्या पालकांनी तिला दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवलं. फोस्टर कुटुंबानं तिला लपवलं आणि नाझीवादापासून तिचं संरक्षणही केलं. पण कालांतरानं तिला फोस्टर कुटुंबापासून दूर व्हावं लागलं. त्यानंतरच्या तिच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर झाली. तिनं मानवी विकृतीच्या कित्येक तऱ्हा अऩुभवल्या. फोस्टर कुटुंबाचा नातू अर्थात बार्ट व्हॅन एस तिच्या या हेलावून टाकणाऱ्या आयुष्याची गोष्ट सांगता सांगता दुसऱ्या महायुद्धानं घडविलेल्या वेदनादायी विध्वंसावरही प्रकाश टाकतात.
-
Vitamin Jindagi (व्हिटामिन जिंदगी)
ही कहाणी आहे एका दुर्दम्य इच्छाशक्तीची. वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओनं एक पाय निकामी केला, पण पोलिओ त्या मुलाच्या इच्छाशक्तीवर प्रहार करू शकला नाही. आयुष्यानं दिलेलं हे आव्हान त्या मुलानं पेललं. आणि आपल्या समस्येला संधीत रूपांतरित केलं. त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाधा. शरीराला जशी व्हिटामिन्सची गरज असते, तशीच मनाला आशा, प्रेरणा आणि साहसासारख्या व्हिटामिन्सची गरज असते. हेच व्हिटामिन्स ललित कुमार यांचं हे पुस्तक आपल्याला पुरवतं.
-
Krushnakanya (कृष्णकन्या)
गेली साठहून अधिक वर्षं रत्नाकर मतकरींचं कथालेखन अविरत चालू होतं. परीकथांपासून सुरू झालेली मतकरींची कथा, सर्वाधिक रमली, ती ‘गूढकथा’ या कथाप्रकारात. अडीचशेहून जास्त कथांद्वारे मतकरींनी गूढकथांना अफाट लोकप्रियतेबरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. आणि तरीही, त्यांचं सामाजिक कथालेखनही लक्षणीय राहिलं. या वास्तववादी सामाजिक कथांमधून मतकरी समाजातल्या विसंगतींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध सातत्यानं आवाज उठवत राहिले. शैली कोणतीही असो, मतकरींनी कायम शोधला, तो माणसातला ‘माणूस.’ म्हणूनच नियतीची चेष्टितं, काळ, मृत्यू अशा अनादि-अनंत संकल्पनांची चित्तवेधक रचना करीत वाचकाला गुंगवून टाकणाऱ्या मतकरींच्या वैविध्यपूर्ण कथा चिरस्मरणीय ठरल्या. ‘कृष्णकन्या’ ही मतकरींचा परीसस्पर्श असलेल्या अशाच अनोख्या कथांची अमूल्य भेट. मतकरींच्या शेवटच्या अप्रकाशित कथांपैकी निवडक कथा प्रथमच पुस्तकरूपात आणणारा संग्रह म्हणूनही ‘कृष्णकन्या’चं महत्त्व अनन्यसाधारण असंच.
-
Te Ekaki Ladhale (ते एकाकी लढले)
नाझी-व्याप्त फ्रान्समधील ब्रिटिश सिक्रेट एजंट्स स्टार बंधुची ही खरी कहाणी. जॉर्ज स्टार आणि जॉन स्टार हे सख्खे भाऊ चर्चिलने नाझींविरोधात स्थापन केलेल्या एसओईमध्ये सामील होऊन फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात काम करत होते. अर्थात त्यांना एकमेकांच्या आयुष्यात काय घडत आहे याची जराही कल्पना नव्हती. तो त्यांचा अगदी एकाकी संघर्ष होता. मदतीच्या सगळ्या स्रोतांपासून लांब राहून ते अगदी शत्रूच्या गोट्यात शिरून लढले. पकडले गेल्यास त्यांचा बचाव करणारंही कुणी नव्हतं. पण तरीही स्टार बंधुंनी इतिहासाच्या पानावर एका अशक्य कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचा अनेक ऐतिहासिक दस्तावेजातून घेतलेला हा सांगोपांग आढावा.
-
Shine Bright (शाइन ब्राइट )
प्रत्येकाला उद्योजक बनण्याची इच्छा असते. पण, केवळ याच मार्गानं तुम्ही प्रभाव टाकू शकता का? एखादा उद्योजक ज्या गोष्टी करू शकतो त्याच तुम्ही नोकरीच्या कक्षेत राहूनही करू शकत असाल तर? ‘शाइन ब्राइट’ अशाच काही प्रेरणादायी प्रवासांचा लेखाजोखा सादर करतं, जे एकाचवेळी कष्टसाध्यही आहेत आणि समाधान देणारेही आहेत. कोणत्याही नोकरीत तुम्ही ‘अडकलेले’ नसता, तुम्हीही बदल घडवू शकता– एक ‘उद्योजक’ बनू शकता...हा विश्वास हे पुस्तक रूजवतं.
-
Bhartiya Sainik (भारतीयसैनिक)
पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.
-
Where Egles Dare (व्हेअर ईगल्स डेअर)
कडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...