-
Georges Secret Key To The Universe (जॉर्जेस सिक्र
‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ हे पुस्तक म्हणजे जॉर्ज या शाळकरी मुलाच्या अपूर्व धाडसाची आणि त्याच्या हुशारीची कथा आहे. जॉर्जच्या शेजारी एरिक नावाचे वैज्ञानिक राहायला येतात. त्यांची लहान मुलगी अॅनी आणि कॉसमॉस हा त्यांचा सुपर कॉम्प्युटर यांच्यासह ते राहत असतात. जॉर्जची एरिक आणि अॅनीशी घनिष्ठ मैत्री होते. ‘कॉसमॉस’मुळे अंतराळात जाणं एरिक आणि अॅनी यांना अगदी सहजसाध्य असतं. अॅनी एरिकच्या चोरून एकदा जॉर्जलाही अंतराळाची सफर घडवते. जॉर्जच्या शाळेतील एक शिक्षक डॉ. रीपर एरिकच्या विरोधात असतात. एरिकची दिशाभूल करून ते एरिकना अंतराळात पाठवतात आणि कॉसमॉसला चोरून नेतात. एरिकचा जीव धोक्यात आहे, हे जॉर्जला समजतं. तो एरिकना वाचवण्यासाठी काय करतो? डॉ. रीपर आणि एरिकमध्ये कोणत्या कारणामुळे शत्रुत्व असतं? जॉर्ज रीपरकडून कॉसमॉसला कसा हस्तगत करतो...याची उत्कंठापूर्ण कहाणी.
-
Fish Tales (फिश टेल्स)
फिश ! टेल्स’ अर्थात ‘फिश! कथा’ हा प्रेरणादायी कथांचा संग्रह आहे. पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेऊन मेरी जेनने आपल्या मरगळलेल्या विभागात कसं चैतन्य आणलं, ही कथा ‘फिश’मध्ये आहे. तर ‘फिश टेल’मध्ये पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेतल्यामुळे स्प्रिंट ग्लोबल कनेक्शन सव्र्हिसेस, युनिव्हर्सल फोर्ड टोयोटा, एक हॉस्पिटल आणि अन्य व्यक्तींनी घेतलेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे त्या व्यक्तींमध्ये आणि संस्थांमध्ये घडलेले सकारात्मक बदल याच्या कथा आहेत. स्टिफन सी. लन्डिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल हे तिघं फिश मार्केटमधील उत्साही वातावरणाने प्रभावित झाले. त्या वातावरणातून जाणवलेली चार तत्त्वं (चैतन्यपूर्ण सहभाग, सौख्याची अनुभूती, तन्मयता, समरसता) त्यांनी एका फिल्म डॉक्युमेंटरीद्वारे मांडली. त्यांच्या परिभाषेत ‘फिश फिलॉसॉफी’ असं नाव दिलं. त्यानंतर ही चार तत्त्वं अधोरेखित करणारी फिश फिलॉसॉफी त्यांनी ‘फिश’ नावाच्या पुस्तकातून कथारूपात मांडली. त्यामुळे ही फिलॉसॉफी जगभर पोहोचली. ज्यांनी या फिलॉसॉफीचा अवलंब केला, त्यांच्यात एक व्यक्ती म्हणून आणि संस्थेचे कर्मचारी म्हणूनही सकारात्मक बदल झाला आणि त्या सकारात्मकतेचं सु-फलित त्यांच्या पदरात पडलं. तर ज्यांना ही फिलॉसॉफी यशदायी, फलदायी ठरली त्यांनी आपले अनुभव या पुस्तकाच्या लेखकांना कळवले आणि त्या अनुभवांचं संकलन ‘‘फिश! कथा’मध्ये करण्यात आलं आहे. फिश फिलॉसॉफीमुळे एका कॉल सेंटरचं वातावरण कसं चैतन्यमय झालं आणि केवळ या फिलॉसॉफीमुळे ते एक वृद्धेचा जीव कसा वाचवू शकले, याच फिलॉसॉफीमुळे एका टोयोटा कंपनीतील वातावरण कसं चांगलं झालं आणि एका ल्युकेमिया झालेल्या माणसाच्या पत्नीला त्यांनी कशी मानवतावादी वागणूक दिली, तसेच हीच फिलॉसॉफी एका हॉस्पिटलमधील वातावरण प्रसन्न करण्यास कशी कारणीभूत ठरली आणि त्यामुळे मृत्यूच्या जवळ असणाऱ्या रुग्णांनाही कसा आनंद मिळाला, हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘फिश! कथा’ वाचलंच पाहिजे.
-
Fish (फिश)
वातावरणातील सकारात्मक ऊर्जा माणसाची कार्यक्षमता कशी वाढवते, याचा वस्तुपाठ देणारं हे पुस्तक आहे. एका छोट्याशा कथेतून हा वस्तुपाठ दिला आहे. मेरी जेन ही ‘फर्स्ट गॅरंटी फायनांशिअल’ या सिअॅटलमधल्या प्रथितयश कंपनीच्या ‘ऑपरेशन विभागा’त सुपरवायझर म्हणून काम करत असते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर मेरीच्या हसत-खेळत वागण्यामुळे आणि तिच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे एकूणच उत्साही वातावरण असतं. त्याच्या विरुद्ध वातावरण याच कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर असतं. या मजल्यावरील ऑपरेशन विभागाच्या हातात फर्स्ट गॅरंटीच्या सर्व व्यवहारांचं काम असतं. ‘विषारी ऊर्जेचा कचरा डेपो’ असं संबोधल्या जाणाऱ्या या विभागाची जबाबदारी मेरीवर सोपवली जाते. या विभागातील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये कशी सुधारणा करायची, या विचारात असताना मेरी पाइक प्लेस फिश मार्केटमध्ये जाते आणि तेथील उत्साही वातावरणाने प्रभावित होते. तेथील एक तरुण विक्रेता लोनी हे उत्साही वातावरण तिथे जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे आणि त्याचे फायदे तिला सांगतो. फिश मार्केटचं हे यशाचं सूत्र मेरी आपल्या विभागाला कसं लागू करते आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल घडवून आणते, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Fish For Life (फिश फॉर लाइफ)
मेरी जेन आणि लोनीची फिश मार्केटमध्ये भेट होते आणि नंतर त्यांच्यात प्रेमबंध निर्माण होतो. ते दोघं विवाहबद्ध होतात. ब्रॅड आणि सारा या मेरीच्या दोन्ही मुलांचाही लोनी मनापासून स्वीकार करतो. मेरीचं करियर बहरत असतं. लोनीने फिश मार्केट सोडून नर्सिंग कोर्स करायचा निर्णय घेतलेला असतो. मेरीचाही त्याच्या निर्णयाला पाठिंबा असतो; पण येवढं सगळं चांगलं चाललेलं असतानाही मेरी थोडी अस्वस्थ असते. कारण ती लोनीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसते. त्यातच तिच्या आईला विस्मरणाचा आजार जडल्याचं तिला समजतं. आईला आपल्या घरी राहायला आणावं असं तिला वाटत असतं; पण आई त्या गोष्टीला तयार होणार नाही आणि आईची जबाबदारी घेतल्यानंतर लोनीला वेळ देणं आपल्याला शक्य होईल का, लोनीची आईला इकडे आणायला काही हरकत तर नसेल ना, असे प्रश्न तिच्या मनात उभे राहतात; पण लोनीचा फिश मार्केटमधला मित्र वुल्फ याच्याशी बोलत असताना, तिला समजतं की वुल्फने वैयक्तिक जीवनातही फिश फिलॉसॉफीचा अवलंब केल्यामुळे त्याचा घटस्फोट टळला आणि तो व त्याची पत्नी आता सुखाचा संसार करत आहेत. वुल्फच्या अनुभवातून मेरीही फिश फिलॉसॉफीचा अवलंब कौटुंबिक पातळीवर करायचा निर्णय घेते आणि त्याबाबत लोनी, ब्रॅड आणि साराशी बोलते. त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मेरीला मिळतो. फिश फिलॉसाफीचा अवलंब केल्यामुळे मेरीच्या कौटुंबिक जीवनात कसे आनंदाचे झरे वाहायला लागतात, त्यासाठी आणि एक प्रसन्न, खेळकर अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.
-
Fish Sticks (फिश स्टीक्स)
रत एकदा फिश फिलॉसॉफीचं महत्त्व अधोरखित करणारं हे पुस्तक आहे. ऱ्होंडा ही गुड समारिटन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असते. तिची वरिष्ठ असलेल्या मॅडेलीनने त्या हॉस्पिटलमध्ये फिश फिलॉसॉफीचा अवलंब केलेला असतो. त्यामुळे हॉस्पिटलचं वातावरण चैतन्यमय झालेलं असतं; पण मॅडेलीन ते हॉस्पिटल सोडून जाते आणि त्या हॉस्पिटलची धुरा ऱ्होंडाच्या खांद्यावर येते. मॅडेलीनच्या वेळेला असणारा फिश फिलॉसॉफीचा प्रभाव आता कमी झाल्यामुळे स्टाफची कार्यक्षमता घटलेली असते. या गोष्टीसाठी ऱ्होंडा स्वत:ला जबाबदार धरत असते आणि त्यामुळे चिंतित असते. अशा वेळेला तिची मैत्रीण मार्गो तिला ‘ताकारा टू’ या लोकप्रिय रेस्टॉरंटची मालकीण मिसेस ईशीहाराचं प्रेरणादायी उदाहरण देते. ईशी ऱ्होंडाशी बोलून तिचं मनोबल वाढवते. ऱ्हीडा कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य आणणण्यासाठी प्रयत्न करायला सज्ज होते; पण त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाची व्हाइस प्रेसिडेंट म्हणून आलेली मेबेल स्कालपेल फिश फिलॉसॉफीला सक्त हरकत घेते. हॉस्पिटलचा डायरेक्टर असलेल्या फिललाही नाइलाजाने तिला दुजोरा द्यावा लागतो. त्यामुळे ऱ्होंडा नाराज होते. दरम्यान, ऱ्होंडाची मुलगी अॅन हिचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होतो आणि त्यावेळेला स्कालपेल ऱ्होंडाला मानसिक आधार देते आणि मग तिलाही फिश फिलॉसॉफीचं महत्त्व पटतं. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी रुग्णाबरोबरच हॉस्पिटलच्या स्टाफचंही मनोबल चांगलं असणं आवश्यक असतं. फिश फिलॉसॉफी माणसाच्या मूलभूत भावनांना कशी साद घालते, याचा प्रत्यय घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Think Yourself Gorgeous (थिंक युवरसेल्फ गॉर्जीयस)
सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा, वयात येणे आणि भावभावना या सर्वच गोष्टी अंतर्भूत असणारे ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे पुस्तक म्हणजे, तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा का वाटतो, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असुरक्षित का वाटते, हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आहे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल विश्वास वाटावा यासाठीचा सल्ला, अर्थपूर्ण माहिती आणि प्रत्यक्षात आणता येतील असे मार्गदर्शक मुद्दे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर वाटावे यासाठीही ते मदत करेल.
-
Secrets Of The Light (सीक्रेट्स ऑफ द लाइट)
डॅनियन ब्रिंकली आणि कॅथरिन ब्रिंकली या दाम्पत्याने लिहिलेल्या ‘सिक्रेट ऑफ लाइट’ या पुस्तकाचा विषय मृत्यूनंतरचे जीवन हा आहे. धर्म, देवावर विश्वास नसलेले, आध्यात्मिकतेचा गंध नसलेले, विवेकहीन, बेफाम आयुष्य जगणारे डॅनियन दोनदा मृत्यूच्या समीप जाऊन आले. त्यानंतर तणावमुक्ती केंद्रांची स्थापना करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी केले. ‘ट्विलाईट बिग्रेड’ची स्थापना केली. मृत्युशय्येवर असलेल्या देशातील सैनिकांना धैर्याने मृत्यूचा सामना करता यावा, यासाठी त्यांना मदत करणे हे या संघटनेच्या स्वयंसेवकांचे काम होते. गेली तीस वर्षे मृत्युशय्येवरच्या कित्येक व्यक्तींना ते त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती देतात. मृत्यूविषयी त्यांची भीती दूर करतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन सुकर करतात. परलोकातील आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याची सोपी पद्धत, त्याचसोबत पारलौकिक प्रकाशाच्या दिव्य आqस्तत्वांशी संपर्क साधण्याचा मार्गही त्यांनी दिला आहे. एकूणच, पारलौकिक जगाविषयीची माहिती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येकानेच काही ना काही केले पाहिजे असा संदेश देणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.
-
Angelas Ashes (अँजेलाज अँशेस)
आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पोकळ अभिमानात रमणाऱ्या आणि सतत वाढणाऱ्या पोरवड्याकडे दुर्लक्ष करून दारूत बुडालेल्या वडिलांमुळे वयाच्या चौथ्या वर्षापासूनच लिमरिकच्या गलिच्छ झोपडपट्टीत दैन्यावस्थेत हातातोंडाची गाठ घालण्यासाठी धडपडून आईला मदत करणाऱ्या- अमेरिकेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या फ्रॅंकच्या संघर्षमय बालपणाची कहाणी.
-
Life Without Limits (लाइफ विदाउट लिमिट्स)
निक व्होयचिच यांना जन्मत:च हात-पाय नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात नकारात्मक विचार येत. एकदोनदा त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला; पण नंतर मात्र आपल्या व्यंगावर मात करत ते जीवनाला सामोरे गेले आणि त्यांचं जीवन आनंदाने, समाधानाने, यशाने भरून गेलं. ही यशोगाथा त्यांनी ‘जीवन अमर्याद’ या पुस्तकातून छायाचित्रांसह मांडली आहे. निकच्या जन्मानंतर त्याला स्वीकारायलाही त्याच्या आईवडिलांना वेळ लागला; पण नंतर त्यांनी वेगवेगळ्या सोयी करून निकला स्वावलंबी बनवलं. बद्धिमत्ता आणि जिद्द यांच्या जोरावर निकनी चांगलं शिक्षण घेतलं. त्यांच्यावर चित्रित केलेल्या व्हिडिओ क्लिप्स जगभरातील लोक पाहत असतात. तसेच स्वत:ची यशोगाथा सांगून लोकांना प्रेरित करण्यासाठी निक व्याख्याने देतात आणि एक व्याख्याता म्हणूनही जगभर त्यांची ख्याती झाली आहे. जगभर फिरताना त्यांना आलेले अनुभव आणि विपरीत परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे गेलेल्या लोकांची उदाहरणं, यांचा या पुस्तकात समावेश आहे. तेव्हा हे प्रेरणादायी पुस्तक सगळ्यांनी जरूर जरूर वाचलं पाहिजे.
-
Nirmanushya (निर्मनुष्य)
मतकरींच्या प्रगल्भ शैलीतून साकार होत असलेल्या अगदी अलिकडच्या गूढकथांचा हा संग्रह. वास्तवाच्या पायावर उभे असलेले कल्पनेचे जग, मानसशास्त्रावर आधारलेले भीतीचे विश्व मतकरींच्या कथांमधून साकार झाले आहे. उत्कंठा वाढवणारा संदेश आणि गारठून टाकणारे भय यांच्या जोडीनेच, प्राणीमात्राविषयी करूणा आणि अंतिम न्यायाचा आग्रह, राजकारणाचा स्पर्श हे त्या कथांचे लेखनसूत्र आहे. या आशयसंपन्नतेमुळे मतकरींच्या कथा बदलत्या काळागणीक अधिकाधिक अर्थगर्भ होत गेल्या आहेत. गूढकथा ही वाचकाला अचंब्यात टाकण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी लिहिलेली कथा नसून, ती मानवी जीवनावर भाष्य करण्यासाठी निवडलेली एक वेगळी दृष्टी आहे हेच या कथा वाचताना जाणवते.
-
Nijdham (निजधाम)
बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह... Keywords
-
Nagasaki (नागासाकी)
नागासाकी ही कादंबरी म्हणजे १९४५मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.
-
Arise Awake (अराइज अवेक)
अराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केले. त्या व्यवसायाची संकल्पना त्यांना कशी सुचली, कल्पना सुचल्यावर त्यांनी काय केलं, भांडवल कसं उभं केलं, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी केली, त्या व्यवसायाला लोकांचा (गिह्राईकांचा) कसा प्रतिसाद मिळाला, आपलं उत्पादन तयार करताना, त्याची जाहिरात करताना, तसेच आर्थिक बाबतीत किंवा अन्य स्वरूपाच्या त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. कोणी डॉक्टरांसाठीचं सॉफ्टवेअर तयार केलं, तर कोणी सिमेंट काँक्रीटच्या विटा, कोणी पूजा किट्स तयार केली, तर कोणी टी शर्ट्स, कोणी कॅपचावर लक्ष केंद्रित केलं, तर कोणी कॉम्प्यूटर सायन्स शिकवण्यावर, अशा अनेक युवा उद्योजकांच्या या प्रेरणादायी कथा युवा वर्गाने आणि सगळ्यांनीच अवश्य वाचाव्या अशा आहेत.
-
The Difficulty Of Being Good (द डिफिकल्टी ऑफ बीइं
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
-
Georges And Big Bang (जॉर्ज अँड द बिग बँग)
एरिक हे वैज्ञानिक सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी संशोधन करत असतात. मानवजातीला हितकर असे काही निष्कर्ष त्यांच्या दृष्टिपथात असतात; पण टोरेग या संघटनेचे लोक एरिकच्या या संशोधनामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे, असा अपप्रचार करत असतात. कॉसमॉस या एरिककडे असलेल्या संगणकाचा गैरवापर केल्याचा आरोप एरिक यांच्यावर ठेवून, त्यासंदर्भात हाड्रॉन कोलायडरवर ताबडतोब मानव हितचिंतक संघाच्या बैठकीचं आयोजन केलं जातं. अर्थातच एरिक कॉसमॉससह त्या बैठकीला रवाना होतात; पण ते गेल्यानंतर त्यांचा जीव धोक्यात असल्याचा संदेश रीपनकडून जॉर्जला मिळतो. बैठकीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून एरिक आणि अन्य भौतिक वैज्ञानिकांना ठार मारून त्यांच्या विधायक संशोधनावर कायमचा पडदा पाडायचा टोरेग संघटनेचा डाव असतो. हा डाव उधळण्यासाठी निघालेल्या जॉर्ज आणि अॅडनीवर कोणती संकटं कोसळतात? ते बैठकीच्या ठिकाणी पोचण्यात यशस्वी होतात का... जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ‘जॉर्जेस अॅ न्ड द बिग बँग.’
-
Pardeshi (परदेशी)
नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती, विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी. डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, ‘परदेशी’ या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!
-
Bari (बारी)
जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.
-
Maza Gaon (माझा गाव)
`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...
-
Chhava Teen Anki Natak (छावा तीन अंकी नाटक)
हे दगडी कासव आम्हाला आमच्या हयातीचं प्रतीकच वाटत आलं आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हरएक भाविक दर्शनभक्ताचे कळत-नकळत पाय पडतात ते या दगडी कासवाच्या पाठीवर! भरल्या मनाचे नमस्कार रुजू होतात ते मात्र गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांपाशी— आम्ही— आहोत या हमचौकातील दगडी कासवासारखे! आबासाहेब— आबासाहेब आहेत ते दौलतीच्या गाभाऱ्यातील मूर्तीसारखे!... खंत पाठीवर पडणाऱ्या पावलांची मुळीच नाही. एवढीसुद्धा नाही. खंत आहे ती मात्र एकाच बाबीची— आणि ती जरूर आहे— काळीजतोड खंत आहे ती येसू—उभ्या दौलतीत असा एकही जाणता मिळाला नाही की ज्याच्या ध्यानी कधी हे आलं की— या दगडी कासवाचीही नजर अहोरात्र जोडलेली असते ती— ती मात्र गाभारातल्या त्या मूर्तीच्याच चरणांठायी!— हे नेमकं जाणणारे जाणते होते— आमचे आबासाहेब— आमच्या थोरल्या आऊसाहेब.
-
Kavadase (कवडसे)
सावंतसाहेबांनी उभ्या केलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या व्यक्तिरेखा म्हणजे पुराणातली वांगी नसतात, तर २१व्या शतकाशी त्यांचा सांधा असा जुळलेला असतो की कित्येक वाचक त्यातून जीवनदायी प्रेरणा घेतात. ह्या लेखसंग्रहातही सावंतसाहेबांची ही वैशिष्ट्यं तर मला जाणवलीच; पण समकालीन लेखकांच्या लेखनाचं मोकळेपणानं कौतुक करण्याचा त्यांच्या मनाचा खुलेपणाही मला जाणवला. ते माणसातली विकृती शोधत नाहीत— शोधतात त्याला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श— मग तो भक्तीचा असेल, प्रतिभेचा असेल किंवा सामाजिक कणवेचा असेल. सावंतसाहेबांच्या महाकादंबऱ्यांत तर त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य वाचकाला भारावून टाकणारंच असतं; पण ह्या छोट्या छोट्या लेखांतील तेज:पुंजांचं महत्त्वही मला कमी वाटलं नाही. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या प्रतिभासूर्यानं वाचकांना दिपवून टाकलं; पण ह्या लेखसंग्रहातही त्यांच्या प्रतिभासूर्याचे विविध आकारांचे कवडसेसुद्धा वाचकाला एक वेगळाच आनंद मिळवून देतील याबद्दल शंका नाही.
-
Georges Cosmic Treasure Hunt (जॉर्जेस कॉस्मिक ट्रे
जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ ची कथा फिरते शाळकरी वयातील जॉर्ज, त्याचे आई-वडील आणि आजी, एरिक हे वैज्ञानिक, त्यांची मुलगी अॅचनी, एरिकचे सहकारी रीपन, त्यांच्या मित्राचा मुलगा एमिट आणि एरिकचा ‘कॉसमॉस’ नावाचा ताकदवान, हुशार संगणक यांच्याभोवती. ग्लोबल स्पेस एजन्सीमध्ये एरिक काम करत असताना त्या एजन्सीद्वारे होमर नावाचा यंत्रमानव मंगळावर पाठवला जातो; पण काही दिवसांनंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटतो आणि जेव्हा तो परत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो विचित्र वागत असतो. दरम्यान, अॅतनीला परग्रहावरून असा संदेश येतो, की होमरला दुरुस्त केलं नाही तर पृथ्वीचा नाश होईल. म्हणून अॅ नी आणि जॉर्ज मोठ्या माणसांना कल्पना न देता मंगळावर पोचतात, एरिकना हे समजल्यावर तेही मंगळावर जातात. तिथे काय होतं? अॅ्नीला संदेश कोणी पाठवलेला असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि एकूणच अंतराळाविषयीची रंजक माहिती मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचली पाहिजे.
-
Mrutyunjay Teen Anki Natak (मृत्यूंजय तीन अंकी नाट
नाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी– मी सूर्यपुत्रही नाही!! मी– मी आहे एक प्रचंड शून्य!! प्रचंड शून्य!! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची– कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान- अवमान– आत्माभिमान– कसले कसलेच भाव! ‘कऽर्ण, कऽर्ण’ एक प्रचंड शून्य! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं! राधा-कुंती, वृषाली- पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं! कशाकशातच नसलेलं! एक प्रचंड शून्य!