-
Kahani Manavpranyachi
विश्वाचा जन्म कधी झाला हे गूढ असले तरी जगभरातील शास्त्रज्ञ त्यांची उकल करीत आहे. त्याचे उत्तर हळूहळू उलगडत आहे. मानवाच्या अस्तित्वानंतर अनेक शोध लागले. त्यातून आजचे आधुनिक जग साकार झाले आहे. ज्ञान - विज्ञान, तत्वज्ञान - तंत्रज्ञान यांच्या विकासातून अनेक असाध्य गोष्टी सध्या झाल्या आहेत. यातून मानव 'सिव्हिलायझेशन' कडे वळला. म्हणजेच सभ्यता, नैतिकता मानू लागला. पण ह्या गोष्टी अहिंसेला पूरक असल्या तरी त्या स्थळ, काळ, व्यक्तीसापेक्ष असल्याने हिंसेचे मूळ यातून फुटले. विश्वाची निर्मिती, माकडापासून मानवाची अत्तापर्यत जी उत्क्रांती झाली त्याचा शोध अनेक शास्त्रज्ञ आजही घेत आहेत. हा प्रवास गूढ, रहस्यमय असून, 'नंदा खरे' यांनी 'कहाणी मानवप्राण्याची' मधून त्यांची झलक दाखवली आहे. सहा विभागात त्य आणि संपूर्ण विश्वाचा, मानवाचा इतिहास, भूगोल रंजक शब्दांत, आवश्यक तेथे छायाचित्र, नकाशे यांच्या मदतीने कथन केला आहे.
-
Jeevanchakra
उद्याच्या कथेत वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान विषयक माहिती असणे अपरिहार्य होवून बसणार आहे. खरंतर त्या कथा त्या काळातील सामजिक कथा असतील. त्यामुळे विज्ञानकथा लिहिणं खूप आव्हानात्मक ठारेल. कमी श्रमात मोठं व्हायची स्वप्न बघणा-यांना हे आव्हान पेलवेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे नवे विज्ञानकथाकार पुढं येणं हे सोपं राहणार नाही. त्याचं कारण विज्ञान कथेत विज्ञान आणि कथा यांचा समतोल साधणं आवश्यक असतं. एखादं यंत्र चालतं हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या यंत्राचा मानवीजीवनावर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरतं. अशा त-हेच्या भविष्यकाळातील प्रगतीचा आणि मानवी परस्पर संबंधांचं चित्रण करणा-या या कथा वाचकांना आवडतील यात शंकाच नाही.