-
The Gorakhpur Hospital Tragedy (द गोरखपूर हॉस्पिटल
१० ऑगस्ट २०१७... गोरखपूरच्या सरकारी इस्पितळातला द्रवरूप ऑसिजन संपला... पुढच्या दोन दिवसांत ६३ मुलं आणि १८ प्रौढ यांचा मृत्यू झाला... ऑसिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला... ऑसिजन व्यवहारातली भ्रष्टाचाराची साखळी उघडी पडली... लोकांच्या लेखी कफील हिरो ठरले... आणि सत्तेच्या लेखी शत्रू... कफील यांनाच चोर ठरवलं गेलं... तुरुंगात टाकण्यात आलं... कुटुंबाची ससेहोलपट झाली... पण कफील हरले नाहीत. ते लढत राहिले. आजही लढताहेत... एक उन्मत्त सत्ता आणि कर्तव्यनिष्ठ डॉटर यांच्या झुंजीची ही कहाणी. हृदय पिळवटून टाकणारी. तितकीच लढणार्यांना बळ देणारी... द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी डॉ. कफील खान । अनुवाद : राजेंद्र साठे
-
Vidyechya Pranganaat (विद्येच्या प्रांगणात)
एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याबरोबर या बदलामुळे सामाजिक जीवनाला मात्र तडे गेले आहेत. या नव्या आव्हानांनी जागतिक व्यवस्थेचा ढाचा बदलला आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून शिक्षणव्यवस्थेचे वेगळे जग प्रस्तुत केले आहे. डॉ. साळुंखे यांनी पाच विद्यापीठांचे कुलगुरू पद भूषविले आहे. राज्याचे, केंद्राचे व स्वायत्त विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाजी विद्यापीठात व राज्यस्थान केंद्रीय विद्यापीठात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये केलेल्या प्रयोगाचे व उभारलेल्या नवीन प्रकल्पाचे वर्णन या आत्मचरित्रात आहे. तसेच डॉ. साळुंखे यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचे व तेथील शैक्षणिक प्रगतीचे सखोल वर्णन आहे. कधी काळी शिक्षणक्षेत्र हे स्वतंत्र व आत्मनिर्भर होते, तसे ते आता राहिले नाही. अलीकडे विद्यापीठे राजकीय हस्तक्षेपाने गढुळली आहेत. या संदर्भात डॉ. साळुंखे यांनी शिक्षणाबद्दल मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. एका उत्तम संशोधक, तत्त्वनिष्ठ प्रशासक व शिक्षणचिंतकाचे हे आत्मचरित्र नव्या पिढीला व शिक्षण जगताला निश्चितच दिशादर्शक ठरेल. पृथ्वीराज चव्हाण, (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
-
Kajava (काजवा)
अपवादाच्या जगण्याची, लढण्याची, जखमी होण्याची, जखमांना फुलांचं रूप देण्याची एक चित्तरकथा म्हणजे हे आत्मकथन आहे. ते वास्तवाशी बेइमानी करत नाही, वास्तव सजवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जात नाही, दु:खाची सजावट करत नाही, विनाकारण आपल्या दुःखांना याचकाचं स्वरूपही देत नाही; तर जीवन एक संघर्ष आहे, अंधार भेदता येतो. उजेडाचं आभाळ तयार करता येतं, स्वयंप्रकाशित बनता येतं, व्यवस्थेनं तयार केलेली वादळं पचवता येतात, हे मोठ्या आत्मविश्वासानं आणि निखळ स्वानुभवातून ते सांगत राहतात. आपल्या वाट्याला येणाऱ्या व्यथा-वेदनांचं ते नुसतंच वर्णन करत राहत नाहीत किंवा दुःखाच्या नावानं काही मागत राहत नाहीत, तर वास्तव बदलता येतं, त्यासाठी लढता येतं, लढायांमध्ये विजयी होता येतं आणि अंधार भेदता येतो हेही या आत्मकथनातून सांगण्याचा ते प्रयत्न करतात. वयाच्या साठीजवळ पोहोचताना त्यांचं आयुष्य आटपाट नगरातील एका सुफल कहाणीप्रमाणं झालं असलं तरी, या बिंदूवर ते कसे पोहोचले, हे सर्वांत अधिक महत्त्वाचं आहे.
-
Learn To Earn (लर्न टू अर्न)
अनेक गुंतवणूकदारांना, अगदी शेअर बाजारात भरीव कामगिरी केलेल्या गुंतवणूकदारांनादेखील, हा शेअर बाजार नक्की कसे काम करतो याबद्दल सखोल माहिती नसते. म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत बाबी काय आहेत आणि शेअर बाजाराशी त्यांचा कसा संबंध आहे, यासारख्या गुंतवणुकीबाबतच्या प्राथमिक गोष्टी शालेय शिक्षणात शिकवल्या जाव्यात, असा आग्रह लिंच आणि रोथचाइल्ड धरतात. प्रत्येक तरुण व्यक्तीसमोर आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे जमा करायचे, की आपल्या वृद्धापकाळातील अर्थार्जनाची सोय करायची अशी द्विधा मनस्थिती असते, मात्र गुंतवणुकीचे मूलभूत प्रशिक्षण त्याला वेळीच मिळाले असते, तर त्याच्या पुढे असा प्रश्न उभा राहिला नसता. गुंतवणुकीच्या संधी सर्वत्र असतात, मात्र त्या शोधण्याची दृष्टी असायला हवी. शालेय शिक्षणामध्ये फारसे हुशार नसलेल्या विद्यार्थ्यालादेखील नायके, रीबॉक, मॅकडोनाल्ड्स, द गॅप आणि बॉडी शॉप यासारख्या ब्रँड्सची माहिती असते. अमेरिकेत प्रत्येक किशोरवयीन मुलाने कोका-कोला किंवा पेप्सीची चव एकदा तरी चाखलेली असते, मात्र त्यापैकी किती जणांनी या दोन्हीपैकी एका कंपनीचा समभाग विकत घेतला असेल किंवा या कंपन्यांचा समभाग विकत घेता येतो, याची किमान माहिती तरी त्याला असेल? प्रत्येक विद्यार्थी अमेरिकी इतिहासाचा अभ्यास करतो. मात्र, आपला देश हा युरोपीय वसाहतवाद्यांनी घडवला आहे, या वसाहतवाद्यांना इंग्लंड आणि हॉलंड या देशातील पब्लिक कंपन्यांनी वित्तपुरवठा केला होता आणि या पब्लिक कंपन्यांच्या मूलभूत तत्त्वांमध्ये गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षात फारसा बदल झालेला नाही हे त्यातील मोजयाच विद्यार्थ्यांना ठाऊक असते.