Atarkya (अतर्क्य)
कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘अतर्क्य’ हा वास्तव आणि कल्पना यांत गुंफलेला, अंगावर शहारे आणणारा कथासंग्रह आहे. यामध्ये सत्य, कल्पित आणि या दोन्हींचे मिश्रण असलेल्या अशा विविध कथा आहेत. मानवी मनाच्या सर्वसामान्य जाणिवा आणि तर्काच्या पलीकडल्या काही घटना यांचा अनुभवही अशाच खास; परंतु विशिष्ट जाणिवांच्याच मनुष्य प्राण्याला येत असेल किंवा आला असेल; एकदा – अनेकदा – अचानक आणि त्याचीच गुंफण या कथासंग्रहात झाली आहे. एकूण सहा कथांचा हा कथासंग्रह काहीअंशी वास्तवतेतील वेदनादायी परिस्थिती विशद करतो. गूढ - भय – रहस्य – भुतं – पूर्वजांवरची निष्ठा-अनिष्ठा – पिढ्यांना मिळालेला शाप – बळी प्रथा – अटळ गोष्टींमागची सत्यता – करणी केल्यामुळे उमटणारे पडसाद – अपमानाचा बदला घेण्यासाठी मृत्युपश्चातही जिवंत असलेली क्रूर वासना अशा विचित्र व अमानविय वाटणाऱ्या भावनांचा संग्रह म्हणजे ‘अतर्क्य..!’