-
The Legend of Bahirji Naik Part 1 (दलिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग १)
मराठा स्वराज्य १६६३ शिवाजी राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न भंग पावत आहे. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे शत्रू आहेत. सतत होणाऱ्या आक्रमणांमुळे स्वराज्याच्या सैन्याची धूळदाण उडाली आहे आणि खजिना संपत आला आहे. मुघल सुभेदार शाहिस्तेखान, मराठ्यांचे परंपरागत शहर, पुणे इथे त्याच्या ताब्यातील सैन्यासह तळ ठोकून बसला आहे. सगळ्या आशा मावळल्या आहेत. केवळ, शाहिस्तेखानला पुण्यातून बाहेर पळवून लावणे पुरेसे असणार नाही. टिकून राहण्यासाठी राजेंना स्वराज्याचा खजिना पुन्हा भरून काढवा लागणार आहे आणि सैन्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. इथून शंभर कोसांवर एक शहर वसलेले आहे, सुरत, जणू भ्रष्टाचार आणि कारस्थानांचा नरक, पण सुवर्णाने समृद्ध. सुरतवरील हल्ल्याने राजेंच्या सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे. पण सुरत मुघल हद्दीच्या खूप आत वसलेले आहे, मुघल सुभेदार इनायत खान, पाच हजारांच्या प्रशिक्षित सुसज्ज फौजेसह त्याचे रक्षण करत आहे. स्वराज्य टिकून राहण्याची आशा आता या अशक्य वाटणाऱ्या मोहिमेवर अवलंबून आहे. याची आखणी गुप्तहेर संघटनेला करावी लागणार आहे ज्याचे नेतृत्व बहिर्जी नाईक आणि त्यांचा नवशिका सहकारी, शशिध्वज, एक सोळा वर्षाचा पोरगा करत आहे, जे ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांना ठाऊक असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करत आहेत. हे गुप्तहेर, इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या मुघल शत्रूच्या हद्दीत हालचाली करून राजेंचे सैन्य सुरतपर्यंत घेऊन जाऊ शकतील का? या शहराच्या राखणदारांवर मात करण्यासाठी ते काही युक्ती शोधतील का? यापेक्षा महत्वाचे, मराठी स्वराज्य विजयी होईल का? की, सार्वभौम मुघल साम्राज्याविरुद्ध उभ्या राहणाऱ्या इतर शेकडो लोकांप्रमाणे ते विनाश पावेल ?
-
Dr.Snehasudha Yanchya Nivadak Kavita (डॉ.स्नेहसुधा
डॉ स्नेहसुधा कुलकर्णी यांनी विविध काव्यगुणांनी समृध्द आणि संपन्न अशी कविता विपुल प्रमाणात लिहिलेली आहे. ती सहा काव्यसंग्रहांमधून व मान्यवर नियतकालिकांमधून काव्यप्रेमी रसिकांपुढे सातत्याने आली आहे. त्यांच्या एकुण ४६५ कवितांमधील १५१ कवितांची निवड केली असून त्यामध्ये छंदोबध्द आणि मुक्तच्छंद अशा दोन्ही प्रकारच्या कविता आहेत. छंदोबध्द कवितांमध्ये भावकविता, भावगीत, गौरवगीत, उद्देशिका, ओवी, अभंग, लावणी, गझल असे प्रकार असून प्रेमकविता, सामाजिक कविता, निसर्गकविता, आत्मचिंतनपर कविता, विनोदी कविता, विडंबनगीत, असे प्रकारही त्यांनी हाताळले आहेत.
-
Surya Girnari Mi (सूर्य गिळणारी मी)
एका कार्यकर्तीचं आत्मकथन “लग्न ही स्त्रीला एवढं आमूलाग्र बदलवणारी घटना असते? जर ती दोन जिवांची एकरूपता असेल, तर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारत? का तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावं लागतं? मी माझ्या 'स्व' लाच वजा करायचं? नाही. बस झालं आता. मला जगायचं आहे. मला जगायचंच आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे . अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्रं बधिर झाली होती. दुःख, आनंद याच्यापलीकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, याची मला पूर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीन, भविष्यहीन, भावनाविरहीत, निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अशी अरुणा तर माझ्या ओळखीचीच नव्हती. ओठांतून रक्त आले तरी वेदना होत नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी ठेवले तरी मला भूक लागत नव्हती. ओठ आणि जीभ जखमी असताना जबरदस्तीने मला गरम चहा प्यायला लावला तरी वेदना होत नव्हत्या, की त्या मी माझ्या मनाला जाणवूच देत नव्हते? मी बधिर झाले होते हेच खरे! ज्या क्षणी मला असं वाटलं आता आपण इथे वाचू शकत नाही त्या क्षणी एका सकाळी मी माझ्या अंगावरच्या वस्त्रांनीशी घर सोडलं लपतछपत गल्लीबोळांतून जात होते. रस्त्यात एक टेलिफोन बुथ दिसला. थकलेल्या मेंदूला काहीतरी जाणीव झाली. बहिणीला फोन लागला. तिथून जवळच असलेल्या मोठ्या ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यात मी जाऊन बसले. तिथे घ्यायला माझा भाचा आशू आला; मला भिकारीण समजून तो माझ्या समोरून मलाच शोधत पुढे निघून गेला.” अशा अत्यंत दाहक अनुभवातून तावून सुलाखून निघालेला एक जीवन प्रवास! वाचायलाच हवं असं एका कार्यकर्तीचं प्रेरणादायी आत्मकथन!!
-
Vladimir Putin (व्लादिमिर पुतिन)
सोव्हिएत युनियन आणि रशिया हा प्रकार जरा गूढच आहे. अलीकडच्या काळात व्लादिमिर पुतिन या रशियाच्या राष्ट्रपतीनं रशियाला त्याचं गतवैभव मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले असल्याची चर्चा सुरू असते. अमेरिका ही जगामधली एकमेव महासत्ता नसून तिला आव्हान देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं पुतिननं निरनिराळ्या मार्गांनी दाखवून दिलं आहे. 2016 सालची अमेरिकी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूनं वळवण्यातसुद्धा पुतिनचा मोठा हात असल्याचं मानलं जातं. हा पुतिन नक्की आहे तरी कसा? त्याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्या खर्या आहेत का? तो हुकूमशहा आहे का? रशियासारख्या महाकाय देशावर त्याची एकहाती सत्ता कशी काय प्रस्थापित झाली? रशियामध्ये खरोखर लोकशाही आहे का? पुतिननं एवढी मोठी मजल कशी काय मारली? पुतिनविषयीचं सगळं रहस्य उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे.
-
Swatantryasoudamini Maharani Tarabai (स्वातंत्र्यस
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हे मोठे युगकार्यच होते. मराठ्यांची स्वतंत्र व सार्वभौम सत्ता निर्माण झाली खरी, पण महाराजांच्या निधनानंतर लगेचच दिल्लीपती औरंगजेब हा मराठा सत्तेचा घास घेण्यासाठी दक्षिणेत लाखो सैन्यानिशी व प्रचंड साधनसामग्रीनिशी चालून आला आणि मग त्यातून सुरू झाले मराठ्यांचे जीवन-मरणाचे युद्ध, ज्याला इतिहासकार 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध' असे गौरवाने संबोधतात. या स्वातंत्र्ययुद्धात मराठ्यांचे नेतृत्व शिवपुत्र संभाजी छत्रपती, शिवपुत्र राजाराम छत्रपती व शिवस्नुषा महाराणी ताराबाई या तीन राज्यकर्त्यांनी केले. आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील एका बलाढ्य सत्ताधीशाशी-मोगल सम्राट औरंगजेब बादशहाशी मराठ्यांनी आपल्या या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली २५-२६ वर्षे लढून त्याला हतबल करून टाकले आणि शेवटी महाराष्ट्राच्या या भूमीतच त्याला आपली दफनभूमी शोधावयास लावले. हा हा म्हणता आपण मराठा सत्ता नष्ट करू अशी जी बादशहास घमेंड होती, ती अस्तास जाऊन त्याच्याच हयातीत मराठ्यांचे सैन्य नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या त्याच्या सुभ्यांत धामधूम करताना त्याला पाहावे लागले. मराठ्यांच्या उपरोक्त तीन राज्यकर्त्यांमध्ये महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाचे एक वेगळेपण आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी, ऐन तारुण्यात वैधव्याची कुऱ्हाड कोसळली असताना या तरुण राणीने आपले वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. राज्यकारभारच नव्हे तर लष्करी मोहिमांचे संयोजन ती करू लागली. खाफीखान हा औरंगजेबाचा चरित्रकार, पण त्याने मराठ्यांच्या या राणीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत. माझ्या या चरित्रग्रंथात महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धाचा शेवटी धावता आढावा घेतला असला तरी या राणीची स्वातंत्र्ययुद्धातील (सन १७०० ते १७०७) कामगिरी मांडणे, हा माझा प्रमुख उद्देश आहे. ताराबाईंना ८६-८७ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले असले तरी त्यांची खरी तेजस्वी कारकीर्द म्हणजे त्यांनी औरंगजेब बादशहाशी दिलेला सात वर्षांचा लष्करी व राजकीय लढा. या लढ्यातील तिच्या कामगिरीमुळेच तिचा ‘स्वातंत्र्यसौदामिनी' म्हणून गौरव केला जातो. अशा या स्वातंत्र्यसौदामिनीचे चरित्र गावागावांतून, घराघरांतून, शाळाशाळांतून वाचले जावे, अशी माझी अंतरीची इच्छा आहे.
-
Kadachit.. (कदाचित)
कोकणच्या पार्श्वभूमीवरील एक जबरदस्त psychological thriller कादंबरी.
-
Aapale Digital Jeevan (आपले डिजिटल जीवन)
येणारे पुढचे दशक हे डिजिटल दशक असणार आहे. आत्ताच आपण आपल्या चहुबाजूने digital किंवा smart गोष्टींने वेढले गेलो आहोत. कसे असेल येणारे दशक ? आपण काय काय आत्मसात केले पाहिजे ? कोणत्या कोणत्या कॅरिअर संधी उपलब्ध आहेत ?
-
Rajmata Jijausaheb (राजमाता जिजाऊसाहेब)
जिजाऊसाहेबांच्या अंगी कार्यक्षम व कणखर प्रशासकाचेही गुण होते. शिवरायांच्या बालपणी त्यांनी पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था ठेवली; शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. शत्रूच्या अत्याचारांनी भयभीत व निराश्रित झालेल्या रयतेस त्यांनी मायेने दिलासा दिला आणि शिवरायांचे भावी स्वराज्य कसे असेल याचे वास्तव दर्शन त्यांनी सर्वांना घडवले. शिवराय वयाने व अनुभवाने मोठे झाल्यावरही जिजाऊसाहेब त्यांच्या प्रमुख सल्लागार होत्या. अत्यंत कठीण संकटाच्या प्रसंगी त्यांना आपल्या मातेचाच आधार वाटत असे. आपल्या गैरहजेरीत मातोश्रींच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून ते जात असत. आग्राभेटीच्या वेळी त्यांच्या मागे जिजाऊसाहेबांनी स्वराज्य सुरक्षित राखले. एकही किल्ला अथवा ठाणे शत्रूला घेऊ दिले नाही. उलट शत्रूचाच एक किल्ला त्यांनी स्वराज्यात आणला. अशा या थोर राजमातेचे हे चरित्र शक्य तितक्या सोप्या भाषेत, कागदपत्रांचे अवडंबर न माजवता मी सादर करत आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे प्रकाशक, मनोविकास प्रकाशनाचे संचालक श्री. अरविंद पाटकर यांनी जिजाऊचरित्राचा माझ्याकडे आग्रह धरल्याने हे एक प्रकारचे पवित्र कार्य माझ्या हातून पार पडले, असे मी मानते. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
-
Bazar... (बाजार)
हे शतक उजाडताना मात्र सॅम्युएल्सन असंबद्ध वाटू लागला. सेन्सेक्स-निफ्टी, GDP-GNP वेगवेगळे महागाई निर्देशांक वगैरे समजून घ्यायला गेलं की फारदा निष्कारण तपशिलानं मुद्दे धूसर केले जात आहेत, दडवले जात आहेत, obfuscate केले जाताहेत, असं वाटायचं. मग फापटपसारा हटवणारी रासवट-मराठी cut the crap वृत्ती वापरून आकलन सोपं करायला धडपडू लागलो. थोडं जमायचं, खूपसं सुटून जायचं. अशातच 2008 ची मंदी आली. मी निवृत्त झालोच होतो, त्यामुळे त्या गोंधळावरची हलकी, लोकप्रिय पुस्तकं वाचायला वेळ होता. आणि अशी पाश्चात्त्य अर्थशास्त्राची कमकुवत, कधीकधी बदमाश अंगं उघड करणारी पुस्तकं, वृत्तपट, चित्रपट वगैरेंचा सौम्यसा ‘पाऊस’ गेलं दशकभर पडतोच आहे! त्या सार्यातून जे चित्र दिसायला लागलं ते म्हणजे हा ‘बाजार’. भोवताली जे दिसतं ते, स्वतःचे अनुभव, चित्रपटांमधली गाणी आणि कवनं, इतर मार्गांनी पीडितांनी साधलेली अभिव्यक्ती, अशा सार्यांचं हे मिश्रण आहे. एक ढोबळ रचना, structure आहेही; पण मुळात हा गप्पा, किस्से-कहाण्या, ‘गीतों भरी कहानी’ वगैरे अनौपचारिक पद्धतींनी माझं आकलन मांडायचा प्रयत्न आहे.
-
Khelandaji (खेलंदाजी)
क्रिकेट आणि संगीत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक! सामना, सकाळ, षटकार या माध्यमातून क्रिकेट मधील किस्से, टीका, टिप्पणी आपण लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखनातून अनुभवले आहेत. त्यांचे लेखन कौशल्य जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा नावीन्याने आपल्यापुढे घेऊन येते. ‘खेलंदाजी’ या पुस्तकातील लेखसंग्रह वाचण्याचा योग मला आला आणि पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला. अजित वाडेकर, मोहम्मद सिराज, राहुल द्रविड, केन विल्यमसन, सुनील गावसकर, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन ते सचिन तेंडुलकर पर्यंत भारताच्या मौल्यवान हिन्यांचे परीक्षण या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते. विविध विषय मांडताना संझगिरींनी केलेला अभ्यास व त्यातील बारकावे हे विशेष भावतात. मुक्तपणे शब्दांची केलेली उधळण आणि तरीही सरळ, साधी भाषाशैली आपल्याला विषयाशी समरस करून टाकते. पत्रकारितेतील अनेक वर्षाचा गाढा अनुभव आणि अनुभवाने समृद्ध झालेले लिखाण वाचकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. रसिक वाचक या संधीचा मनमुराद लाभ घेतील याची मला खात्री वाटते.
-
Champagne Cricket (शाम्पेन क्रिकेट)
‘क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर द्वारकानाथ संझगिरी हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे खेळाचे विश्लेषण आणि चित्रण चांगले आहे. या पुस्तकात त्याने खेळातील जवळजवळ सर्व मनोरंजक घडामोडी आणि पैलू सामावून घेतले आहेत. हे पुस्तक क्रिकेट रसिकांनी आवर्जून वाचावे असे आहे. त्यासाठी शुभेच्छा!
-
Salam Vardi (सलाम वर्दी)
बांगला देश मुक्ती संग्रामविषयी माहिती देणाऱ्या साहित्यामधील हे अद्वितीय योगदान आहे. राष्ट्राशी आपले काहीतरी देणे लागते ही भावना या पुस्तकामुळे प्रबळ होईल. जनरल. मनोज मुकुंद नरवणे भारताचे लष्करप्रमुख या पुस्तकातील प्रत्येक योद्धा देश प्रेमाने झपाटलेला आहे. प्रत्येकाचे अनुभव म्हणूनच वेगळे आणि समाजाला मनोबल देणारे आहेत. संरक्षणशास्त्राची गोडी लावणारे आहेत. भूषण गोखले एअर मार्शल (नि.) भारतीय हवाईदलाचे माजी उपप्रमुख