-
Eka Aparichit Gandhichi Aatmakatha (एका अपरिचित गा
नटवर गांधी यांचं हे आत्मकथन आहे. गुजरातमधल्या एका खेड्यातून मुंबईत येऊन त्यांनी बी.कॉम.पर्यंत घेतलेलं शिक्षण, ओढग्रस्तीची आर्थिक परिस्थिती, धाकट्या सहा भावंडांची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी वडिलांची अपेक्षा, नोकरीसाठीचा संघर्ष, लग्नानंतर भाड्याच्या एका खोलीसाठी करावा लागलेला संघर्ष, तुटपुंज्या पगारात प्रपंच चालवताना होणारी असह्य ओढाताण, अशातच अमेरिकेत मित्राच्या मदतीने एम.बी.ए.साठी मिळालेला प्रवेश, एम.बी.ए.नंतर अमेरिकेत प्रोफेसरची मिळालेली नोकरी, यथावकाश अमेरिकेत स्वत:चं घर, गाडी, अपत्यांसह संपन्न जीवनाचा घेतलेला अनुभव, तेथील नोकरीचे, पीएच.डी.चे अनुभव, वॉशिंग्टन डी. सी.च्या टॅक्स विभागात कमिशनर आणि सीएफओ पदावर केलेलं महत्त्वपूर्ण काम, अमेरिका आणि भारताची विविध बाबतीत तुलना इ. बाबींतून ओघवत्या भाषेतून हे आत्मकथन उलगडत जातं. तत्कालीन मुंबई, तत्कालीन अमेरिकेचं दर्शन घडतं. अंतर्मुख करणारं प्रेरणादायक आत्मकथन.
-
The New BJP (दि न्यू बीजेपी)
"२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात. पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या नेहमीच्या कथनाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांनी स्वत:च्या सोशल इंजिनिअरिंगचा ब्रँड वापरून भारतीय राजकारणाचा आकार कसा बदलला हे स्पष्ट केले. ही पुनर्रचना चतुराईने नवीन जातीय युती, उपेक्षित सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणार्या नवीन कल्याणकारी राज्याचा दावा आणि महिला मतदारांचा आधार बनवण्याद्वारे करण्यात आली. भारतीय राजकीय पक्षांच्या जातीय रचनेचा अभ्यास करणार्या तीन अनन्य निर्देशांकांच्या डेटावर आधारित मांडणी मेहता करतात. पक्ष आणि देश या दोहोंच्या कार्यपद्धतीबद्दल द न्यू बीजेपी पुस्तक चकित करणारी नवी अंतर्दृष्टी देते. पूर्वी न वापरलेल्या ऐतिहासिक नोंदी, पक्षाच्या नेत्यांच्या विशेष मुलाखती आणि संपूर्ण भारतातील सर्वसमावेशक अहवाल यातून देशातल्या राजकीय स्थित्यंतराचा आलेखच समोर येतो. भाजप आणि आजच्या भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे हे पुस्तक आहे जे राजकीय विभाजनाच्या सर्व बाजूंनी सहभाग आणि वादविवादाची मागणी करते. "
-
Murtichor (मूर्तिचोर)
तामिळनाडूतील दोन मंदिरांतील धाडसी मूर्तिचोरी प्रकरणी न्यू यॉर्क येथे पुराणवस्तू विक्री करणार्या सुभाष कपूर यांचा हात असल्याचं लक्षात घेऊन भारताने त्यांच्या अटकेसाठी काही आठवडे आधी ‘रेड-कॉर्नर-नोटीस’ जारी केली होती. त्यानुसार, यूएस अधिकार्यांनी न्यू यॉर्कयेथील कपूर यांच्या वेअरहाउसवर धाड घातली असता मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं. ‘br>जगातील स कुप्रसिद्ध तस्करांपैकी एक’ अशी यूएसने त्यांची संभावना केली. एक मूर्तिप्रेमी वर्षानुवर्षं कपूरच्या मागावर होता. आजही तो कपूरच्या हातून विकल्या गेलेल्या मूर्तींचा शोध घेत आहे. ही त्यानेच सांगितलेली, अशक्यप्राय वाटणारी सत्यकथा आहे. दक्ष पोलीस ऑफिसर, म्युझियमचे भ्रष्ट अधिकारी, प्रियकराचा सूड घेणारी मैत्रीण, दुतोंडी अभ्यासक, मंदिरात लुटमार करणारे भुरटे चोर आणि तस्कर अशा अनेक व्यक्तिरेखांची या पुस्तकात रेलचेल आहे. भारतीय मंदिरात झालेल्या 21व्या शतकातील या लुटमारीने आणि समाजकंटक गुन्हेगारांच्या धाडसाने थक्क करणारे असे हे पुस्तक आहे.
-
Anandyatri Police Adhikaryachi Diary (आनंदयात्री प
पोलिस खात्यातील प्रदीर्घ सेवा आणि त्यातील आपल्या अनुभवांचे भांडार अनोख्या शैलीत मांडणारे एका आयपीएस अधिकाऱ्याचे वाचनीय आत्मकथन. प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक : 'आनंदयात्री पोलिस अधिकाऱ्याची डायरी'
-
Ikmai (इकमाई)
या झाडांच्या जंजाळात कोणीतरी आहे. नुसतंच कोणीतरी नाही...कोणीतरी ओळखीचं...श्री! चारी बाजूंनी त्याला झाडांनी वेढून टाकलं होतं. श्रीचा सुंदर, प्रिय चेहरा आता भांबावल्यासारखा घामाघूम झाला होता. ‘श्री!’ माझ्या अगदी अंतर्मनातून ती हाक घुमून उठली. श्रीची मान एकदम वर आली. माझ्या दिशेने वळली. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व संभ्रम एका क्षणार्धात नाहीसा झाला....त्याच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हास्य उमलायला लागलं आणि सर्वकाही अदृश्य झालं! माझ्याभोवती अंधारी खोली होती. अंधार नि:शब्द होता. धडधड ऐकू येत होती, ती माझ्याच काळजाची होती. हातापायांना घाम आला होता. शरीर थरथरत होतं. तो भयंकर भास नाहीसा झाल्याची मी पुन्हा खात्री करून घेतली आणि मगच माझा श्वास मंदावला. माझ्या स्वत:च्या दु:खावरून लक्ष काही काळ उडालं होतं. आणि आताच्या या अद्भुत दर्शनाचा विचार मनात येत होता. आताच्या या दृश्याला काही सांकेतिक अर्थ होता का? माझ्याभोवतीच्या असह्य परिस्थितीलाच मनाने एक सांकेतिक रूप दिलं होतं का? मनाची जखम इतकी खोल होती का, की जी मेंदूलाही चाळवील? - प्रस्तुत कथासंग्रहातून
-
Shaducha Shap (शाडूचा शाप)
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठया दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा भय या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीचे, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातील मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
-
Bharadast Gunijan (भारदस्त गुणीजन)
पंचावन्न लोकप्रिय व गुणी व्यक्तींची माहिती या पुस्तकात आहे. या पंचावन्न व्यक्तींबद्दलचे हे लेख वाचणाऱ्यांनाही खूप भारी वाटेल. प्रत्येक माणसात लपलेले गुण जगापुढे यावेत या भावनेने हे लेख लिहिलेले आहेत.
-
Mahagatha Puranatil 100 Katha (महागाथा पुराणातील १
हिंदू धर्मामधील पुराणांमध्ये विश्वामधील ज्ञानभंडार सामावलं आहे. सातत्याने उत्तरं शोधणाऱ्यांसाठी पुराणकथांचं महत्त्व कालातीत आहे. ह्या प्राचीन ग्रंथांमधील शंभर निवडक पौराणिक कथांची सचित्र-संकलित आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. देव, असुर, ऋषी आणि सम्राट ह्यांच्या लोकप्रिय कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या आहेतच; पण लेखक सत्यार्थ नायक यांनी फारशा ज्ञात नसलेल्या अनेक कहाण्यांचा शोध घेऊन, त्यांचाही अंतर्भाव यात केला आहे. उदाहरणार्थ, विष्णूचा शिरच्छेद; सरस्वती लक्ष्मीला शाप देते, तसंच हरिश्चंद्र वरुणदेवाला फसवतो... या आणि यांसारख्या कथा फारच कमी लोकांनी ऐकल्या असतील. सत्यार्थ नायक यांनी ह्या शंभर कहाण्यांची कालक्रमानुसार मांडणी करून त्या 'नव्या' स्वरूपात सादर केल्या आहेत. सत्ययुगामधील विश्वनिर्मितीपासून सुरू झालेल्या कथांची अखेर कलियुगाच्या आगमनाशी होते. पौराणिक संदर्भ देत त्यांनी चार युगांचा मोठा आवाका असलेल्या वेगवान कथनाची वेधक बांधणी केली आहे. एकूणएक कथा या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ब्रह्मांडामध्ये घटनांची विलक्षण अशी एक साखळी दिसून येते. प्रत्येक घटनेला एक पार्श्वभूमी आहे. वर्तमानकाळ हा भूतकाळाला आणि भविष्यकाळाला जोडलेला असतो. कारण आणि परिणाम यांची अखंड साखळी त्यात आहे. कर्म आणि कर्मफलाचं वर्तुळ पूर्ण होतं.
-
Shahanya Mansanchi Factory (शहाण्या माणसांची फॅक्ट
फॅक्टरी वेगवेगळ्या गोष्टींची असते. तशीच एक शहाण्या माणसांची फॅक्टरी उघडली आहे संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ या पुस्तकाच्या स्वरुपात. आपल्या आसपासच्या अनेक घटना, त्यातील विसंगती, व्यक्तिचित्र इथपासून ते विविध कवितांवरचे डॉ. सलील कुलकर्णी यांचे विचार आणि काही खुसखुशीत गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
-
Dabholkar-Pansare Hatya : Tapasatil Rahasye? (दाभो
महाराष्ट्रातील चर्चेचा विषय बनलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या संबंधी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित माहिती, आरोपपत्रे आणि न्यायालयाचे आदेश यांचे हे पुस्तक एक विस्तृत संशोधन आहे. या प्रकरणात दोन पक्ष आहेत. एक हत्या झालेल्या नास्तिकतावाद्यांचा आणि दुसरा हत्येचा आरोप झालेल्या संस्थांच्या सदस्यांचा. प्रस्तुत लेखकाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने लेखन न करता संपूर्ण तपासाचे तटस्थपणे सत्यशोधन केले आहे. उभय प्रकरणातील तपास यंत्रणाचे पूर्ण अपयश आणि पोलिसांच्या तपासवरील राजकीय प्रभाव यांवर हे पुस्तक भाष्य करते. खरे आरोपी न पकडले गेल्यास सीबीआय सारखी सर्वोच्च तपाससंस्थाही कशा प्रकारे अन्यायकारक कृत्ये करते. हे पुस्तकातील उदाहरणांवरून लक्षात येते. या पुस्तकात लेखकाने भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात दोषींना शिक्षा देण्यासाठी आणि निरपराधांना संरक्षण देण्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पोलीस दले आणि न्यायिक प्रक्रिया यांच्यात सुधारणा तातडीने व्हावी, यासाठी पाठपुरावा केला आहे.
-
Premacha Asahi Faluda (प्रेमाचा असाही फालुदा)
आपल्या आजूबाजूला अनेक घडामोडी घडत असतात पण आपल्या सगळ्यांनाच परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. आपल्या समाजातील उतार-चढावांचे विनोदी रीतीने निरीक्षण करून लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक म्हणजे श्री. राजेंद्र वैद्य. त्यांचे हे नवे पुस्तक तुम्हाला नक्कीच हसवेल आणि तुमच्या मनात एक समंजस विचार घेऊन सोडेल!
-
Rahe Na Rahe Hum Mahaka Karenge (रहे न रहे हम महाक
आपली गोष्ट, आपलं आयुष्य हे केवळ आपलं नसतं. त्यात कितीतरी आपले आणि दुसरे, आपल्याबरोबर जोडलेले असतात. ते आपल्या जीवणप्रवासाचा अविभाज्य भाग असतात. त्यामुळे कोणावरही अन्याय न करता, कोणाचाही अपमान अथवा टीका न करता मी माझी गोष्ट पुढे न्यावी हेच इष्ट आहे. आपल्याला ती आवडावी ही इच्छा.