-
Socretis Kadhi Marat Nasato (सॉक्रेटिस कधी मरत नसत
हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो. मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे. मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….
-
Barik Barik Awaj Vadhat Chalalet (बारीक बारीक आवाज
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात. कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’. नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा …. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील. सुबोध जावडेकर
-
Manjirya (मंजिऱ्या)
श्री. वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्यलेखांचा हा संग्रह आहे. श्री. खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला, तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय` या साप्ताहिकात ते नियमितपणे लिहीत असत. त्यानंतर `अखंड भारत` या साप्ताहिकात त्यांनी असेच सातत्याने लेखन केले. लघुनिबंधाशी जवळचे नाते सांगणारे हे लेखन आहे. त्यातील विषय प्रासंगिक स्वरूपाचे असले, तरी त्यावरील हे लेखन चिंतनगर्भ असे आहे. त्यावर श्री. खांडेकरांची स्वतंत्र अशी मुद्रा उमटलेली आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वींची मराठी संस्कृती कशी होती, याचे नेमके चित्रण या सतरा ललित गद्यलेखांच्या संग्रहातून अभ्यासू वाचकाला आढळेल.
-
Manzadhar (मंझधार)
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Pahile Pan (पहिले पान)
श्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमवूÂ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री. खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Ragini (रागिणी)
"‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी...’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणा-या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.
-
Sakshep (साक्षेप)
डॉ. रवींद्र शोभणे यांचे समीक्षालेखन म्हणजे सगळ्यातून सर्जनशील लेखनाचा शोध घेण्याचा प्रयत्न होय. या सर्जनाच्या पाठीमागे काही घटक असतात. काही स्रोत असतात. अशा घटकांचा, स्रोतांचा शोध घेणे हे खरे तर सर्जनशील समीक्षकांचे काम असते. आणि समीक्षक हा जर मुळात सर्जनशील लेखक असेल तर तो त्या अंगाने समोर असलेल्या कलाकृतीचा असा शोध घेत असतो. अर्थात हा शोध म्हणजे अंतिम सत्य नसते, पण त्या सत्याच्या वाटेवरून जाण्याचा तो एक मार्ग ठरतो. हा मार्ग, हा प्रवास सर्जनशील समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या भूमिकेतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी केलेल्या या समीक्षालेखनच्या) निमित्ताने वाचकांना पुन्हा नव्याने त्या त्या कलाकृतीकडे, लेखकांकडे जाता येईल. वाचकांना मिळणाऱ्या या पुनः प्रत्ययाच्या आनंदातच या लेखनाचे यश आहे.
-
Pravah (प्रवाह)
प्रवाह' ही कादंबरी वाचकाला जगण्याच्या प्रवाहाशी जोडून घेते. ह्यावं मुख्य कारण ह्या प्रवाहातल्या लाटा, भारती-ओहटी, भोवरे, बादळं, श्वास कोंडणं, किनारा दिसणं, निसटणं, कधी आनंददायी डुंबणं, तर कधी स्वतःच्याच मस्तीत स्वार होणं, कधी खोल गर्तेत जाणं... अशा अनेक भावावस्था प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर एका वेगळ्या अर्थाने अनुभवायला वा पाहायला मिळतात. कादंबरी हा रूपबंध मानवी आयुष्याचा विशाल पट वाचकांसमोर उलगडत असतो. 'प्रवाह' कादंबरीचा हा पटफ्राईडच्या 'जगण्याच्या धडपडीकरिता कामवासनेचं सर्वव्यापी असणं, या सिद्धांताचा धागा आणि त्याचे अनेक रंग वाचकांसमोर आणतो. तारा ही व्यक्तिरेखा ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भावविश्वातले, तिचे आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचे, अनेक क्षणांचे घटितार्थ एक टोकदार, जळजळीत वास्तव उमं करतात. ताराच्या आणि इतर व्यक्तिरेखांच्या भावजीवनातले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवरचे प्रश्न दुर्देवाने अनुत्तरीतच राहतात. तथाकथित सांकेतिक, संयमित, सुसंस्कृत प्रतीकांचं आशयाला अवगुंठन न देता मानवी मनातल्या उल्या पालथींना ही कादंबरी अस्सल स्वरूपात व्यक्त करते. माणसाच्या जगण्याच्या प्रवाहात भूक आणि कामवासना ह्या आदिम प्रेरणा अपरिहार्य असल्याचं ती स्पष्टपणे सुचवते. जीवनाचं हे बिरूप दर्शन सुद्धा बाचकांना निश्चितच अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं आहे.
-
Hidden Measurement (हिडन मेजरमेंट)
'हिडन मेजरमेंट' या कादंबरीत धरणाच्या निर्मितीची, धरणग्रस्तांची आणि धरणाच्या निर्मितीनंतर आकाराला आलेल्या नव्या समाजव्यवस्थेची कथा आहे. आर्थिक सुबत्तेची, त्या सुबत्तेमुळे आलेल्या नैतिक अधःपतनाची मांडणी गोविंद काळे करतात. तसेच धरणग्रस्ताच्या घरातील तरुणाने उभारलेल्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. या कादंबरीतील अनुभवविश्व नवे, अनोखे आहे आणि गोविंद काळे त्या अनुभवाला साध्या, सोप्या ग्रामीण भाषेचा साज चढवून आकर्षक रूप देतात. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. इतकेच नाही, तर मराठी कादंबरीच्या प्रांतात या कादंबरीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
Arjunacha Putra Abhimanyu (अर्जुनाचा पुत्र अभिमन्य
अभिमन्यू, अर्जुनाचा जीव की प्राण आणि भारतातील ऐतिहासिक पौराणिक कथांमधले सगळ्यात प्रभावी आणि मनात रेंगाळणारे व्यक्तिमत्त्व! पाप-पुण्य, योग्य-अयोग्याचे वेगवेगळे निकष लावून अनेक कुकर्मे जिथे घडली ते कुरुक्षेत्र म्हणजे अभिमन्यूला सद्गती प्राप्त करून देणारी बीरभूमी! अभिमन्यू हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाचे द्योतक होता. त्याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे पण किती जण या उत्तमातील उत्तम अशा तरुणाला अंतरबाह्य जाणतात? 'अर्जुन' या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका अनुजा चंद्रमौली अतिशय घडाडीने लोकांच्या कल्पनाशक्तीला जागवत या तेजस्वी राजकुमाराला शब्दातून साकार करतात. एक तेजस्वी धूमकेतू ज्याच्यात त्रिभुवनाला उजळवून टाकण्याची ताकद होती परंतु नशीबाने शापित असल्याने अल्पावधीतच तो अस्तंगत झाला! माहित असलेली कथा, लेखिका अतिशय सृजनात्मक पद्धतीने खुलवतात आणि ताज्या दमाने सादर करतात. अतिशय सहृदय तीव्रतेने घेतलेला अभिमन्यूच्या व्यक्तिमत्वाचा वेध अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवतो ज्या काळाच्या ओघात हरवल्याने या व्यक्तिमत्वाचे काही पैलू कधी प्रकाशात आलेच नव्हते. ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि महाभारतातल्या या तेजस्वी नायकाच्या दुर्दैवी अंताने मन पिळवटून टाकते
-
Hurda (हुरडा)
ही जी घटना घडली तिला कोण जबाबदार? ज्यांनी कोवळ्या मुलींवर अत्याचार केला, बलात्कार व खून केला, ते ? की त्यांचे आई - वडील? ज्यांनी त्यांना वेळेत आवरले नाही, पाठीशी घातले ते? हा दोष कोणाचा? ज्या न्यायदेवतेकडून न्यायाच्या अपेक्षा असूनही न्याय मिळाला नाही ती? त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने कायदा हातात घेऊन जनतेच्या दरबारात त्यांनी न्याय दिला ते दोषी ? ते बरोबर की, हे याचा फैसला कोण करणार? याचा फैसला काळच करणार. कारण पुढील काळात असा गुन्हा करणारे दहा वेळा या घटनेचा विचार करतील. संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना बातमीच्या रूपाने पसरली. लोकांना वाईट वाटले नाही. जनतेने शेवटी न्याय केला. जनतेच्या दरबारात जे काय होते ते नेहमी लोकांनी स्वीकारले आहे.