-
Swargangechya Tiri
हे आत्मचरित्र नाही. स्वतःचं चरित्र लिहिण्याइतकी पात्रता मी मिळवली आहे, असं प्रामाणिकपणे मला वाटत नाही. माझं जीवन सात स्वरांच्या आरोह-अवरोहांत व त्यांच्या आंदोलनांत सामावलं आहे. सुमारे 40 वर्षं स्वरगंगेच्या विशाल पात्रात व किनार्यावर मी मनसोक्त विहार केला. या काळात रसिकांचं जीवन आनंदनिर्मितीच्या द्वारे सुखमय करण्याचं सेवाव्रत मी कटाक्षानं पाळलं. त्यामुळेच स्वरगंगेत व तिच्या तीरी इतके प्रतिभासंपन्न व अलौकिक गुणिगंधर्व मला भेटले. त्यांची माझी ओळख झाली व जवळीक झाली. या सर्व सुखद स्मृतींची नोंद या पानांतून रसिकांना आढळेल.
-
Jeevanchakra
उद्याच्या कथेत वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान विषयक माहिती असणे अपरिहार्य होवून बसणार आहे. खरंतर त्या कथा त्या काळातील सामजिक कथा असतील. त्यामुळे विज्ञानकथा लिहिणं खूप आव्हानात्मक ठारेल. कमी श्रमात मोठं व्हायची स्वप्न बघणा-यांना हे आव्हान पेलवेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे नवे विज्ञानकथाकार पुढं येणं हे सोपं राहणार नाही. त्याचं कारण विज्ञान कथेत विज्ञान आणि कथा यांचा समतोल साधणं आवश्यक असतं. एखादं यंत्र चालतं हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या यंत्राचा मानवीजीवनावर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरतं. अशा त-हेच्या भविष्यकाळातील प्रगतीचा आणि मानवी परस्पर संबंधांचं चित्रण करणा-या या कथा वाचकांना आवडतील यात शंकाच नाही.