-
Interpreter Of Maladies (इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज्)
साहित्यातला अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'पुलित्झर’ हा पुरस्कारप्राप्त श्रेष्ठ लेखिका झुंपा लाहिरी यांच्या कथा वाचकांना अक्षरश: झपाटून टाकतात. या कथासंग्रहातही कथा भारावून सोडतात. वेगवेगळ्या परिस्थितीत गुंतलेल्या माणसांच्या अंतर्मनाचा वेध घेणार्या कथा सुंदर आहेत. एका जागतिक कीर्तीच्या कथालेखिकेच्या उत्कृष्ट कथा मराठी वाचकांना यामुळे खुल्या झाल्या आहेत. आठ कथांपैकी सेक्सी, खराखुरा दरवान या कथा सुंदर आहेत.
-
KalyaMalya - Bhingolya (काळ्यामाळ्या-भिंगोळ्या)
कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय काय आहे ? शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे. आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा 'समक्ष' अनुभव वृत्तांत. 'आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?', विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या 'राग दरबारी'च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी. - गणेश देवी"
-
Vyavasay Sutra (व्यवसाय सूत्र)
व्यवसाय व्यवस्थापनातील भारतीय दृष्टिकोनास अधोरेखित करणाऱ्या या पुस्तकात नेतृत्व प्रशिक्षक आणि पौराणिक कथांचे अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी या विषयातील वस्तुनिष्ठतेच्या दिखाव्यास बाजूला सारले आहे. पाश्चिमात्य श्रद्धांमध्ये रुतलेले आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे निकष, त्यातील उद्दिष्टपूर्तींबाबत त्यांची असलेली कठोर आसक्ती आणि भागधारकांचे वाढते महत्त्व हे देवदत्त यांनी या पुस्तकात विस्तृत मांडलेले आहे. उलटपक्षी, व्यवसाय करण्यातील भारतीय पद्धत – जी भारतीय पौराणिक कथांमध्ये तर दिसून येते, पण प्रत्यक्ष व्यवस्थापनात मात्र तिचा उपयोग केला जात नाही – ही पद्धत कशारीतीने सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करणारी आहे, सापेक्षता आणि वैविध्य बाळगणारी आहे आणि ध्येयपूर्तीतीच्या प्रत्येक स्तरावरील सर्वंकष यशप्राप्तीचा ती कशा प्रकारे विचार करते, हे विशद केलेलं आहे.
-
Nyaymandir (न्यायमंदिर)
“त्यानं आपले हात पसरले. नीलम त्याच्या कह्यात उभी राहिली. तिच्याभोवती त्याचे अजस्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे गरगरत वर येत आहेत असं नीलमला वाटलं. भीतीनं तिचा श्वास घशात अडकला. तिच्या तोंडून किंकाळी अर्धवटच निघाली... पण त्या दिव्यांची गती मंदावली, थांबली. ते दिवे तिच्या पायाखाली चक्राकार फिरले व दूरदूर जाऊ लागले. जयेंद्रनं आपले प्रचंड पंख मागं उघडले असले पाहिजेत. त्या शक्तिमान पंखाच्या प्रत्येक झडपेबरोबर ती वरवर चालली होती. प्रथम शहराचा विस्तीर्ण, मनोरम प्रदीपित देखावा तिच्या खाली पसरला; पण तोही लहान लहान होत गेला. इवल्याशा पांढऱ्या अभ्रीच्या कवचातून ते वर आले. त्यांच्या पायाखाली ते कापसाच्या रुजाम्यासारखे पसरले होते. त्यांच्याभोवती फक्त रात्रीचा थंड वारा आणि हिऱ्यासारख्या चांदण्या होत्या. नीलमला वाटलं हा विलक्षण आनंद आपल्या मनात सामावणार नाही. डोळे मिटून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्या कठीण आवरणातून तिच्या कानांना त्याचे छातीचे अति संथ ठोके जाणवत होते. ‘ठक्......ठक्......! ठक्......ठक्...’
-
Aisi Ratne Melavin (ऐसी रत्ने मेळवीन)
गुलशनच्या दारावरील घंटीवर डॉक्टरनी जरासे बोट टेकवले व काढले. आतून संतापाचा आवाज आला व दार एका तरुण स्त्रीने उघडले. आताच्या वेळी ती कोणाही भेटणाऱ्यांची अपेक्षा करीत नव्हती; हे तिच्या कपड्यांवरुन उघड दिसत होते. तिच्या अंगावर एक झिरझिरीत नायलॉनची साडी होती व त्या आत काहीहि नव्हते. डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे ती क्षणभर आश्चर्याने पाहत राहिली. डॉक्टरांनी मनात आणले तर ते आपला चेहरा इतका सरळ व प्रांजळ ठेवू शकतात, की कोणालाही त्यांचा अजिबात संशय येणार नाही.
-
Anolkhi Disha Bhag-3 (अनोळखी दिशा भाग-3)
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
-
Ayodhyechi Urmila (अयोध्येची ऊर्मिला)
रामायणात पुसट उल्लेख असलेली ऊर्मिला, चौदा वर्षं पतीच्या विरहाचं दुःख सोसत राहिली, एवढीच काय ती आपल्याला तिची ओळख. मात्र प्रत्यक्षात ही राजस्त्री कशा प्रकारचं आयुष्य जगली असेल ? राम-लक्ष्मण-सीता वनवासात गेल्यावर मागे उरलेल्या ऊर्मिलेच्या अनुल्लेखानं ती विस्मृतीत गेली. आयुष्यभर राजभवनात राहिलेल्या ऊर्मिलेलाच खरा वनवास घडला. तरीही एकाकी पडलेली ऊर्मिला, मनस्वीपणे आयुष्याला भिडली. याचं सहज आणि ओघवत्या शैलीतलं चित्रण या कादंबरीतून अनुभवायला मिळतं. ऊर्मिलेच्या आयुष्याचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा अतिशय वेगवान आणि रोचक पद्धतीनं या कथानकातून समोर येतो. ही काल्पनिक कादंबरी रामायणकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचंही प्रभावी चित्रण करते. इतिहासाच्या गर्भात काही कहाण्या चिरविश्रांती घेत असतात. चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यावर चढलेली काळाची पुटं विरत जाऊन त्या जिवंत होतात. पुरातत्त्व संशोधक असलेल्या स्त्रीला झालेली, रामायण काळातल्या एका उपेक्षित स्त्रीची ओळख तिच्याही जाणिवा बदलून टाकते आणि ऊर्मिलेची उलघाल थेट वर्तमानकाळातल्या स्त्रीच्या जगण्याला येऊन भिडते. भूतकाळातल्या सावल्यांनी स्त्रीचा भविष्यकाळ गडद न करता, त्यातल्या अनुभवांच्या किरणांनी तो उजळावा, हेच सांगतेय ही 'अयोध्येची ऊर्मिला'.
-
Mu.Po.Vadache Mhasve Te U.S.A (मु.पो.वडाचे म्हसवे ते यु. एस.ए)
आनंद म्हसवेकरांचे हे आत्मचरित्र वाचताना, ही एका दलिताची दर्दभरी कहाणी आहे, किंवा त्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारी रडकथा आहे, असे मुळीच वाटत नाही. हे ओघाने येणारे एक जाज्वल्य सत्य आहे, जे जीवनाकडे अत्यंत सहजतेने पाहून समाजाला दोषी न ठरवता त्यातून आपण आपली वाट कशी काढावी याची एक समंजस लढाई आहे. आत्मचरित्र लिहिण्याचे आनंदचे खरेच वय झालेय का, असा प्रश्न पडतो. पण, सत्तरी पार केलेल्या या लेखकाचे वय आकड्यात मोजण्यापेक्षा अनुभवात मोजले की या प्रश्नाचे उत्तर सापडेल. त्याचे उत्तर कदाचित असेही असेल, की आनंदसारखे लेखक हे आजच्या काळातले नाहीत, तर अनादि काळापासून जगताहेत, जगण्याच्या मूलभूत सोयींसाठी झगडताहेत, त्यांची ही धडपड अशा आत्मचरित्रातून वाचा फोडते, तिला आक्रोश न समजता, गणितात हुशार असलेल्या एका गणितज्ञाने आपल्या 'जीवनाचे गणित' किती शांतपणे सोडवले आणि आपल्या कुटुंबाला कशाची झळ न पोचवता, एका समृद्धीच्या वाटेवर आणून सोडले, त्याची ही सुफळ संपूर्ण कर्मकहाणी, म्हणून हे आत्मचरित्र वाचावे ही सदिच्छा. हृषीदांच्या 'आनंद' या चित्रपटात एक वाक्य आहे. 'बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं...' आनंद म्हसवेकरांचे हे आत्मचरित्र आयुष्याच्या अनेक झगड्यांनी भरलेले असले, तरी ते मैलोन्मैल पसरलेले नसून उंचच उंच आहे. अगदी 'आनंद' म्हणतो तसे...
-
The Legend Of Bahirji Naik Part 2 (द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग २)
मराठा स्वराज्य १६६५ : प्रचंड मोठ्या मुघल फौजेने पुरंदरला वेढा घातला आहे अफगाणी सरदार दिलेरखान आणि मोठा नावलौकिक असलेले राजपूत सरदार मिझोराजे जयसिंग त्यांचे नेतृत्व करत आहेत. नुकतेच पंख फुटू लागलेल्या मराठा साम्राज्याला सगळ काही संपल्यासारखे वाटत होते. शिवाजी राजे सगळ्या बाजूंनी वेढले गेले होते, यातून चतुराईने कसा मार्ग काढता येईल याबद्दल राजे आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहेत. पण इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. मुघल आणि आदिलशाही फौजांनी, गुलाम-सरदार असलेल्या सिद्धी जौहरच्या नेतृत्वाखाली आधीच स्वराज्याला वेढा घातला होता. आणि खुद राजे पन्हाळगडावर अडकले होते. आणीबाणीच्या वेळी धाडसी उपाययोजना करणे आवश्यक असते. रात्रीच्या अंधाराआड, थेट शत्रूच्या नाकासमोरून त्यांची सुटका करण्यासाठी एक अत्यंत धोकादायक योजना आखली गेली. तिथून निसटून ते विशाळ गडावर कसे पोहोचले याची चित्तथरारक कथा आणि त्या अनुषंगाने येणारी, मुघल फौजेला नेस्तनाबूत करून टाकणाऱ्या उंबरखिंडीच्या लढाईची कथा. शिवाजी राजांचे प्रसिद्ध गुप्तहेर किंवा गुप्तहेर खाते असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या नजरेतून ही कथा उलगडत जाते. जे काही घडले ते, जगाने कधीच न पाहिलेल्या गनिमी काव्याचे एक सर्वात मोठे उदाहरण बनून गेले.
-
Hidden In Plain Sight (हिडन इन प्लेन साईट)
HIDDEN IN PLAIN SIGHT IS THE SECOND BRILLIANT AND CAPTIVATING NOVEL FEATURING WILLIAM WARWICK BY THE MASTER STORYTELLER AND BESTSELLING AUTHOR OF THE CLIFTON CHRONICLES, JEFFREY ARCHER.NEWLY PROMOTED, DETECTIVE SERGEANT WILLIAM WARWICK HAS BEEN REASSIGNED TO THE DRUGS SQUAD. HIS FIRST CASE: TO INVESTIGATE A NOTORIOUS SOUTH LONDON DRUG LORD KNOWN AS THE VIPER.BUT AS WILLIAM AND HIS TEAM CLOSE THE NET AROUND A CRIMINAL NETWORK UNLIKE ANY THEY HAVE EVER ENCOUNTERED, HE IS ALSO FACED WITH AN OLD ENEMY, MILES FAULKNER. IT WILL TAKE ALL OF WILLIAM’S CUNNING TO DEVISE A MEANS TO BRING BOTH MEN TO JUSTICE; A TRAP NEITHER WILL EXPECT, ONE THAT IS HIDDEN IN PLAIN SIGHT . . . FILLED WITH JEFFREY ARCHER’S TRADEMARK TWISTS AND TURNS, HIDDEN IN PLAIN SIGHT IS THE GRIPPING NEXT INSTALMENT IN THE LIFE OF WILLIAM WARWICK. IT FOLLOWS ON FROM NOTHING VENTURED, BUT CAN BE READ AS A STANDALONE STORY.
-
Ardhakaurav (अर्धकौरव)
एकशे एकवा कौरव – अर्धकौरव. कारण धृतराष्ट्र आणि वैश्य दासी सुघडाचा पुत्र. दासीपुत्र, क्षत्ता.. सूत… किंवा शूद्र. ह्या शूद्र पण महारथी, महाबली, नीतिवान, धर्मनिष्ठ युयुत्सूची… उपेक्षित युयुत्सूची कहाणी… अर्धकौरव.