-
Give and Take (गिव्ह अॅन्ड टेक)
गिव्ह अॅन्ड टेक इतरांना मदत केल्याने तुम्ही यशस्वी कसे होता कठोर मेहनत, भाग्याची साथ आणि प्रतिभा यांची आपल्या करिअरमध्ये मोठी भूमिका असते, हे प्रत्येकालाच माहीत असतं; पण या पुस्तकात लेखक इतरांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हे तत्त्व पटवून सांगतात. ‘आधी मी’ या मानसिकतेचे लोक नेहमी यशाच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचतात, या धारणेलाच हे पुस्तक छेद देतं, तसंच ते यशासंदर्भातल्या आपल्या मूलभूत आकलनात बदल घडवतं, शिवाय आपले सहयोगी, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपलं नातं कसं असावं, यासंबंधीची नवी प्रारूपं सादर करतं.
-
Prayaschitth (प्रायश्चित्त)
सतराव्या शतकात घडणारं आणि हेस्टर प्रिन या स्त्रीच्या आयुष्याभोवती गुंफलेलं हे कथानक. आपल्या मुलाच्या बापाची ओळख पटवू न शकल्यानं हेस्टर अघोरी अपमान आणि सामूहिक हिंसेला बळी पडते. हेस्टरची भूमिका तिला काळाच्या पुढची नायिका ठरवते. अनैतिक वागण्याचं सूचक म्हणून तिला तिच्या शरीरावर एक खूण बाळगण्याची शिक्षा होते. ही खूण पुढे तिचा न बदलता येणारा भूतकाळ आणि मानहानिकारक भविष्यकाळ यांचंही प्रतीक ठरते.
-
Pather Panchali (पथेर पांचाली)
बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.
-
The Ministry Of Utmost Happiness (द मिनिस्ट्री ऑफ
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.
-
Sakshi. (साक्षी)
मानवी भावभावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप गवसते. हा निरंतर संघर्ष या कादंबरीत परमेश्वरय्या यांच्या रूपाने अवतरला आहे. एका खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. पण त्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा पृथ्वीवर पाठवण्यात येत आणि त्यांचा भोवताल साक्षीभावाने पाहण्यास सांगितलं जातं. परमेश्वरय्यांचा हा प्रवास नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षातं प्रतिनिधित्व करतो.
-
Kalpavrukshachi Kanya (कल्पवृक्षाची कन्या)
पौराणिक ग्रंथांमध्ये स्त्रिया कमी आढळत असल्या, तरी त्यांच्या अंगची शक्ती, ऊर्जा आणि गूढता यांचं पानोपानी वर्णन आढळतं. त्यांनी राक्षसांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण केल्याच्या कथाही आहेत. या कथासंग्रहात पार्वती,अशोकसुंदरी आणि भामतीपासून मंदोदरीपर्यंत अनेक निर्भय स्त्रिया भेटीस येतात. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या या स्त्रिया स्वत:च्या नशिबाच्या शिल्पकारही होत्या.
-
E.S.2595 ( इ.स.२५९५)
वैज्ञानिक प्रयोग माणसाला प्रगतिपथावर नेतात; पण या प्रयोगांमध्ये काही त्रुटी राहिल्या, चूक झाली किंवा त्या प्रयोगाचा कुणी गैरवापर केला तर किती गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि माणसाच्या भावविश्वाला त्यामुळे कसा सुरुंग लागतो, याचं प्रभावी चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘इ.स.२५९५.’ यातील ‘जिवंत मशीन’ या कथेतील प्रो. समीर, रीबी नावाचा स्त्री रोबोट बनवतात; पण रीबीकडून सरिताचा खून होतो...‘विचित्र नाती’ कथेतील विनय आणि मनोरमा हे दाम्पत्य परस्परांवर प्रेम करणारं...पण मनोरमाला जीवघेणा अपघात होतो आणि ती मरणाच्या दारात पोचते...विनय तिला क्लोनिंगद्वारे जिवंत ठेवू पाहतो...पण त्यामुळे कशी गुंतागुंत होते? ‘आणि एक स्वप्न विरले’ या कथेत परस्परांना ओळखत नसलेल्या चार व्यक्ती काही कारण नसताना आत्महत्या करतात...पण पोलीस तपासात आत्महत्यांमागचं वैज्ञानिक सत्य उलगडतं...काय असतं ते सत्य?...वैज्ञानिक प्रयोगांतून उद्भवलेल्या गंभीर समस्यांचं भेदक आणि उत्कंठावर्धक चित्रण करणाऱ्या कथा.
-
Faiz Ahmed Faiz Ek Pyasa Shayar ( फैज अहमद फैज एक
फैज अहमद फैज. एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे.फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा प्रयत्न केला, पण ते तिकडेच गेले. आणि अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या गझलांमधून व्यक्त करीत राहिले.तसे फैज होते मार्क्सवादी, डाव्या विचारसरणीचे. रशियाचे समर्थक. ‘लेनिन’ पारितोषिकाचे पहिले मानकरी. आणि तरीही ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे. त्यांचं हे चरित्र. फैज यांच्या गाजलेल्या गजला, त्यांची पत्रकारिता, त्यांची तुरुंगवारी, त्यांची प्रेमप्रकरणं, त्यांच्या आयुष्यातीले असंख्य चढउतार...फैज आणि त्या सर्वांपेक्षाही वरचढ ठरलेली त्यांची अर्धीमुर्धी स्वप्नं... जगावेगळं तेजोवलय लाभलेल्या एका कवीचं रसीलं चरित्र.
-
Mahantecha Dishene Ekatr Yevuya Badal Ghadvuya
महानतेच्या दिशेने एकत्र येऊया, बदल घडवूया एखादं गंभीर आव्हान समोर उभं राहिल्यावर त्यावर यशस्वीपणे मात करतं; सोबतच स्वतःमधील सर्वोत्कृष्ट क्षमतांचं प्रदर्शन घडवतं, तेच राष्ट्र महान असतं. अशा राष्ट्रातील लोक समस्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करत त्या समस्येला पराभूत करतात. जागतिक क्रमवारीत भारताचा ज्या स्थानावर न्याय्य अधिकार आहे, ते गौरवशाली स्थान प्राप्त करण्यासाठी भारताला अजून खूप काही शिकावं लागेल आणि ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या पुस्तकात सांगतात. युवकांना, शिक्षकांना, शेतकर्यांना, सरपंचांना, आरोग्य कर्मचार्यांना, सनदी अधिकार्यांना, न्याय संस्थेतील कर्मचार्यांना, राजकीय नेत्यांना काही महत्त्वाचे संकल्प करण्यासाठी ते या पुस्तकात आवाहनही करतात.
-
Samagra Jayant Naralikar (समंग्र जयंत नारळीकर)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्या – या पाच कादंबर्या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !