-
Daulatbanki Aani Tyacha Khajina (दौलतबंकी आणि त्या
विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी – या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा !
-
Lagna Jamavnya Adhi...(लग्न जमवण्याआधी...)
लग्न कशासाठी ? भावनांचं व्यवस्थापन… डेटिंग…. लिव्ह इन रिलेशनशिप… गृहव्यवस्थापन… व्यक्तिमत्व चाचणी आणि विवाह… मुलामुलींच्या लग्नाविषयी पालकांची भूमिका.. नात्यांचं व्यवस्थापन… लग्न करण्याआधी पत्रिका बघावी का? विवाहपूर्व समुपदेशन.. काळाची गरज… लग्न करण्यामागच्या कारणांपासून ते जोडीदार निवडीच्या निकषांपर्यंत, लग्न सोहळ्याच्या स्वरूपापासून ते स्वत:च्या आंतरिक ओळखीपर्यंत अनेक गोष्टींची तपासणी करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक – लग्न जमवण्याआधी…
-
Close Encounters (क्लोज एनकाउंटर्स)
क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि दुसरं जयवंत दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’. दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. ‘क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. जयंत पवार
-
Nicobarchi Navlai (निकोबारची नवलाई)
निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी ‘कर्णफुलं’ ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली… कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली… या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती…. त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती…. अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे
-
Ha Ye Mumkin Hai ( हा ये मुमकिन है )
बिहारमधल्या दोन वर्षाच्या कामामुळे तरूचं(लेखिकेचं) आयुष्य तर उजळून निघालंच पण ती म्हणते प्रत्येक भारतीयाने समर्पित वृत्तीने निदान वर्षभर जरी सामाजिक काम करायचं ठरवलं तर आपल देश ख-या अर्थाने सुदृढ, विकसनशील होऊ शकतो. प्रत्येक भारतीयाला 'खरंखुरं 'सोनेरी स्वप्न दाखवणारं पुस्तक....