-
Bandivan (बंदिवान)
नजरवैâदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाNया वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरवैâदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!
-
Kahur Eka Vadalache (काहूर एका वादळाचे)
ही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
-
So Cool Tek 2 (सो कूल टेक २)
सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच ‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
-
Seeta (सीता)
सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण र्मूिच्छत पडल्यावर - या साNया महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून ‘पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं ‘सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी
-
Kalokhatun Ujedakade (काळोखातून उजेडाकडे)
इंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.
-
Fakiri Ek Anghad Pravas (फकिरी एक अनघड प्रवास)
पडल्या - झडलेल्या आणि तुटक्या फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास.
-
Tantra Mukti (तंत्र मुक्ती)
माणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. पण अठराव्या शतकातल्या ‘औद्योगिक क्रांती’मुळे ऊर्जांचं अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. केवळ ‘यांत्रिक’ न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : इतकी की, आज आपल्याभोवती एक ‘तंत्रावरण’ तयार झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या साNया तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत मोजतो आहोत ! वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून देणारं हे पुस्तक : ‘समुचित’ तंत्रांच्या संयमित वापराकडे जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. तंत्र : मुक्ती
-
Navgrahya Upasna Aani Grahadosh Nivarnache Upay(नव
प्रगतीत अडथळा आणणार्या ग्रहापासून मुक्ती मिळवण्यासाठी जे उपाय आमच्या ऋषि-मुनिनी सांगीतले आहेत त्यांचा वापर करुन सुखशांती व वैभव मिळवावे आणि दुःख मुक्त कसे व्हावे हे सर्व काही या पुस्तकात आहे.
-
Vardan Ragache (वरदान रागाचे)
महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा हा मराठी अनुवाद.
-
Bhuiringani (भुईरिंगणी)
भुई रिंगिनी पुस्तक हे सदानंद देशमुख ह्यांचे दुसरे पुस्तक आहे जे कि मी वाचले आहे. आणि पुस्तकाच्या सुरवातीला मला वाटले मी नक्की काय वाचत आहे पण जसे पुस्तक पुढे सरकत जाते तसे आपल्याला कळत जाते कि देशमुख हे खरंच जबरदस्त ताकतीचा लेखक आहेत. त्यांचे पहिले पुस्तक जे मी वाचले ते म्हणज़े बारोमास ज्याच्या मध्ये एका शेतकऱ्याची कशी कुचंबणा होत जाते ते त्यांनी दाखवले आहे. ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. पदोपदी आपल्याला ही जाणीव होते की स्वतः देशमुख ह्यांचे नाते भुईशी किती खोल आहे. पुस्तकाचा गाभा हा आहे कि भारतीय पारंपरिक शेती जी होती तिचे नाते निसर्गाशी खूप घट्ट होते. पारंपरिक शेती मधले घटक परस्परावर खूप अवलंबून होते. शेतीचा प्रत्येक घटक ग्रामीण भागात साजरा केला जायचा पण जसे आपण पारंपरिक शेती पासून लांब झालो तसे गावाला बकालपणा तर आलाच पण शेतकर्याचे संकटे पण वाढत गेली. ह्या पुस्तकाची समीक्षा लिहणे खरंच खूप अवघड आहे कारण पुस्तका मध्ये इतक्या गोष्टींचा विचार केलेला आहे कि ज्याला शेतिविषेय कळवळ आहे त्यांनी हे पुस्तक खरंच एकदा वाचले पाहिजे.
-
Bharat Ek Pahani (भारत एक पहाणी)
भारतविषयक सखोल व परिपूर्ण माहिती देणारा मराठी भाषेतील हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. सन १९९५ पासून प्रकाशित होणाऱ्या ' भारत एक पाहणी या वार्षिकात भारताविषयीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, शेतीविषयक आणि शिक्षण, संरक्षण, परराष्ट्रीय संबंध, प्रशासकीय व्यवस्था, शासकीय योजना याची सर्व माहिती येथे एकत्रित दिली आहे. विदयापीठय अभ्यासक्रमातील सामाजिक शास्त्रे, पत्रकारिता, संशोधन या बरोबरच सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांकरिता आवश्यक माहितीसह आकडेवारी या पुस्तकात दिली आहे.
-
Eka Maleche Mani (एका माळेचे मणी)
एका माळेचे मणी या पुस्तकातील प्रारंभी मीर हुसेन किरमानी याने लिहिलेल्या टिपू सुलतानाच्या चरित्राचे मराठी भाषांतर आहे. मुस्लीम आक्रमणाचा हा एक मणी बाकीचे मणी म्हणजे जिना, भुत्तो, झिया-उल-हक अशा कट्टर मुस्लीम लोकांबद्दल सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेले लेख आहेत.
-
Brahmashrichi Smaran Yatra (ब्रह्मर्षीची स्मरण यात
समाधीमध्ये मंगळ, गुरु, शनि या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील स्थिती अगोदर प्रसिध्द केली व ती अवकाश यानांनी मानल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले, दिव्य दृष्टी असलेले साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" ग्रंथाने धूर्त, मुत्सद्दी भीम व महाभारताची ऎतिहासिकता सिध्द करणारे व ज्योतिर्गणिताने तारखा ठरविणारे. "वास्तव रामायण" ग्रंथात पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास मांडून रामाच्या जीवनातील तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द करणारे. उपनिषदे, पातंजल योग व गीता यावरील विज्ञाननिष्ठ निरुपणे प्रकाशून अध्यात्मिक अधिकार सिध्द करणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथातून त्या सिध्दान्ताची वैज्ञानिक मांडणी करणारे. ख्रिस्ताचे हिंदुत्व, प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे, ‘स्वा. सावरकर - मूर्तिमंत गीता, पहिले नि एकमेव’, ‘दास मारूती ? नव्हे; वीर हनुमान !’ वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, संगीत दमयंती परित्याग, युगपुरूष श्रीकृष्ण, तेजस्विनी द्रौपदी अशी सुरस १६ पुस्तके लिहून जगापुढे सत्य मांडणारे. पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या सिध्दहस्त लेखणीतून ५२ वर्षांच्या अध्यात्मसाधनेचे अनुभव अक्षरबध्द झालेले आत्मचरित्र ‘ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा’.
-
Hridam King O.P.Nayyer (ह्रीदम किंग ओ.पि.नय्यर)
ओ. पी. नय्यर हे हिंदी चित्रपट संगीतातील अविस्मरणीय नाव. स्वप्नील श्रीकांत पोरे यांनी या पुस्तकात नय्यर यांच्या संगीत कारकिर्दीचा वेधक आढावा घेतला आहे. सोळा प्रकरणामध्ये ओपींची वाटचाल, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे; तसेच त्यांनी ज्या गायक-गायिकांबरोबर काम केले त्याबद्दल पोरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आशा भोसले आणि ओ. पी. नय्यर हे समीकरण कसं आणि किती यशस्वी झालं होतं, ते येथे तपशीलानं त्यांनी दिलं आहे. ओपींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या शेवटच्या टप्प्याबद्दलही या पुस्तकात रंजक माहिती आहे.
-
Neharu Mithak Aani Satya (नेहरू मिथक आणि सत्य)
पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा आहे. युगायुगांपासून आलेलं तुटलेपण आणि परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारत ज्या विचारांच्या बळावर आपलं पाऊल घट्ट रोवून उभा राहिला आणि ज्या विचारांमुळे त्याचं स्वातंत्र्य सुनिश्चित झालं, त्याचप्रमाणे त्याच्या आधुनिकतेला आणि विकासाला ठोस मार्ग उपलब्ध करून दिला, ते विचार पं. जवाहरलाल नेहरू यांचे होते. या विचारांवर मानवमुक्तीची वैश्विक परंपरा आणि भारतीय चिंतनाचा सखोल प्रभाव होता. त्यांच्या जीवन-संघर्षानं त्यांच्या विचारांना आकार आला होता, भारताप्रती संपूर्ण समर्पण आणि सच्च्या प्रेमानं त्यांच्या विचारांना शक्ती दिली होती. बघता बघता पं. नेहरूंबद्दल असत्य आणि संभ्रमाचा एक विराट ढीग रचला गेला, ही खरोखरच एक दुर्दैवाची बाब आहे.