-
Smrutiyatra (स्मृतियात्रा)
प्रथितयश साहित्यकार, राजकारणी, पत्रकार, इतिहासकार, कवी अशांऱ्यालेखकाबरोबरऱ्याव्यक्तिगत सहवासाऱ्याआठवणींचा ललितरम्य आलेख म्हणजे ‘स्मृतियात्रा हे भा. द. खेर यांचे पुस्तक. लेखक, कवी, राजकारणी अशी विविधांगी व्यक्तिमत्वं, सावरकर, तात्यासाहेब केळकर, श्री. म. माटे, द. वा. पोतदार, वि.स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. दि. मा. , आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, नरसिंह राव इ. विविध क्षेत्रांतील नामवंतांवर प्रसंगपरत्वे लिहिलेऱ्यालेखांचं हे संकलन आहे. सावरकरांची पराकोटीची सकारात्मकता...नरसिंह रावांची विद्वत्ता आणि त्यांच्यातील माणुसकी...यशवंतराव चव्हाणांची साहित्यिकांविषयीची आस्था...वृद्धावस्थेऱ्यालक्षणांचा उच्चारही न करणारे द. वा. पोतदार... आवेशपूर्ण, ओजस्वी असं वत्तृÂत्व असलेले पु. भा. भावे... अष्टपैलू काव्यप्रतिभा लाभलेले कवी मनमोहन...इ. नामवंतांऱ्यागुणांचं दर्शन घडविणारी ही स्मृतियात्रा वाचकांना ऱ्याऱ्याकाळात घेऊन जाते.
-
Ujale Jagnyacha Deep (उजळे जगण्याचा दीप)
ओमर लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू होतो आणि तो उद्ध्वस्त होतो. पुढे त्याचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करतात. जीवनातील निरर्थकता आणि अशाश्वतता त्याला अस्वस्थ करते. ओमर आपल्याला ‘बालक’ आणि ‘प्रौढ’ अशा दोन्ही अवस्थांत भेटत राहतो. एकीकडे ‘मोठा ओमर’ जीवनाला कंटाळून आत्महत्या करू पाहतो, तर त्याच वेळी त्याच्यातील ‘छोटा ओमर’ शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी ‘प्रकाशमय जगाकडे’ जाण्याचा मार्ग शोधतो. या प्रवासात ओमरला त्याचेच प्रतिबिंब असलेला ‘डॉल्फिन ओमर’ भेटतो, देवदूत भेटतो, स्वतः ‘प्रकाश’ झालेला हंस भेटतो आणि मृत्युदूतही. वास्तव आणि स्वप्न यांच्या धूसर सीमेवर घुटमळणारं त्याचं हे दुहेरी भावविश्व आपल्याला काहीसं अंतर्मुख व्हायला लावतं. निरागस स्वप्नरंजनापासून अगदी आध्यात्मिकतेपर्यंतच्या विविध छटा ओमरच्या या जीवन प्रवासात आपल्याला जाणवतात. "
-
Samarth (समर्थ)
समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माऱ्यारक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंतीसारऱ्याउत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवऱ्याभाषेत शब्दबद्ध केला आहे.
-
October Rains (आक्टोबर रेन्स )
प्रेमाचा रस्ता अहंभावाच्या विरक्तीतून जातो. असाच प्रवास डायना करते. एफेसस, आर्टेमिस आणि मदर मेरीची गोष्ट सांगत सांगत तिची गोष्ट बहरत जाते. तिचा हा प्रवास आहे गुलाबांच्या मातीत मिसळण्याच्या, शून्यत्वाच्या शोधाचा. या शोधातच तिला प्रेम गवसतं. सेरकानसोबतचा तिचा हा प्रवास आत्मानुभूतीच्या मार्गावर नेतो. आणि एकमेकांची भाषाही न जाणणारे हे दोघे जीवनाच्या एकाच सत्यापाशी पोचतात. ते म्हणजे दोघांना स्वतंत्रपणे आकळलेलं प्रेम. मथायसपासून विलग होताना ती ज्या डायना ज्या भावनिक टप्प्यावर असते, ते सारे टप्पे या प्रवासात विलीन होत जातात. आणि माणसातल्या अहंभावासारख्या नकारात्मकेकडे दुर्लक्ष करत डायना निव्वळ स्वीकारभावापर्यंत पोहचते. प्रेमातल्या स्वीकाराच्या सहजभावा मंत्र सांगणारी ही अफलातून कादंबरी.
-
Ka Karacha Shikun (का कराचं शिकून)
समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटऱ्यासमाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारऱ्याअभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाऱ्याशिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेऱ्याकल्याणाचा घोष, वरवरऱ्यासर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विमुक्तांऱ्यासर्व पिऱ्याशिक्षणाची हेळसांड करतच नरकात गेल्या; माध्यमिक शिक्षण मोफत झालं, तरी भटक्यांऱ्याशिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीणच होत गेला. गरिबातऱ्यागरिबालाही शिक्षणाचं महत्त्व कळलं; पण आजही या व्यवस्थेबद्दल लोक अत्यंत असमाधानी आहेत. कारण शिक्षणासारऱ्याप्रभावी साधनाचाही शोषणाचे हत्यार म्हणून राजकीय लोक उपयोग करतात. शिकून व न शिकूनही आमऱ्यापरिस्थितीत काहीच फरक पडत नाही...या निराशाजनक परिस्थितीत...सर्वसामान्यांना व भटक्या-विमुक्तांनाही रोज नऱ्याआव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे विमुक्त जातींनाच नाही, तर इतर सर्वांनाच ‘का कराचं शिकून’? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही, हेच खरं.
-
Auschwitchya Lahanagya Pori (ऑशविट्सच्या लहानग्या
आंद्रा आणि तातियाना या अनुक्रमे ४ आणि ६ वर्षांच्या इटालियन बहिणी त्यांच्या रिजेका येथील राहत्या घरातून ऑस्टवीच येथील नाझिंच्या बर्कानौ छळछावणीत नेल्या जातात. सुमारे दोन लाख तीस हजार मुलांतून अवघी काही डझन मुलं तिथून जीवंत परत येतात. या बहिणी त्या भाग्यवान मुलांपैकी एक ठरतात आणि वयाची सत्तरी उलटल्यानंतर त्या सगळ्या अमानुष आठवणी आत्ताच्या जगासोबत वाटून घ्यायला लागतात. `वी लिटल गर्ल्स इन ऑस्टवीच` हे पुस्तक लिहितात. नाझिंच्या विरोधात धाडसाने साक्षी देतात. २०१९ मध्ये हे पुस्तक इटली भाषेत प्रसिद्ध झालं. जर्मनी, इंग्रजी बरोबरीने आता हे पुस्तक मराठीत येत आहे. हे पुस्तक म्हणजे दोन लहानग्या बहिणींच्या छळछावणीतील आठवणी आहेत. डोळ्यासमोर पाहिलेले अनंत मृत्यू आहेत, बचावून परत आल्याचा प्रसंग आहे, छळछावणीच्या अनुभवाचे व्रण घेऊन पुढे जगत राहणं आहे. टोकाच्या वंशद्वेषातून जन्माला आलेल्या अमानुषतेचे निरागस बहिणींच्या दृष्टिकोनातून केले गेलेले हे वर्णन आहे.
-
Gayanache Rangi ( गायनाचे रंगी)
नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका म्हणून ख्यातकीर्त… परंतु चौकटीबाहेर पडून शास्त्रीय गायनात अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या कलाकार म्हणून असलेली त्यांची ओळख काकणभर जास्तच भरते. ख्याल गायनात परंपरेने चालत आलेल्या बंदिशी बहुतांश वेळा ‘सौतन-साँस-नणंद’ या ‘पुरुषसत्ताक विचारांचं उदात्तीकरण’ म्हणून गणना होऊ शकणाऱ्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. नीला भागवत यांनी मात्र निर्मळ मानवी सहभावनेच्या विचारांच्या बंदिशी रचण्याचे प्रयोग केले आहेत. या पुस्तकात या प्रयोगांविषयी, त्यांतील अनुभवांविषयी त्या विस्ताराने सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना ज्या संतसाहित्यातील प्रेम, करुणा, समता, एकता, मानवधर्म अशा भावनांनी प्रभावित केले, त्या प्रभावातून त्यांनी निर्माण केलेल्या संगीताविषयीही त्या आपले विचार मांडतात. गायनाचे रंगी संगीत क्षेत्रातील त्यांची प्रेरणास्थानं, गुरु यांचीही त्यांनी कृतज्ञ भावनेने व्यक्तिचित्रणं पुस्तकात साकारली आहेत. शास्त्रीय संगीताचा चौकटीबाहेर जाऊन बहुपेडी विचार करणारं पुस्तक… गायनाचे रंगी
-
Mudka Kumpan (मुडकं कुंपण)
समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री ! अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची… तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची…. समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण
-
Hits Of Ninety Two (हिट्स ऑफ नाईन्टी टू)
ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला अनेक वर्षांनी पुन्हा आठवणींचा मोहोर फुटला तो पंकज भोसलेच्या कथांमुळे. एका विशिष्ट विनोदबुद्धीने साकारलेल्या ह्या कथा नुसत्या परिसर कहाण्या नसून नव्वदीच्या दशकातील, महाराष्ट्रातील शहरी तरुणाची मनःस्थिती सांगणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स आहेत. पंकजने कथा लिहिताना कॅसेटवरील ट्रॅक्सना नंबर द्यावेत तसे प्रकरणांना नंबर दिले आहेत. अभिजात जगणे, अभिजात ऐकणे, अभिजात पाहणे ह्या संस्कारांना चुना लावून, आधीच्या पिढीने पोसलेल्या फालतू आदर्शवादाला मधले बोट दाखवून, मोठ्या लाटेप्रमाणे आलेल्या हिंदी भाषेतील पॉप्युलर करमणुकीच्या संस्कृतीला नुसते आपलेसे करूनच नाही, तर त्यातील गाभ्यावर विश्वास ठेवून, आपले आयुष्य आखणाऱ्या स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या मराठी तरुण पिढीचे हे कथारूपी विश्व आहे.
-
Red Light Dairies Khuloos (रेड लाइट डायरीज ख़ुलूस)
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !
-
Prerak-Utprerak (प्रेरक उत्प्रेरक)
यशस्वी जीवनासाठी चांगली नोकरी, कठोर मेहनत, बुद्धयांक, भावनात्मक बुद्ध्यांक, उत्तम संवादकौशल्ये हे सर्व मूलभूत घटक आहेत. तरीदेखील, केवळ या सर्व घटकांची उपस्थिती यशाची हमी देत नाही. तर, त्यांना दीर्घकालीन यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्हाला निश्चित अशा उत्तेजन देणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. तो तुमच्या अभिवृद्धीला चालना आणि वेग देतो. हे प्रचंड प्रभावी पुस्तक विविध उत्प्रेरकांची ओळख करून देते. ते तुम्ही जोपासू शकता आणि तुमच्या कामात तसेच जीवनातही प्रगती करण्यासाठी त्यांचा लाभ करून घेऊ शकता. सहज उपलब्ध, आकर्षक असे पुस्तक. मुख्य म्हणजे, यातील सगळ्यांचा केवळ सैद्धांतिक पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेले, आचरण्यास सोपे, 'उत्प्रेरक पुस्तक, जे तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी आणि दररोज, प्रत्येक क्षणामधून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी योग्य साधनांनी सुसज्ज करेल.
-
Vishnumay Jag (विष्णुमय जग)
निवड केलेले अभंग अत्यंत भावपूर्ण आहेत. लेखक प्रा. मधुकर डो यांनी उपयोजलेली भाषा अभिव्यक्ती ही खूप सुबोध आणि लाघवी असून निरूपण केलेल्या भाषेला सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचं मूल्य प्राप्त झालेलं आहे. लेखकाने निवडलेला शब्दसंग्रह आणि त्यातून अभंगगाथेतील काही शब्दांचा दिलेला अर्थसुद्धा उपयुक्त आहे. प्रत्येक अभंगाचे निरूपण करताना त्यांनी पहिल्यांदा स्वतःची दृष्टी त्या अभंगाबद्दलची व्यक्त केलेली आहे. नंतर अभंगाचे चरण दिलेले आहे. त्यानंतर अभंगाचा अर्थविस्तार केलेला आहे. परत एकदा शेवटी स्वतःचे मत मांडून त्याला वास्तवतेच्या स्वरूपामध्ये काय महत्त्व आहे हे स्पष्टीकरणासह मांडलेलं आहे. यामुळे वाचकांना या ग्रंथाचे वाचन करताना एक अद्वैत अनुभूती प्राप्त होईल. त्यातून संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थबोध तर होईलच परंतु एका अभ्यासकाने मांडलेला बोधात्मक अर्थसुद्धा या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. - प्रा. डॉ. हरिदास आखरे ( मराठी विभाग )
-
So I (सो आय)
सो आय...' ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो... आणि जेव्हा उकल होते तेव्हा..... रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. - संतोष हुदलीकर
-
Amrutahuni God (अमृताहुनि गोड)
संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण चरित्र कादंबरी स्वरुपात
-
Lankecha Sangram (लंकेचा संग्राम)
लंका जळेल, अंधःकार व्यापेल. पण प्रकाश टिकू शकेल? भारत, खिपू ३४०० वखवख. राग. दुःख. धुमसते निखारे, युद्धाची ठिणगी पेटवण्यासाठी अधीर पण हे युद्ध वेगळे आहे. हे धर्मासाठी आहे. सर्वश्रेष्ठ देवीसाठी हे युद्ध आहे. सीतेचे अपहरण झालेले आहे. निडरपणे ती रावणाला तिला ठार मारण्याचं आव्हान देते - रामाला शरण यायला लावण्यापेक्षा ती मरण पत्करेल. दुःखाने आणि क्रोधाने राम वेडापिसा झाला आहे. तो युद्धाच्या तयारीत आहे. संताप हे त्याचे इंधन आहे. एकाग्रचित्तता हे त्याचे सुकाणू आहे. आपण अजिंक्य आहोत अशी रावणाची समजूत होती. आपण वाटाघाटी करून शरणागती घडवून आणू असा त्याचा विचार होता. त्याला माहीत नव्हतं... भारतीय प्रकाशन विश्वातील सर्वात वेगवान खपाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मालिकेतील -राम चंद्र मालिकेतील पहिली तीन पुस्तके राम, सीता आणि रावण यांच्या वैयक्तिक प्रवासाचा शोध घेतात. या विशेष चौथ्या पुस्तकात, त्यांच्या कथांचे धागे एकमेकांवर आदळतात आणि स्फोट होतो एका नृशंस संग्रामाचा. धर्मनियमांनी बांधलेला राम निर्दय, क्रूर रावणाचा पराभव करेल? लंका भस्मसात होईल, की कॉडलेल्या वाघासारखी पलटून तुटून पडेल? विजयासाठी युद्धाची भयानक किंमत मोजावीच लागेल का? सर्वात महत्त्वाचे, विष्णूचे उत्थान होईल? आणि या भूमीच्या खऱ्या शत्रूंना विष्णूचे भय वाटेल? कारण भीतीपोटीच प्रेम जन्म घेते. "अमीश भारताचा सर्वात मोठा साहित्यिक रॉकस्टार आहे.' - शेखर कपूर
-
Cosmos (कॉसमॉस)
कुतूहलजनके, कल्पक, वाचनीय, विविधांगी... न्यू यॉर्क टाइम्स विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी. कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील. काय आहे यात : - जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन - इजिप्ती चित्रलिपी - मानवी मेंदू - पदार्थ, सूर्य आणि विश्वं यांचं मूळ सूर्याचा अंत - तारामंडळांचा विकास
-
Tisara Stambha (तिसरा स्तंभ)
सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, 'वैश्विक नैतिकतेची कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे.' छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचे पेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे आपल्याला वाटते. असले संघर्ष ज्या समाजात घडतात, तो समाज तर बदलत असतो. त्या बदलाची दिशा सहिष्णुता, आदर आणि न्याय्यता यांच्याकडे जाणारी असते. त्या रेषेत प्रवास करताना चढ-उतार होतच राहतात. आज आपण उतरणीला लागलो असलो आणि अजूनही फार लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपण मजल-दरमजल करत इथवर आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आशा वाटली पाहिजे. भविष्यात आकस्मिक आश्चर्याचे धक्के बसू नयेत म्हणून आपण भविष्याला आकार देत राहिले पाहिजे. अजून खूप काम करायचे आहे. चांगले आणि शांततापूर्ण एकात्म जीवन जगायचे असेल, तर मार्ग सुज्ञपणे निवडला पाहिजे. आपण तसे करू शकू, असा मला विश्वास आहे.
-
Mrutyukatha (मृत्यूकथा)
‘मृत्यू कथा’ हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात. यातील निवेदकाचे पात्र उगाच घुसडलेले कधीच वाटत नाही. उलट त्याच्या सदसद्विवेकबुद्धीमुळे त्याची उपस्थिती वाचकाला विश्वासार्ह वाटते आणि त्याच्यातील साहित्यगुणांमुळे तर तो प्रशंसनीयच ठरतो.
-
How We Got to Now (हाऊ वी गॉट टू नाऊ)
हाऊ वी गॉट टू नाऊ या सचित्र पुस्तकात स्टीव्हन जॉन्सन यांनी आपल्या दैनंदीन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग असलेल्या सहा अगदी साध्या गोष्टींचा (चष्मा, लंबकाचे घड्याळ, विजेचा दिवा, भूमिगत गटारे, टेलिफोन, विजेचा दिवा) शोध कसा लागला आणि त्यामुळे एकूण जीवनावर किती दूरगामी आणि खोल परिणाम झाले यांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला आहे. अनेक भिन्न क्षेत्रातील वरवर असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये (सूक्ष्मदर्शक यंत्र, ग्लोबल पोझीशनींग, मायक्रोचीप, न्युक्लीय एकीकरण, मानवी स्थलांतर, स्त्रीभृणहत्या) कसा परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा अनपेक्षित असतो हे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळते आणि त्याने वाचक अचंबित झाल्या वाचून रहात नाही. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या खास शैलीमुळे ते जगभर लोकप्रिय आहेत.
-
Oh My Godse (ओह माय गोडसे)
मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल,तर तुम्हाला आधी स्वतः 'माणूस' होणं गरजेचं आहे. गांधी समजून घेण्याची प्रक्रिया ही माणूस होण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी नाही. या प्रक्रियेत तुम्हाला अंतबाह्य उघडं व्हावं लागत. आपल्या जगण्याचा तटस्थपणे विचार करावा लागतो. हे सोपं नसत. म्हणून गांधी सोपा वाटत नाहीं लोकांना, कारण लोकांना माणूस होण्यातही फारसा रस नसतो. त्यांना नथुराम आकर्षक वाटतो. तो सोपा आहे. कारण त्याला कशाचीच जबाबदारी घ्यायची नाही. गांधी अवघड आहे, कारण तो तुमच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला भाग पाडतो. गांधी हि भारताची खरी ओळख आहे. नथुराम हा भारतावरचा कलंक आहे. गांधी हा विचार आहे, तर नथुराम अविचार आहे. गांधी हि जबाबदारी आहे, तर नथुराम हि बेपर्वाई आहे. गांधी हा माणुसकीचा विश्वस्त आहे, तर नथुराम हा माणुसकीचा खुनी आहे. आपण कोणाची निवड करायची? गांधींची की नथुरामची? नथुराम म्हणेल की, माझी निवड करा; पण गांधी सांगेल की, तुम्ही स्वतःची निवड स्वतःच करा. पण तस करताना सत्याला साक्षी ठेवा. माणुसकीचं भान बाळगा. जो हे करेल. तो मग माणुसकीच्या प्रक्रियेत ओढला जाईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.