-
Antaralatil Netradipak Mahila (अंतराळातील नेत्रदीप
जगाच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीचा मागोवा घेताना मानवी इतिहासातील या महत्त्वाच्या क्षेत्रांत आपल्यालाही सहभाग नोंदवता यावा यासाठी प्रदीर्घ लढा दिलेल्या महिलांच्या चरित्रात्मक कथांच्या माध्यमातून आपण जणू अवकाशाचीच सफर करणार आहोत. या पुस्तकातील दहा चरित्रकथांची सुरुवात झाली कित्येक वर्षांपूर्वी. आकाशातील तारकापुंजांचा नकाशा तयार करण्याच्या कामात सहभाग घेणार्या, अवकाशातील परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवणार्या आणि अवकाशात पाऊल ठेवत इतिहास घडवणार्या अशा अनेक अवकाशनायिकांना तुम्ही या पुस्तकात भेटाल. या महिलांनी तारकांपर्यंत पोहोचण्याचं जे झगमगतं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा चित्तथरारक मोहिमा हाती घेतल्या, त्यात त्यांना कोणती आव्हानं पेलावी लागली, यामधून त्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात कशी भर पडत गेली, अवकाशातील गमतीजमती त्यांना कशा अनुभवता आल्या याची वेधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
-
Santashreshtha Dnyanadev-Jeevan Ani Karya (संतश्रे
भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे. संत ज्ञानदेवांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना-प्रसंग यांचा सश्रद्ध चिकित्सेद्वारे अभ्यास करण्याची गरज लेखकाने यातून सूचित केली आहे. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रावरील सोळा इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा काही विदेशी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र प्रकरणाद्वारे पुस्तकात दिला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम जुळवून आणला. त्यातून कोणती स्थित्यंतरे झाली, याचे आणि पालखी सोहळ्याचे यथार्थ वर्णन यामध्ये आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रविषयक प्रकाशित-अप्रकाशित, तसेच मराठी, संस्कृतबरोबरच देशी-विदेशी भाषांतील संदर्भसाहित्याचे दालन वा. ल. मंजूळ यांनी याद्वारे आपल्या पुढे खुले केले आहे.
-
Pandavapuram (पांडवपूर)
एक दिवस ती अचानक भडकली. आपल्या पाचही पुरुषांना समोर एका रांगेत उभे करून ती ओरडली - मी तुमच्या सर्वांचा एकसारखाच तिरस्कार करते. किड्या-मुंग्या व कुजलेल्या. अन्नपदार्था सारखी मला तुमच्या सर्वांची किळस येते. ते ऐकून पाचही पुरुष हादरून एकमेकांकडे बघत स्तब्ध उभे राहिले. आईने मात्र थकलेल्या आवाजात तिला विचारले 'सुनबाई, तू विचार करूनच बोलतेस ना ?' 'हो !' ती कठोर शब्दात म्हणाली.... 'मला एक गोष्ट सांगायची आहे.... तुम्हीच तुमच्या या वीर पुत्रांना नपुंसक करून टाकले आहे, आता हे पुरुष पण नाहीत आणि स्त्री पण...' एक विलक्षण कादंबरी....
-
Bedhadak- Maza Aatala Avaj (बेधडक-माझा आतला आवाज)
नमस्कार, माझं हे तिसरं पुस्तक ! खरंतर मी लेखक नाही पण तरीही तीन पुस्तकं लिहीण्यापर्यंत मजल मारलीच, ती केवळ तुम्हा वाचक व रसिकांच्या जोरावर! आसपास घडणाऱ्या घटना पाहून मन ढवळून निघतं माझं ! ती अस्वस्थता ह्या पुस्तकात बाहेर आलीये वेगवेगळ्या लेखातून ! आपल्याला नक्कीच हे पुस्तक वाचतांना तुमचा आतला आवाज बोलतोय असं वाटेल. म्हणून हे पुस्तक खास तुमच्यासाठी ! - आपलाच शरद पोंक्षे
-
Mich Evadha Shahana Kasa (मीच एवढा शहाणा कसा)
चेहऱ्यावर गांभीर्य ठेवून आयुष्याकडे मिश्किलपणे पाहता आलं पाहिजे. रोजच्या जगण्यात जेवढ्या कटकटी, समस्या असतात तेवढीच गंमतही असते. 'खाली डोके वर पाय' करुन पाहिलं तर त्या गमतीची मजा घेता येते. विनोद आणि हास्य आपल्या आजूबाजूलाच असते. आपल्याला ते अनुभवायचे असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतःमधील विसंगतीही टिपता आली पाहिजे, म्हणजे इतरांवर हसण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो. अशाच निरीक्षणातून जन्माला आलेले हे लेख आहेत.
-
Mudi (मुडी)
ही आहे दिलीप अनंत सावंत यांच्या गावाकडच्या हृद्य आठवणींची मुडी. १९७० च्या दरम्यानचं कोकणातलं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं गाव, साधेपणानं पण स्वाभिमानानं जगणारी आपल्या कुटुंबातली माणसं, नमुनेदार गाववाले, शेती-भाती, झाडं-पेडं, पशु-पक्षी यांच्या आठवणी काढत ही कहाणी सुरू होते. काही सुखद स्मृती, काही व्याकुळ करणाऱ्या. यातून आत्मशोध घेता-घेता लेखक समस्त ग्राम समष्टीला आपल्या वेंगेत घेऊ पाहतो. ऐकत रहाव्यात अशा 'गजाली' सांगत राहतो. आजच्या काळाशी स्वतःला आणि वाचकांना जोडून घेत आठवणींची मुडी सोडत आणि पुन्हा घट्ट बांधत राहतो. 'मुडी' म्हणजे तांदूळ साठवून ठेवायची गवताची मोठ्या आकाराची खोबण. मुडी बांधण्याचं आणि ती घट्ट रहावी म्हणून भवताली दोरी गुंडाळण्याचं कसब सगळ्यांकडेच नसतं. मुडी बांधणारा आचार- विचारांनी स्वतः एकसंघ असावा लागतो. कलावंत मनाचा असावा लागतो. लेखकाचे आजोबा लाडोबा सावंत-पटेल फोंडाघाट पंचक्रोशीत मुडी बांधण्यासाठी नावाजलेले शेतकरी होते. त्यांच्या नातवाचं हे लेखनही त्यांच्याच वाटेवरुन शब्दपंढरीच्या दिशेने निघालं आहे.
-
Nirnay Menakecha (निर्णय मेनकेचा)
दुग्धसागराच्या मंथनातून निर्माण झालेली मेनका ही सर्वांगसुंदर स्वर्गीय अप्सरा आहे. बुद्धी आणि चातुर्याचा अवीट संगम तिच्यात झाला आहे. सारी सुखं तिच्या पायापाशी हात जोडून उभी असताना तिला मात्र आस आहे कौटुंबिक सौख्याची - जे तिला कधीच मिळू शकणार नाही. दूर तिथे पृथ्वीवर कठोर तपश्चर्या करून एका मर्त्य मानवाने देवांना आव्हान दिलं आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक असलेल्या या मानवाला विश्वामित्र म्हणून ओळखलं जातं. त्याच्या वाढत्या सामर्थ्याने देवराज इन्द्र सचिंत झाला आहे. विश्वामित्राच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालण्यासाठी, त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवेन्द्र मेनकेला पृथ्वीवर पाठवण्याचं ठरवतो. मेनका आणि विश्वामित्र एकमेकांना भेटल्यानंतर काय होईल? कौटुंबिक सौख्याची मेनकेची इच्छा पूर्ण होईल का? की पुन्हा एकदा तिला आपल्या दैवगतीला शरण जावं लागेल. पुराणकथेतील सर्वाधिक चित्तवेधक मोहक पात्रांना भेटा आणि जाणून घ्या.
-
Unbroken (अनब्रोकन)
22 मार्च, 2016 तो खरंच एक दुर्दैवी दिवस होता ब्रुसेल्सहून नेवार्कला जाणार्या विमानात केबिन-क्रू-मॅनेजरची जबाबदारी निधी चाफेकर यांच्यावर होती. त्या दिवशी दहशतवाद्यांनी ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणला. या हादरवून टाकणार्या हल्ल्यात बत्तीस जणांचे प्राण गेले आणि तीनशेहून अधिक लोक जखमी झाले. निधीसुद्धा या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाल्या. स्फोटानंतर काही मिनिटांनी टिपण्यात आलेला त्यांचा फोटो या दहशतवादी हल्ल्याचा जणू चेहराच झाला. दहशतवादी हल्ल्याच्या या वावटळीत अनेकांची आयुष्यं अक्षरशः हादरून गेली. या तीव्र धक्कादायक प्रसंगातून आणि त्यानंतरच्या नियमित वैद्यकीय उपचारांतून उभ्या राहिलेल्या निधी चाफेकर या पुस्तकात जणू एखाद्या झुंजार नायिकेप्रमाणे आपल्यासमोर येतात. त्यांची ही कथा तुम्हाला श्वास रोखून धरायला लावेल आणि त्याच वेळी अनोख्या ऊर्जेने भारूनही टाकेल.
-
Early Indians (अर्ली इंडियन्स)
अर्ली इंडियन्स आपले पूर्वज कोण होते आणि आपण कुठून आलो हे सांगणारी गोष्ट लेखक - टोनी जोसेफ अनुवाद - शुभांगना अत्रे व इंद्रायणी चव्हाण पुस्तकाविषयी शारीरिक दृष्टीने बुद्धिमान मानवांचं या ग्रहावरील आगमन, या प्रश्नावर दिवसेंदिवस गरमागरम चर्चा होत असतानाच टोनी जोसेफ यांनी प्रशंसनीय रितीनं त्याचं निराकरण केलं आहे. मानवी अवशेषांच्या आधारे प्राचीन डीएनएच्या अभ्यासामध्ये नव्यानंच झालेल्या संशोधनाचा खोलवर विचार करून त्यांनी ‘आर्यांचं स्थलांतर’ हा विषय मुळातून स्पष्ट केला आहे. लगेच निष्कर्ष काढता येईल, असा हा विषय नाही. त्याची गुंतागुंत वाढत जाणारी आहे. या विषयावरील आपल्या विचारांना पुष्टी देण्यासाठी जोसेफनी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि साहित्यातील विविधांगी माहिती क्रमबद्ध रितीनं दिली आहे.
-
Rahul Bajaj (राहुल बजाज)
लेखिकेने या पुस्तकातून राहुल बजाज आणि त्यांचे विविध घडामोडींनी भरलेले खळबळयुक्त जीवन यांचे कसलाही आडपडदा न ठेवता चित्रण केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राहुल बजाज यांच्या आई तुरुंगात गेल्या होत्या, त्या प्रसंगापासून कहाणी सुरू होते आणि नव्या आशा मनाशी बाळगणाऱ्या एका स्वतंत्र देशातील प्रारंभीचे जीवन कसे होते, त्याची झलकच आपल्याला मिळू लागते. नवनव्या ‘स्टार्ट अप्स'च्या युगात ‘हमारा बजाज'च्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या माणसाच्या शाश्वत वारशाचे चित्रण गीता पिरामल यांनी अत्यंत कौशल्याने केले आहे. अत्यंत बारकाईचे निरीक्षण आणि सखोल अंतर्दृष्टी यांच्या जोडीला या चरित्रात कुटुंब, व्यवसाय आणि सार्वजनिक जीवन यांविषयीचे आणि समाजवस्त्रावर कधीही पुसला न जाणारा असा आपला छाप अंतिमतः कसा सोडून जावा याविषयीचे अतुलनीय धडेही चटकदार शैलीत दिले आहेत.
-
Daityaraj Auto Shankar Ani Itar Katha (दैत्यराज ऑट
रानटी अवस्थेत राहणारा माणूस सुसंस्कृत होण्यासाठी हजारो वर्षं लागली, पण माणूस खरंच सुसंस्कृत झाला का? मानवी इतिहासातली अनंत युद्धं आणि त्यात गेलेले लक्षावधी बळी काहीतरी वेगळंच सांगतात. चेहऱ्यावरचे मुखवटे उतरतात आणि त्यामागची हिंसक वृत्ती सतत दिसत राहते. जगभरात घडणारे गुन्हे माणसांतली श्वापदं जिवंत असल्याचे दाखले रोज देतात. गुन्ह्यांच्या या कथा मानवी मनातल्या हिंसक भावनांचं ‘कॅथार्सिस’ आहेत. हा ‘कॅथार्सिस’ अधिक गतिमान आणि प्रबळ करणाऱ्या थरारक कथा कल्पिता राजोपाध्ये यांच्या धारदार लेखणीतून...
-
Doglapan (दोगलापन)
माझ्या आयुष्यात नायक, खलनायक, चरित्र कलाकार आणि अशा बऱ्याच जणांचा वाटा आहे. ही माझी खरी जीवन कहाणी आहे, जिने मला अनुभवसमृद्ध केले, अकाली पांढरे केस दिले, माझे खरे मित्र आणि हितचिंतक कोण याबद्दल सावध केले आहे; अपयशात यश आणि यशात अपयश यांचे 'दोगलापन' याविषयी बरेच काही शिकवले आहे; त्याचबरोबर जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याची सखोल समज दिली; आणि हे सांगण्याची खरं तर गरज नाही, पण जीवनाने अनपेक्षितरीत्या भिरकावलेल्या अनेक चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची पुरेशी संधी दिली. - अश्नीर ग्रोव्हर दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए केल्यावर एमएक्स, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून तो करिअर घडवतो आणि ग्रोफर्सचा सीईओ तसेच भारतपेचा संस्थापक म्हणून या दोन कंपन्यांना युनिकॉर्न बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अश्नीर यांच्या आयुष्यात उलथापालथ होत असतानाही शार्क टँक इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोमधील एक परीक्षक या नात्याने त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. विवाद, मीडिया स्पॉटलाइट, सोशल मीडियावरील वाचाळवीरांमुळे काल्पनिक गोष्टींपासून सत्य वेगळे करणे कठीण असते. स्टार्टअप इंडियाचा आवडता आणि गैरसमज झालेला पोस्टर बॉय अश्नीर ग्रोवर यांची ही नि:संदिग्ध कथा आहे. निर्मळ प्रामाणिकपणाने आणि अतिशय मनापासून सांगितलेल्या कथेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
-
Warren Buffett (वॉरन बफे)
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं… ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन… जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.