-
Olakh Aplya Vishvachi (ओळख आपल्या विश्वाची)
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यान्पिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्याक आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्यात या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
-
Punha Ekada Stri Purush Tulana (पुन्हा एकदा स्त्री
मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय़ पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय़ मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणार्याग तिच्या कणखरपणाविषयी!
-
Nikola Tesla (निकोला टेस्ला)
‘अग्नीवर मिळवलेले नियंत्रण’ हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच! आज तर आपण ‘विजेशिवाय आयुष्य’ अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान विकसित करणार्याय वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला! विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणार्याण या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.
-
Teen Hotya Pakshinee Tya (तीन होत्या पक्षिणी त्या)
डोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामथ्याने नेपायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...
-
Mahajalache Muktayan (महाजालाचे मुक्तायन)
‘चित्तो जेथा भोयोशून्यो’ या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणार्याी या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय, सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
-
Asahi Ek Kimayagar (असाही एक किमयागार)
एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते हणमंतरावांचे मुख्य ध्येय आहे की, जितके शक्य आहे, तितके समाजाचे हित करण्याचा प्रयत्न करायचा. ते नेहमी म्हणतात की, त्यांना दहा कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे; आणि ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यातून लवकरच आपले ध्येय गाठतील. नुसते उपदेश देऊन नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या वागणुकीतून अनेकांना काम करण्याची प्रेरणा दिली आहे. अनेक तरुणांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत केली आहे.
-
Rakhetun Ugavatikade (राखेतून उगवतीकडे)
ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
-
Sattechya Padchhayet (सत्तेच्या पडछायेतून)
यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.
-
Devgandharv (देवगंधर्व)
भास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, “ भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं.” हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे ‘नाथ हा माझा’ सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
-
Katta Model (कट्टा मॉडेल)
विज्ञानात कुणी छोटा-मोठा, खालचा-वरचा नाही. नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. न सुटणारी कोडी एखादा पोरच सोडवून जातो. विज्ञानाचा प्रवाह कुठूनही कुठेही वाहू शकतो. वैज्ञानिकांनी, प्राध्यापकांनी, विज्ञानलेखकांनी विज्ञानशिक्षण शिकवायचं, लोकांसमोर मांडायचं आणि विद्यार्थ्यांनी, सामान्य वाचकांनी त्यांच्यापासून फक्त शिकायचं – या समजुतीला जोरदार तडा देणा-या अनुभवांचं हे कथन. विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, ज्ञान-विज्ञानात मोलाची भर टाकू शकतो. हे केवळ इतिहासातच घडलं आहे असं नाही; तर आजही नित्य नेमानी घडू शकतं, घडत आहे. मोठमोठ्या उपकरणांनी समृद्ध प्रयोगशाळा असतात विद्यापीठे अन् संशोधनसंस्थांमध्ये. सामान्य माणसाची प्रयोगशाळा आहे ‘कट्टा’. प्रत्येकाला सर्वकाळ आणि सर्वत्र उपलब्ध असलेली. अशा ‘कट्टा’ प्रयोगशाळेतून विज्ञानक्षेत्र अधिक निकोप आणि लोकाभिमुख करणारे
-
Javed Akhtar : Navya Suryachya Shodhat (जावेद अख़्
जावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. ‘सलीम-जावेद’ या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक यशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या लेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय चित्रपटगीतं उमटली. ‘तरकश’ अन् ‘लावा’ या कवितासंग्रहांमध्ये बुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी केलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, आपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं ‘एथेइस्ट’ असणं या सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार्याचा सार्थ अभिमान बाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.
-
Nisargakallol (निसर्गकल्लोळ)
कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...
-
Adhunik Vaidyak : Tathya ani Mithya (आधुनिक वैद्यक
आज आपणा सगळ्यांचे जीवन तणावग्रस्त आहे. तांत्रिक प्रगतीचा अनावर ओघ, सगळ्या व्यवसायांचे अन् व्यवहारांचे वैश्विकीकरण करण्याचा ध्यास, जीवनाच्या सर्व पैलूंचे सपाटीकरण करण्याचा हव्यास आणि तथाकथित विज्ञानाच्या ठोकळ चौकटीत मानवी आयुष्याचे प्रत्येक अंग बसवण्याचा आग्रह ही या युगाची वैशिष्ट्ये. वैद्यकीय क्षेत्रालाही ती लागू आहेत. विविध प्रकारच्या तांत्रिक प्रगतीतून वैद्यकशास्त्राचा चेहरा-मोहराच पालटून गेला आहे. वैद्यकाचे बदलत गेलेले हे प्रारूप भरकटत तर चालले नाही ना? समाजात शारीरिक, मानसिक आरोग्याचा प्रसार व्हावा, सर्वसामान्यांचे जीवन सोपे, सुखकर, आनंदी व्हावे - हे वैद्यकाचे ध्येय असावे, असे जर आपण मानले; तर सध्या चालू असलेला वैद्यकशास्त्राचा प्रवास योग्य दिशेने चाललेला आहे का? वैद्यकीय विवेकच भ्रष्ट होतो आहे का? वैद्यकीय व्यवसायाला ग्रासणार्या या नवनिर्मित समस्यांवर सखोल विचार करणारे, वैद्यकक्षेत्रातील जागल्याचे काम करणारे एका प्रामाणिक डॉक्टराचे साक्षेपी चिंतन.
-
Ya Jivanache Kay Karu? (या जीवनाचे काय करु?)
अभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकाने महाराष्ट्राच्या हृदयाला व जीवनशैलीला हात घातला. ‘कोवळी पानगळ’ अहवालाने महाराष्ट्राच्या सामाजिक संवेदनशीलतेला हलवले. ‘निर्माण’ या उपक्रमाने युवा पिढीसमोर नवी क्षितिजे उभी केली. आता ते महाराष्ट्राशी संवाद करत आहेत, एका खास प्रश्नावर. या जीवनाचे काय करू? माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही!! ...पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी, या हेतूने घेऊन येत आहोत... अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह. या जीवनाचे काय करू? ...आणि निवडक
-
Veer Savarkar (वीर सावरकर)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : ‘सावरकर म्हणजे तेज! सावरकर म्हणजे त्याग! सावरकर म्हणजे तप! सावरकर म्हणजे तत्त्व! सावरकर म्हणजे तर्क! सावरकर म्हणजे तळमळ! सावरकर म्हणजे कविता अन् सावरकर म्हणजे क्रांती!' सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक दुर्लक्षित पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या साहाय्याने उजेडात आणणारा आणि सावरकरांवरील अनेक टीकांचे सज्जड प्रमाणांच्या आधारे निराकरण करणारा मौलिक दस्तऐवज. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगिंत असा कवण जन्मला
-
Laplel London (लपलेलं लंडन)
या पुस्तकात लंडननिवासी लेखक अरिंवद रे लंडनचा एक वेगळाच, लपलेला कोपरा आपल्याला दाखवतात. इथं आहेत भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, इटली, बल्गेरिया, आफ्रिका अशा देशांतून लंडनमध्ये स्थलांतरित झालेली माणसं. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या वर्गात ती माणसं दाखल होतात आणि आपल्यासमोर लंडन जीवनशैलीचे एकेक अनोखे पदर उलगडू लागतात. रक्तात भिनलेले स्वत:च्या मातीतले संस्कार विसरू शकतात का ही माणसं? ‘वेळ आणि पैसा' ही ब्रिटिश संस्कृती कितपत आत्मसात करू शकतात ही माणसं? लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी राबराब राबणं.... पासपोर्ट्स जाळणं.... कागदी लग्न जुळवणं.... काय काय वाटा पळवाटा शोधतात ही माणसं ! लंडनमधील खाजगी इंग्रजी शाळा, त्यांचे लबाड संस्थाचालक ! शेअरींग हाऊसमध्ये दाटीवाटीनं राहणारे टेनंट्स, त्यांच्या व्यथा आणि कथा ! अरिंवद रे ही सारी पात्रं, प्रसंग इतक्या चित्रमय, संवेदनशील, खेळकर शैलीत मांडतात की, हे पुस्तक उघडल्यावर पूर्ण केल्याशिवाय मिटणं अशक्य ! अ-निवासी भारतीयाची आपल्याला अंतर्मुख करणारी कहाणी.
-
Kaleteel Bharateeyatvachee Chalwal - The Bombay Re
‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.
-
Taryanchee Jeevangatha (ताऱ्यांची जीवनगाथा)
निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो ताऱ्यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? 'तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसऱ्या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा । डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.