-
The Hungry Tide (द हंग्री टाइड)
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
-
Share Bazaar (शेअर बाजार)
शेअर बाजाराविषयी सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे. चांगला गुंतवणूकदार होण्यासाठीचं तसंच शेअर बाजाराच्या उगमाविषयीचं विवेचन सुरुवातीला केलं आहे. नंतर शेअर बाजाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या तसेच सट्टेबाजी करणार्या व्यक्तींच्या अनुषंगाने शेअरबाजार हा विषय विस्तृतपणे मांडला आहे. त्या त्या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य होतं, हे सांगताना त्याचे स्वभावविशेष आणि त्याचं खासगी जीवन याकडेही लक्ष वेधलं आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराकडे आकृष्ट करणं, शेअरदलालांना प्रशिक्षण देणं, ही होती चार्ल्स मेरिलची वैशिष्ट्यं. अभ्यासाच्या जोरावर शेअरबाजाराविषयी अचूक भाकितं करणं, ही होती एडसन गोल्डची खासीयत. तर, अशा व्यक्तींच्या माहितीमधून शेअर बाजाराचे विविध पैलू, विविध देशांची चलनं, शेअर बाजाराचा अर्थकारणाशी असलेला संबंध इ. बाबी उलगडतात. आवश्यकतेनुसार कोष्टकं दिली आहेत. शेवटी संदर्भसूची जोडली आहे. शेअर बाजाराविषयीचं साध्या-सोप्या भाषेतील रोचक पुस्तक.
-
Zero Day (झिरो डे)
मुंबई शहरात प्रचंड गोंधळ माजला आहे. शहराच्या रस्त्यावरील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद पडले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे मुख्य शाहवाझ अली मिर्झा यांच्या कार्यालयीन ई-मेलवर आलेल्या इमेलमध्ये या सायबर हल्ल्याची जबाबदारी मुन्तकिम नावाच्या अतिरेक्याने घेतली आहे. त्याने आणखी हल्ल्यांची धमकी दिली आहे. मिर्झांसह सायबर गुन्हे शाखेचे आयजी विक्रांत सिंग, राष्ट्रीय सुरक्षा बलाची मेजर शायना वर्मा आणि इतर तिघे लगेच सायबर जगताच्या काळोख्या गुन्हेगारी जगतात शोध घेऊ लागतात. पण हॅकरला घेरण्यासाठी मिर्झा आणि विक्रांत यांनी खेळलेली खेळी उलटी पडते. परिणामी शहरावर आणखी एक सायबर हल्ला होतो आणि तोही मुंबईची जान असलेल्या रेल्वे सेवेवर! झिरो डेचे संकट संपूर्ण देशाच्या यंत्रणेला कोसळवू शकते. मिर्झा आणि विक्रांत झिरो डेमध्ये त्यांचे आयुष्य पणाला लावून या महाभयंकर अस्त्राचा सामना करण्यास सज्ज आहेत.
-
Lokshahichya Hatyesathi (लोकशाहीच्या हत्तेसाठी)
"मर्मभेदी जीवनकथा आणि तीक्ष्ण, अभ्यासू अंतर्दृष्टी यांचे मिश्रण असलेले ‘लोकशाहीच्या हत्येसाठी` हे पुस्तक भारत हा एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ होता आणि आता तो मोदी शैलीतील लोकानुनयवादामुळे मोडकळीस येतो आहे या मताला नाकारते. आज नागरी स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीत्मक संस्थांवर होणार्या हल्ल्यांच्या ऐतिहासिक मुळांपाशी हे पुस्तक जाते. लेखकांचे असेही प्रतिपादन आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका आणि सत्तेच्या विभाजनापेक्षा बरेच काही आहे. ती एक प्रतिष्ठेने जगली जाणारी जीवनशैली आहे. आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या सामाजिक पायाकडे लेखकांनी विशेष लक्ष दिले आहे. अस्तित्वाच्या दैनंदिन लढायांकडे हे पुस्तक प्रभावीपणे आपले लक्ष वेधते. प्रत्यक्ष अनुभवलेले सामाजिक अन्याय आणि पारतंत्र्य भारतीय निवडणुकांचा अर्थ कशा प्रकारे हिरावून घेतात आणि त्याच वेळी प्रशासकीय संस्थांची अवनती होत त्यांची पोलादी पकड कशी मजबूत होत जाते याचा खुलासा या पुस्तकातून होतो. देशात जे घडते आहे ते जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे याकडे हे पुस्तक लक्ष वेधते. आणि लोकशाहीत राहणारा प्रत्येक तिसरा माणूस भारतीय आहे म्हणूनच केवळ ते महत्त्वाचे नाही. पुस्तक दाखवून देते की जेव्हा लोकशाही व्यवस्था आपल्या सामाजिक पायाला उद्ध्वस्त करतात तेव्हा त्या फक्त लोकशाहीचा आत्मा आणि सारतत्त्वच मारत नाहीत तर जुलूमशाहीची पायाभरणी करतात. "
-
Gulamacha Jina,Andharatala Jagana (गुलामाचं जिणं अ
गुलामांचा जिंण अंधारातल जगण बीड हा दुष्काळाच्या छायेतला मागास जिल्हा. पाऊस कमी. सिंचन व्यवस्था नाही, त्यामुळे शेती नाही. उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे हाताला काम नाही. मग माणसाने पोट भरावं कसं ? या परिस्थितीत जगण्यासाठी इथली माणसं उस तोडायला जातात. सांगली-कोल्हापूरपासून पार कर्नाटकपर्यंत. सहा सहा महिने बायको पोरांसह तिकडेच राहतात. त्यांच्या राहण्याला 'राहणं' कसं म्हणणार? फाटक्या-तुटक्या उघड्या खोपट्यातला तो संसार. पहाटे तीनपासून काम संपेपर्यंत गुरासारखं राबायचं. काहीबाही शिजवून पोटात ढकलायचं. रानटी प्राणी आणि रानटी माणसं यांच्या भीतीखाली जगायचं. कामगार म्हणून नोंद नसल्याने ना वेतननिश्चिती, ना बोनस, ना पेन्शन. पोराबाळांच्या शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या सगळ्या वाटा खुंटलेल्या जणू गुलामाचं जिणंच. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली. पण लोकांचं तोंड गोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या उसतोड कामगाराचं आयुष्य मात्र कडूजार आहे. 'भारत आमचाही देश आहे आणि आम्हाला इतरांसारखं मानाचं जगणं हवं आहे', असं त्यांचं म्हणणं आहे. उसतोड कामागारांचे प्रश्न, त्यांच्या बायकामुलांच्या समस्या, त्यांचं जिणं सुधारावं यासाठी शासनस्तरावर झालेले प्रयत्न, 'शांतिवन' या संस्थेमार्फत राबवले जाणारे उपक्रम आणि मागण्या यांची दोन दशकांतील कामाच्या आधारे चर्चा करणारं पुस्तक.
-
Pichkari (पिचकारी)
हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक आणि डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी…
-
Angulimal (अंगुलीमाल)
अंगुलीमाल इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या - अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ? हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा? मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ? श्रावस्थीमध्ये कुठून आला? कशासाठी आला? अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!
-
Gadhivarun (गढीवरून)
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत. आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे, यापेक्षाही आपला इतिहास केवळ दिव्य होता हेच सांगण्यात ज्यांना कृतकृत्यता वाटते, किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवरून केवढी जबरदस्त सरदारी होती, याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकून खात राहणं आणि त्यालाच 'खानदानीपण' म्हणत राहणं, यातलं विदारकत्व राजाभाऊ, विनोदाच्या उपरोधाच्या उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात, तेव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्वाचं वाटत राहतं. मराठी साहित्यात मानसपुत्रांची मोठी परंपरा आहे. बाळकराम आणि तिबूनाना किंवा चिमणराव आणि गुंड्याभाऊ वगैरे अतिशय प्रसिद्ध जोड्यांमध्ये या गढीवरून प्रकटत असलेली 'राजाभाऊ' आणि 'तंबूशेठ' ही जोडीही नक्कीच एक वेगळा आणि स्मरणीय ठसा उमटवणारी आहे. एकुणातच या संग्रहाच्या निमित्ताने 'गढीवरून' उतरून एक सशक्त अशी कथात्मक अभिव्यक्ती साहित्याच्या प्रदेशात प्रवेश करत आहे. वाचकांनी उत्सुकतेने स्वागत करावं, असंच हे कथन आहे.
-
Miracle (मिरॅकल)
कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ – ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? फायर फ्लाय अॅाक्शन मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो. मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ? कोणता होता त्याचा निर्णय ? मिरॅकल हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत. माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ ! गुरूमहाराज विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे. आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणार्याय - मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्याा - उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य !
-
Rag Darbaree (राग दरबारी)
तलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
-
Olakh Aplya Vishvachi (ओळख आपल्या विश्वाची)
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यान्पिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्याक आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्यात या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
-
Punha Ekada Stri Purush Tulana (पुन्हा एकदा स्त्री
मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय़ पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय़ मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणार्याग तिच्या कणखरपणाविषयी!
-
Nikola Tesla (निकोला टेस्ला)
‘अग्नीवर मिळवलेले नियंत्रण’ हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच! आज तर आपण ‘विजेशिवाय आयुष्य’ अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान विकसित करणार्याय वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला! विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणार्याण या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.
-
Teen Hotya Pakshinee Tya (तीन होत्या पक्षिणी त्या)
डोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामथ्याने नेपायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...