-
Charlatans (शार्लटन्स)
बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू... त्यानंतर आणखी दोन मृत्यू...तीनही वेळेला अॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन...... डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय... नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण...एवाऱ्याभोवती गूढतेचं वलय...अचानक ते दुरावतात...नोहाला निलंबित केलं जातं...त्याचा पाठलाग होत असतो... काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.
-
The Monkeys Raincoat (द मंकीज रेनकोट)
जेव्हा एलन लँग एल्विस कोलच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तिचा नवरा आणि मुलगा दोघेही बेपत्ता असतात. वरकरणी पाहता हे प्रकरण साधे वाटत असले तरी एल्विस कोल किंवा त्याचा ताकदवान सहकारी ज्यो पाईक यांना त्यात फार काही रोमांचक किंवा आव्हानात्मक वाटत नाही. पण हॉलिवूडच्या स्टुडिओपासून सुरू झालेले हे शोध प्रकरण त्यांना अमली पदार्थ आणि लैंगिकता आणि खुनापर्यंत घेऊन जाते. आता हे प्रकरण नुसतेच रोमांचकारी, आव्हानात्मक नसते तर घाणेरडेदेखील होते. कारण पोलिसांपासून ते गुंडांपर्यंत सर्वांनीच एलन आणि एल्विस यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही एल्विस अखेरच्या दुव्यापर्यंत पोहचतोच, पण तो उत्कंठावर्धक प्रवास हे पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.
-
Auchwitz Cha Photowala (ऑशविट्झचा फोटोवाला)
"जर्मनीतील सामूहिक हत्याकांडाच्या केंद्रस्थानी घडणारी ही धाडसी आणि आशावादी कथा आहे. जर्मनीने १९३९ मध्ये पोलंड वर विजय मिळवला. तेव्हा विलहेम ब्रेस याला हिटलर गोटात सामील होण्याचा आदेश करण्यात आला. त्याने तो नाकारला. मग त्यानंतर राजकीय कैदी नंबर ३४४४ म्हणून त्याला अशविट्झच्या छळछावणीत पाठवण्यात आले. शुट्झशाफेलनी त्याला छावणीतील आतील कामाचा लेखाजोखा मांडण्याचे काम दिले. छावणीत येणाऱ्या कैद्यांचे फोटो घेण्यापासून त्याने कामाला सुरवात केली आणि कालांतराने जोसेफ मेंगल यांनी गुन्हेगारांवर केलेले वैद्यकीय प्रयोग आणि प्रत्यक्ष कैद्यांच्या कित्येक फाशी नोंदवण्यापर्यंत त्याने काम केले. १९४० ते १९४५ दरम्यान, ब्रेसने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक घटनांचे ५०,००० फोटो घेतले. तसे फोटो काढत बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. पुढे पुढे त्या कॅमेराच्या मागे लपून राहणे ब्रेसच्या विवेक बुद्धीला पटेना. सुरवातीला तो छावणीतील रहिवासी चळवळीत सहभागी झाला. कैद्यांची खोटी कागदपत्रे तयार करणे, या छावण्यांमध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या जगाला कळावे म्हणून आटले फोटो बाहेर पाठवणे अशा गोष्टी तो या चळवळीतून करू लागला. नंतर शेवटी सोव्हिएत सैनिक आले तेव्हा शुट्झशाफेलनी ब्रेसला ते फोटोग्राफ नष्ट करण्याचे आदेश दिले. ते आदेश नाकारत ब्रेस म्हणाला, `कारण ,जगाला हे कळलं पाहिजे`. "
-
Smruti ganga ( स्मृतिगंगा)
भा.द.खेरांना त्यांऱ्याजीवनात अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांपैकी काहींना लेखरूपात गुंफायचं काम त्यांनी केलं. सावरकरांऱ्याबचावासाठी उभे राहिलेले धर्मवीर भोपटकर...भा.द.खेरांना ‘केसरी’द्वारे प्रगतिपथावर नेणारे जयंतराव टिळक...‘हसरे दु:ख’ या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया पत्ररूपाने देणारे पु.ल.देशपांडे...न्याय क्षेत्रातील उच्च पदं भूषवणारे खेरांचे शाळासोबती दादा देशमुख... ‘शेवग्याऱ्याशेंगा’ लिहिणारे य.गो. जोशी...पावसचे स्वामी स्वरूपानंद...सुनील गावस्कर...लंडनमधील भवानी तलवार, कोहिनूर हिरा आणि नटराजाऱ्यामूर्तीसाठी लढणारे बॅरिस्टर भास्करराव घोरपडे...विनम्र कवी/गीतकार गंगाधर महांबरे...प्रतिकूल परिस्थितीतही ‘रोहिणी मासिक सुरू ठेवणारे वसंतराव काणे...खेरांवर मनापासून प्रेम करणारे त्यांचे चुलतबंधू नानासाहेब...या सगऱ्याव्यक्तिचित्रांसह भा. द. खेरांनी ‘केसरी’तील दिवसांऱ्याआठवणी जागवऱ्याआहेत. वाचकांना स्नेहधारांमध्ये न्हाऊ घालणारी ही ‘स्मृतिगंगा’ आहे.
-
Rumi Anandghan (रुमी आनंदघन)
प्रेमाच्या तत्त्वज्ञानाला हळव्या भावनिक नजाकतीचा साज चढवणारा कवी म्हणजे रुमी. या रुमीभोवतीच फिरणारं हे कथानक. नायक स्वप्नात येशूला भेटतो आणि त्याचं आयुष्य पालटून जातं. येशू त्याला आपण गेलेल्या अखेरच्या रस्त्यावरून जाण्यास सांगतो. या दृष्टांतानंतर नायक इटलीवरून थेट जेरुसलेमचा रस्ता पकडतो. तो ही पायी. पण त्याच्या या आध्यात्मिक प्रवासाची वळणवाट वेगळ्याच उत्कंठावर्धक घटनांनी व्यापलेली ठरते. या प्रवासात अचानकच नायकाला रुमीची ओढ लागते. रुमीच्या या शोधप्रवासात जीवनविषयक तत्त्वज्ञानाचं भांडार खुलं होत जातं. आणि हा प्रवास अलौकिकाच्या नव्या वळणावर पोहचते.
-
Sur Bharala Antari (सुर भरला अंतरी )
लेखक-पत्रकार भा.द.खेर यांनी बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, विनायकराव पटवर्धन, भीमसेन जोशी, सुधीर फडके, हिराबाई बडोदेकर, जे.एल.रानडे, शंकरराव बिनीवाले, गजाननराव वाटवे, इ.जुन्या-जाणऱ्याकलावंतांची नजाकतभरी वैÂफियत मांडून त्यांचे थोरपण सांगितलं आहे. तसेच हे श्रेष्ठ कलावंत कसे दिलदार होते याचे मार्मिक किस्सेही या पुस्तकातून वाचायला मिळतात. कलाकारांतही राग-लोभ,वाद-विवाद अबोला होतो.; पण तरीही कलेवर त्याचा परिणाम होऊ न देता कलाकार कलेविषयीचं आपलं योगदान रसिकांना भरभरून देतात. कलावंताचं मन कायम सरस्वतीच्या, उत्तुंग प्रतिभेने भारावलेले असतं; अनंत दु:ख-यातना सहन करून, आर्थिक झळ सोसूनही कुठलाही सच्चा कलावंत आपली कला मुक्तहस्ते उधळत असतो, हेही सूत्र या लेखांतून जाणवतं. सर्वच कलाकारांऱ्याकलेचं आणि या व्यक्ती आपऱ्याजीवनात माणूस म्हणून किती श्रेष्ठ होत्या, याचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
-
Amar Hruday (अमर हृदय)
‘अमर हृदय’ (इमॉर्टल हार्ट) या सरदार ओस्कान यांच्या पुस्तकातून अंतरंगातील प्रेमाची अमर शक्ती, प्रत्येकाच्या हृदयातून कसा प्रवास करते व आत्म्याचा अंतर्नाद कसा ऐकायचा, आनंदाच्या बेटावर कसे जायचे? याचं मार्गदर्शन करते. हृदयातील ‘मी-माझं-मला’ या स्वार्थी व संकुचित भावनांच्या राक्षसरूपी भिंती निखळ आयुष्य जगू देत नाहीत. म्हणूनच लेखकाने अंतरंगातील सकारात्मक पैलूंची ओळख मित्रत्वाच्या नात्यांतून डायनाच्या साहसी कथेतून करून दिलेली आहे. अमर हृदयातील निखळ प्रेमाच्या शक्तीचा आपण डोळसपणे, अष्टावधानी राहून शोध घेतला पाहिजे, आणि जीवनात आनंद महोत्सव साजरा केला पाहिजे.
-
Smrutiyatra (स्मृतियात्रा)
प्रथितयश साहित्यकार, राजकारणी, पत्रकार, इतिहासकार, कवी अशांऱ्यालेखकाबरोबरऱ्याव्यक्तिगत सहवासाऱ्याआठवणींचा ललितरम्य आलेख म्हणजे ‘स्मृतियात्रा हे भा. द. खेर यांचे पुस्तक. लेखक, कवी, राजकारणी अशी विविधांगी व्यक्तिमत्वं, सावरकर, तात्यासाहेब केळकर, श्री. म. माटे, द. वा. पोतदार, वि.स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. दि. मा. , आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, नरसिंह राव इ. विविध क्षेत्रांतील नामवंतांवर प्रसंगपरत्वे लिहिलेऱ्यालेखांचं हे संकलन आहे. सावरकरांची पराकोटीची सकारात्मकता...नरसिंह रावांची विद्वत्ता आणि त्यांच्यातील माणुसकी...यशवंतराव चव्हाणांची साहित्यिकांविषयीची आस्था...वृद्धावस्थेऱ्यालक्षणांचा उच्चारही न करणारे द. वा. पोतदार... आवेशपूर्ण, ओजस्वी असं वत्तृÂत्व असलेले पु. भा. भावे... अष्टपैलू काव्यप्रतिभा लाभलेले कवी मनमोहन...इ. नामवंतांऱ्यागुणांचं दर्शन घडविणारी ही स्मृतियात्रा वाचकांना ऱ्याऱ्याकाळात घेऊन जाते.
-
Ujale Jagnyacha Deep (उजळे जगण्याचा दीप)
ओमर लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू होतो आणि तो उद्ध्वस्त होतो. पुढे त्याचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करतात. जीवनातील निरर्थकता आणि अशाश्वतता त्याला अस्वस्थ करते. ओमर आपल्याला ‘बालक’ आणि ‘प्रौढ’ अशा दोन्ही अवस्थांत भेटत राहतो. एकीकडे ‘मोठा ओमर’ जीवनाला कंटाळून आत्महत्या करू पाहतो, तर त्याच वेळी त्याच्यातील ‘छोटा ओमर’ शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी ‘प्रकाशमय जगाकडे’ जाण्याचा मार्ग शोधतो. या प्रवासात ओमरला त्याचेच प्रतिबिंब असलेला ‘डॉल्फिन ओमर’ भेटतो, देवदूत भेटतो, स्वतः ‘प्रकाश’ झालेला हंस भेटतो आणि मृत्युदूतही. वास्तव आणि स्वप्न यांच्या धूसर सीमेवर घुटमळणारं त्याचं हे दुहेरी भावविश्व आपल्याला काहीसं अंतर्मुख व्हायला लावतं. निरागस स्वप्नरंजनापासून अगदी आध्यात्मिकतेपर्यंतच्या विविध छटा ओमरच्या या जीवन प्रवासात आपल्याला जाणवतात. "
-
Samarth (समर्थ)
समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माऱ्यारक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंतीसारऱ्याउत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवऱ्याभाषेत शब्दबद्ध केला आहे.
-
October Rains (आक्टोबर रेन्स )
प्रेमाचा रस्ता अहंभावाच्या विरक्तीतून जातो. असाच प्रवास डायना करते. एफेसस, आर्टेमिस आणि मदर मेरीची गोष्ट सांगत सांगत तिची गोष्ट बहरत जाते. तिचा हा प्रवास आहे गुलाबांच्या मातीत मिसळण्याच्या, शून्यत्वाच्या शोधाचा. या शोधातच तिला प्रेम गवसतं. सेरकानसोबतचा तिचा हा प्रवास आत्मानुभूतीच्या मार्गावर नेतो. आणि एकमेकांची भाषाही न जाणणारे हे दोघे जीवनाच्या एकाच सत्यापाशी पोचतात. ते म्हणजे दोघांना स्वतंत्रपणे आकळलेलं प्रेम. मथायसपासून विलग होताना ती ज्या डायना ज्या भावनिक टप्प्यावर असते, ते सारे टप्पे या प्रवासात विलीन होत जातात. आणि माणसातल्या अहंभावासारख्या नकारात्मकेकडे दुर्लक्ष करत डायना निव्वळ स्वीकारभावापर्यंत पोहचते. प्रेमातल्या स्वीकाराच्या सहजभावा मंत्र सांगणारी ही अफलातून कादंबरी.
-
Ka Karacha Shikun (का कराचं शिकून)
समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटऱ्यासमाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारऱ्याअभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाऱ्याशिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेऱ्याकल्याणाचा घोष, वरवरऱ्यासर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विमुक्तांऱ्यासर्व पिऱ्याशिक्षणाची हेळसांड करतच नरकात गेल्या; माध्यमिक शिक्षण मोफत झालं, तरी भटक्यांऱ्याशिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीणच होत गेला. गरिबातऱ्यागरिबालाही शिक्षणाचं महत्त्व कळलं; पण आजही या व्यवस्थेबद्दल लोक अत्यंत असमाधानी आहेत. कारण शिक्षणासारऱ्याप्रभावी साधनाचाही शोषणाचे हत्यार म्हणून राजकीय लोक उपयोग करतात. शिकून व न शिकूनही आमऱ्यापरिस्थितीत काहीच फरक पडत नाही...या निराशाजनक परिस्थितीत...सर्वसामान्यांना व भटक्या-विमुक्तांनाही रोज नऱ्याआव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे विमुक्त जातींनाच नाही, तर इतर सर्वांनाच ‘का कराचं शिकून’? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही, हेच खरं.
-
Auschwitchya Lahanagya Pori (ऑशविट्सच्या लहानग्या
आंद्रा आणि तातियाना या अनुक्रमे ४ आणि ६ वर्षांच्या इटालियन बहिणी त्यांच्या रिजेका येथील राहत्या घरातून ऑस्टवीच येथील नाझिंच्या बर्कानौ छळछावणीत नेल्या जातात. सुमारे दोन लाख तीस हजार मुलांतून अवघी काही डझन मुलं तिथून जीवंत परत येतात. या बहिणी त्या भाग्यवान मुलांपैकी एक ठरतात आणि वयाची सत्तरी उलटल्यानंतर त्या सगळ्या अमानुष आठवणी आत्ताच्या जगासोबत वाटून घ्यायला लागतात. `वी लिटल गर्ल्स इन ऑस्टवीच` हे पुस्तक लिहितात. नाझिंच्या विरोधात धाडसाने साक्षी देतात. २०१९ मध्ये हे पुस्तक इटली भाषेत प्रसिद्ध झालं. जर्मनी, इंग्रजी बरोबरीने आता हे पुस्तक मराठीत येत आहे. हे पुस्तक म्हणजे दोन लहानग्या बहिणींच्या छळछावणीतील आठवणी आहेत. डोळ्यासमोर पाहिलेले अनंत मृत्यू आहेत, बचावून परत आल्याचा प्रसंग आहे, छळछावणीच्या अनुभवाचे व्रण घेऊन पुढे जगत राहणं आहे. टोकाच्या वंशद्वेषातून जन्माला आलेल्या अमानुषतेचे निरागस बहिणींच्या दृष्टिकोनातून केले गेलेले हे वर्णन आहे.
-
Zangat (झंगाट)
गजबरवाडी या छोट्याशा गावातील बाळूमास्तर आणि भरमूअण्णा या धनदांडग्याच्या वैराची ही कहाणी. मास्तरचा मुलगा श्रीपतीचे रुक्की नावाच्या विवाहित मुलीशी संबंध असतात. रुक्कीच्या लग्नाच्या आधीपासूनच हे संबंध असतात आणि रुक्कीच्या पहिल्या लग्नानंतरही ते चालू राहतात. रुक्कीचा पहिला नवरा त्यामुळे तिला सोडून देतो. तिचं दुसरं लग्न होतं, तरी श्रीपतीचे आणि तिचे संबंध सुरू राहतातच. याचा फायदा घेऊन भरमूअण्णा रुक्कीला मास्तरच्या घरात घुसवण्यासाठी अनेक उपाय योजतो; पण मास्तर श्रीपतीला लपवून ठेवतो आणि भरमूअण्णाला पुरून उरतो; मात्र रुक्कीला माहेरीच राहणं भरमूअण्णाने भाग पाडलेलं असतं. शेवटी भरमूअण्णा एके दिवशी गुंडांकरवी मास्तरला बेशुद्ध होईस्तोवर मारहाण करवतो आणि ते प्रकरण पद्धशीरपणे दाबतो. मास्तरला गाव सोडणं भाग पडतं. या सगळ्या प्रकरणात रुक्कीची मन:स्थिती काय असते? ती सासरी जाते का? श्रीपती समोर येतो का? काय होतं शेवटी या ‘झंगाटा’चं?
-
Vijay (विजय)
विजय हा कादंबरीचा नायक... वैमानिक... परंतु एका विमान अपघातात त्याचं कमरेपासून खालचं शरीर निकामी होणं... या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच नीलाशी त्याचा झालेला विवाह... नीलाचं आता काय होणार, या विचाराने त्याने आत्महत्येचा विचार करणं... परंतु त्याच्या आईने त्याला परावृत्त करणं...त्याने आईकडून एक वचन घेणं... अप्पासाहेब हे गिरणीमालक, त्यांची मुलगी निर्मला, विजयचा मावसभाऊ अरविंद, या कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखा...अरविंदचं अप्पासाहेबांच्या गिरणीत काम करणं...निर्मलेचं मन अरविंदकडे आकृष्ट होणं...अप्पासाहेब अरविंदला मॅनेजर करू पाहत असतानाच त्याने कामगारांचा पक्ष घेऊन, राजीनामा देऊन संपात उतरणं...तुरुंगात जाणं...नंतर त्याचं विजयच्या घरी येणं...त्यावेळी नीलाने आपल्या मनातील गुपित त्याला सांगणं...विजयने त्याच्या आईकडून कोणतं वचन घेतलं होतं? अरविंदने कोणाच्या प्रीतीचा स्वीकार केला? नीलाच्या की निर्मलाच्या? कौटुंबिक, औद्योगिक पार्श्वभूमीवर रंगलेलं भावनाट्य.
-
Dnyanai Savitribai Phule (ज्ञानाई सावित्रीबाई फुले
सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्यावर डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. नाईक यांच्या शैक्षणिक प्रवासात सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान होते, असे त्या मानतात. सावित्रीबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शुद्र, बहुजन स्त्रियांना गुलामगिरीतून व दास्यातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाचीच गरज आहे, हे ओळखून त्यांनी स्त्री-शिक्षणाचा भक्कम पाया घातला. सावित्रीबाई ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली १९ व्या शतकातील क्रांतिकारी स्त्री होती. पुण्यासारख्या कर्मठ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात प्रखर विरोधावर मात करत कठीण रूढी, परंपरा, अज्ञान तसेच त्या काळातील धन-दांडग्यांचे समाजावरील वर्चस्व अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाईंची आठवण होईल असाच लढा सावित्रीबाईंनी दिला. एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने निश्चेष्ट पडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणार्या सावित्रीबाई समाजाच्या वाटेवरील अपमानाचे काटे दूर करत न डगमगता, न थकता अखेरपर्यंत लढत राहिल्या.
-
Smrutisugandh (स्मृतिसुगंध)
लेखक म्हणून, पत्रकार म्हणून, मित्र म्हणून, शिष्य म्हणून अनेक नामवंतांचा सहवास भा. द. खेर यांना लाभला. या सर्व थोर व्यक्तित्वांच्या सहवासातील आठवणींना त्यांनी या व्यक्तिचित्रसंग्रहातून उजाळा दिला आहे. इंदिरा गांधींच्या पहिल्या भेटीतच नेहरू घराण्यावर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांच्या सहवासात त्यांना मंत्र-तंत्र शक्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. मनोहर माळगावकरांचा मोठेपणा सांगताना ‘दि प्रिन्सेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद करण्याची संधी त्यांनी नाममात्र एक रुपया रॉयल्टी घेऊन दिल्याचं ते नमूद करतात. ना. सी. फडके यांच्या मखमली भाषेच्या पाऊलवाटांचा माग घेत गेल्याचं ते सांगतात. श्री. पु. गोखले, शिवाजीराव भोसले, वि. स. वाळिंबे इत्यादींच्या आठवणीही त्यांनी जागविल्या आहेत. या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचंही दर्शन घडतं. हा व्यक्तिचित्रणात्मक स्मृतिसुगंध नक्कीच दरवळणार.
-
Aata Mavha Kay! (आता मव्हं काय!)
डॉ देविदास तारू यांचं हे स्वकथन म्हणजे स्वत:ला घडवत घडवत व्यवस्थेच्या विषमतेतून बाहेर पडण्यासाठी केलेली एक गंभीर लढाईच आहे. श्वास कोंडून ठेवणार्या आणि अपंग करणार्या व्यवस्थेतून बाहेर पडून देविदासनं एका मोठ्या हिमतीनं केलेला संघर्ष केवळ अचंबित करणारा आहे. घरची गरिबी, त्यातून लहानपणीच बळावलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, अशा वातावरणात एक दिवस साक्षात्कार झाल्याप्रमाणे एका मुलाला शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि नंतर तो मागे वळून पाहत नाही. तारू यांचा हा प्रवास प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत स्वतःला घडवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी आहे.
-
Tingad (तिंगाड)
‘तिंगाड’ कथेत गावातली पूरस्थिती बघायला येतात पालकमंत्री...अन् तेच पडतात पाण्यात...तर ‘वैकुंठ’ कथेतील निगवणी गावात होते नवीन स्मशानभूमी आणि वाहून जाते पाण्यात...नगरपालिकेत तेव्हा रंगलेली असते हाणामारी... ‘जाळं’ या कथेत ब्ल्यू फिल्म चाललेली असताना पोलीस छापा टाकतात आणि स्वत:च ब्ल्यू फिल्म बघत बसतात...‘हुमान’ कथेत आहे काळ्या बाप्या आणि लंबू तुक्या या इरसाल जोडीचा ‘खास’ भाषेतील हंगामा... ‘गस्त’मध्ये गावात सुरू होतं चोर्यांचं सत्र, रामा थोरवतसह गावकरी घालायला लागतात गस्त...गस्तीदरम्यान दारू पितात...चोरांना मिळतं मोकळं रान...‘इलेक्शन’मधील तथाकथित वार्ताहर हणमंत देशमुख आणि गुंडू न्हाव्याची निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची ‘मज्जा’ आणि त्यांच्या पारवाळांची झालेली चांदी...‘शिकार’मधील धोंडबा ड्रायव्हरचा मालक जातो शिकारीला अन् घाबरतो वाघाला, धोंडबाच मग वाघाला अर्धमेला करतो, मग मालक वाघावर गोळी चालवतो...अन् नंतर कळतं की तो वाघ सर्कशीतला असतो... अस्सल गावरान पार्श्वभूमी आणि इरसाल बेनी...विनोदाची अनोखी मेजवानी
-
Blotting Paper (ब्लॉटिंग पेपर)
जेव्हा मनरूपी शेतात रुजतं तेव्हा मग उगवतात अंकुर...त्या अंकुरांना मग कुठलाही आकृतिबंध चालतो...लेख, कविता, पत्र, व्यक्तिचित्र...याच आकृतिबंधांतून स्वाती चांदोरकर व्यक्त झाल्यात मुक्तपणे...नातीला बडबडगीतं ऐकवताना त्यांना बडबडगीतांबाबत सुचतो एक वेगळाच विचार...मृत्यूबाबतही त्या करतात चिंतन... माणसाचं जीवन आणि मन...भावनांनी-विचारांनी व्यापलेलं...व्यक्तींनी गजबजलेलं...नात्यांनी बांधलेलं...साहित्यादी कलांनी रसरसलेलं...हे व्यापणं, गजबजणं, बांधणं, रसरसणं कधी रमतात शान्ताबाईंच्या कवितांमध्ये...तर कधी रमतात अरुण दातेंच्या आठवणींमध्ये...पतीबरोबरच्या आत्मीयतेने पत्र लिहितात त्या... स्वातीताईंच्या या सगळ्याच लेखनाला चिंतनाची डूब आहे आणि भावनेचा ओलावाही सहजीवनात काय कमावलं-गमावलं हे सांगताना पतीच्या आणि स्वत:च्याही व्यक्तिमत्त्वाबाबत बोलून जातात सहजपणे...कृष्णाच्याही अंतरंगात डोकवावंसं वाटतं त्यांना...चंद्रमोहन यांच्या पुस्तकाबद्दलही भरभरून बोलावंसं वाटतं...सुनील मेहतांना...एक लय साधली आहे त्यांनी या लेखनातून...ती लय वाचकांना गुंतवून ठेवेल, अंतर्मुख करेल आणि परमानंद देईल हे नक्की
-
Pravah (प्रवाह)
मधुकर कदम हा नवलेखक तरुण कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडतो आणि त्याचं गाव सोडून मोठ्या भावाकडे राहायला जातो. तिथे एका पेढीवर नोकरी करत असताना त्या पेढीच्या शेटजीच्या मुलीच्या, सविताच्या वासनेच्या जाळ्यात मधुकर सापडतो आणि त्याला स्त्री-देहाची चटक लागते. नंतर सविता आत्महत्या करते आणि मधुकर गावी परततो. काही दिवसांनी मेहता नावाचा माणूस त्याला शब्दकोडे स्पर्धेसंबंधित नोकरी देतो. मेहतांच्या ऑफिसमधील जोशी, मधुकरला वेश्यागमनाची दीक्षा देतो. त्याच ऑफिसमधील सुलोचनाशी मधुकरचा शरीरसंबंध येतो. मेहतांची नोकरी सोडून मधुकर, अक्कोळकरांच्या ‘जनता’ नावाच्या साप्ताहिकात नोकरीला लागतो. तिथे अक्कोळकरांची बायको मधुकरशी लगट करायचा प्रयत्न करते; पण गुप्तरोग झाल्याचं सांगून तो तिला टाळतो. त्यानंतर एका दुर्गम गावात त्याला मास्तरची नोकरी मिळते. तिथे शिरमव्वा नावाची एक बेरड मुलगी मधुकरमध्ये मनाने गुंतते; पण तिच्या पवित्रतेमुळे मधुकर तिच्यापासून दूर राहतो. तो गाव सोडायचं ठरवतो आणि शिरमव्वा त्याला भरल्या डोळ्यांनी-मनानी निरोप देते.
-
Radhikasantwanam (राधिकासांत्वनम)
मुद्दुपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. ती देवदासी होती. तिने ‘राधिका सांत्वनमु’ हे तेलुगू भाषेतील काव्य रचलं. त्या काव्याचा मराठी भावानुवाद डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केला आहे, ‘राधिकासांत्वनम्.’ राधा-कृष्ण आणि राधा-इला यांचा शृंगार, श्रीकृष्ण इलेमध्ये रममाण झाल्यामुळे रुसलेली राधा आणि तिचा रुसवा काढण्यासाठी कृष्णाने केलेली मनधरणी, असं या काव्याचं ढोबळ स्वरूप आहे. राधा-कृष्ण आणि कृष्ण-इला यांच्या शृंगाराचं मुक्तपणे केलेलं वर्णन हे या काव्याचं प्रमुख वैशिष्ट्य आणि अठराव्या शतकात एखाद्या स्त्रीने असं वर्णन करावं, ही विशेष बाब, या काव्यातून जाणवते. इला आणि कृष्णाचा विवाह होतो, त्यांच्या पहिल्या रात्रीचंही वर्णन यात येतं. त्यानंतरही कृष्ण आणि इलेच्या रंगलेल्या शृंगाराची वर्णनं येतात. इकडे राधा मात्र झुरत असते. तिच्याही शरीरात कामाग्नी भडकलेला असतो; पण नंतर कृष्ण तिच्याकडे आल्यावर राधा-कृष्णाची कामक्रीडाही रंगते. इला ही नवयौवना आणि राधा ही कामानुभवी स्त्री. श्रीकृष्णाच्या त्या दोघींबरोबरीच्या कामक्रीडेतून नवोढेच्या आणि अनुभवी स्त्रीच्या कामक्रीडेतील फरक मुद्दुपलनी दर्शवते. राधा-कृष्ण आणि राधा-इला यांच्या कामक्रीडेचं रसाळ वर्णन असलेलं काव्य.
-
Yashvantrao Chavan: Aathavani-Akhyayika (यशवंतराव
यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन. लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून-पत्ररूपात सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आहे. लोकनेते यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. यात लक्ष्मण मानेंना बालपणापासूनच यशवंतरावांबद्दल कसे कुतूहल होते, इथपासून ते यशवंतरावांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास या कालखंडाचा सजगतेने, संवेदनशीलपणे केलेला अभ्यास व मोठा कालपट माने वाचकांसमोर मांडतात. यशवंतरावांचा जनसंपर्क, लोकांबद्दलचे प्रेम, पक्षनिष्ठा नवनवीन योजना राबवण्याची त्यांच्या मनात असलेली उर्मी, साहित्य,कला, संगीतप्रेम या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकात माने यांनी घेतला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास. हे सर्व असूनही खऱ्या अर्थाने लोकांशी असलेली आपुलकीची नाळ व कवीमन अखेरपर्यंत ठेवून सतत जमिनीवर पाय असलेला हा अवलिया. रूढार्थाने यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या हयातीतच आख्यायिका बनून राहिले होते, यात तीळमात्रही शंका नाही. त्या सगळ्या गोष्टीचा घेतलेला सामाजिक, राजकीय व मानवतेच्या दृष्टीने घेतला वेध म्हणजेच हे पुस्तक होय !
-
The Racketeer (द रॅकेटीअर)
माल्कम हा कादंबरीचा ४३वर्षीय, कृष्णवर्णीय वकील असलेला नायक. ‘माजी मरीन्स’अशीही त्याची ओळख असते. या सरळमार्गी व हुशार वकिलावर तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्याचं कौटुंबिक, व्यावसायिक जीवन धोक्यात येतं. पाच वर्षांनंतर माल्कमला सुटकेचा मार्ग दिसतो. ‘जज फॉसेट’ व त्याची सेक्रेटरी ‘मिस क्लेअर्स’ यांचा खून होतो. याचा फायदा माल्कमला तुरुंगातून सुटण्यासाठी होतो. तो खुन्याचं नाव सांगतो आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्याची तुरुंगातून सुटका होते. प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा बदललेल्या आणि नावही बदललेल्या माल्कमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतो. चित्रपट निर्माता म्हणून वावरत असताना तो नाथन कूले या व्यक्तीवर माहितीपट बनवतोय, हे दाखवून नाथनकडून लपवलेलं सोनं कुठं आहे, हे जाणून घेऊन ते मिळवतो. ते सुरक्षित बँकेत ठेवतो. एकूण कसा रंगतो माल्कमच्या जीवनाचा हा नवीन अध्याय? थरारक वळणांनी पुढे सरकत राहणारी एका वकिलाच्या बुद्धिचातुर्याची उत्कंठावर्धक कथा.