-
Udyog Yashogatha (उद्योग यशोगाथा)
एखादी कल्पना उद्योगात रूपांतरित करायला एक वेगळी जिद्द, अर्थशास्त्राची थोडी जाणीव वगैरे अनेक गोष्टी लागतात. त्या अनुभवाने शिकता येतात, पण त्याला अनेक वेळा कालमर्यादा मोठी लागते. यातून या नव्या उद्योजकाची दमछाक होते. अनेकदा कल्पना चांगली असूनही तो अयशस्वी ठरतो. यामुळे सरदेशमुखांनी अगदी लहानांपासून मध्यमवर्गीयांमधील काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय दर्जावर कशा पोहोचू शकल्या, अशी अनेक वेगवेगळी उदाहरणे संवादात्मक शैलीत समजावून सांगितलेली आहेत. यामुळे नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळायला निश्चित मदत होईल. आपण आपापल्या परीने जमेल तशी हळूहळू व्यवसायवृद्धी करत राहावी, असाही संदेश या पुस्तकातून मिळतो. भविष्यकाळामध्ये हे आवश्यक आहे, असाही संदेश यातून मिळतो
-
Ghumakkadi (घुमक्कडी)
सरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर्यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार्या ‘घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार्या.
-
Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar (सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर)
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने..
-
Navrasancha Jadugar Mohammad Rafi (नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी)
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
-
Gosht Reserve Bankechi (गोष्ट रिझर्व्ह बँकेची)
विद्याधर अनास्कर यांच्या 'गोष्ट रिझर्व्ह बँकेची' या पुस्तकातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील आकर्षक जगाचा शोध घ्या. हे सर्वसमावेशक मराठी पुस्तक आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकिंग संस्थेच्या रिझर्व्ह बँकेच्या रंजक कथेचा उलगडा करते. आकर्षक कथा आणि तपशीलवार अंतर्दृष्टीद्वारे, लेखक भारताच्या आर्थिक परिदृश्यात आरबीआयची उत्क्रांती, कार्ये आणि महत्त्व यांचा शोध घेतात. हे पुस्तक वाचकांना चलनविषयक धोरणे, बँकिंग नियम आणि आर्थिक स्थिरता राखण्यात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका याबद्दल सखोल समज देते. तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल, बँकिंग व्यावसायिक असाल किंवा भारताच्या वित्तीय व्यवस्थेबद्दल उत्सुक असाल, हे पुस्तक सुलभ मराठी भाषेच्या स्वरूपात मौल्यवान ज्ञान प्रदान करते.
-
Patra Ani Maitra (पत्र आणि मैत्र)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार’. ‘राजहंस’च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे’. ‘दिगमा’ या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा’. या सा-याचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र
-
Skalpel Te Skopee Te Robo (स्काल्पेल ते स्कोपी ते रोबो)
ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्त्र कार्याची . असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, ‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
-
Ek Ulat Ek Sulat Bhag 2 (एक उलट एक सुलट भाग २)
हे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, ‘हे सगळं मला हवंय!’ असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार्या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे
-
Manik Moti Manik Varma Ani Parivar (माणिक मोती माणिक वर्मा आणि परिवार)
माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
-
Lokshahi Aani Hukumshahi (लोकशाही आणि हुकूमशाही)
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्यााच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्यास विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्यांेना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सशक्त लोकशाहीसाठी अत्यावश्यक असलेले विचारमंथन लोकशाही आणि हुकुमशाही
-
Shah Ani Katshah (शह आणि काटशह)
रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्याा गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्या् लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
-
Vastragatha (वस्त्रगाथा)
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.
-
Sfoortivadi Neetishashtra (स्फूर्तिवादी नीतिशास्त्
आज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते. हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे. अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे. केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल. भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.
-
Ajaan Ani Chalisa (अजान आणि चालिसा)
करुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना ‘व्होटबँक' बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ‘ते आणि आपण' अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर