-
Mahabharat Te Bharat @ 2025 (महाभारत ते भारत @ २०२
'महाभारत ते भारत@ २०२५' या उल्लेखनीय पुस्तकाचा प्रवास 'इंडिया' या नावाने जगाला ओळख असलेल्या या प्राचीन, चिरंतर आणि विकसनशील राष्ट्राप्रती असलेल्या श्रद्धेने उलगडतो. लेखकाने पानोपानी असा सुंदर गोफ विणला आहे की या भूमीचा अलौकिक इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जिवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहते. हे पुस्तक वाचताना तुम्हाला एका सशक्त राष्ट्राची स्पंदनेच नव्हे, तर पिढ्यानपिढ्यांचे शहाणपणही जाणवेल. लेखक माधव जोशी आमचे आभार आणि कृतज्ञतेला पात्र आहेत. महाभारत ते भारत @ २०२५ या गौरवशाली प्रवासात आपल्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण भारतीय काय होतो आणि काय आहोत याबद्दल अभिमानाची भावना निर्माण केल्याबद्दल कृतज्ञता. - पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
-
Bhintiaadacha Cheen (भिंतीआडचा चीन)
भारताशी चीन शत्रुत्वाने का वागतो? चीनकेंद्रित जगाचे धोके काय असतील? चीनच्या नाकावर टिच्चून भारत महासत्ता होईल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चीनचा इतिहास, कम्युनिस्ट पक्षाची अमानवी धोरणं, त्यातून चीनने घेतलेली झेप, इतिहास आणि वर्तमानाबद्दलच्या भानातून तयार झालेलं चीनचं परराष्ट्र धोरण, चीनचा भारताला असणारा धोका या सर्व अंगांनी श्रीराम कुंटे यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून ‘भिंतींआडचा चीन` जन्माला आलं आहे. महासत्ता होऊ घातलेल्या चीनमधल्या साम्राज्यशाहीच्या इतिहासापासून ते आजच्या उत्तुंग प्रगतीपर्यंतचा आढावा घेत लेखकाने या पुस्तकातून चीनची कुंडली मांडली आहे. भारताच्या संदर्भात चीन समजून घ्यायचा असेल, तर चिनी राजघराण्यांचा इतिहास, स्थित्यंतराची चाळीस वर्षं, जगाला चकित करणारा काळ आणि भारतासमोरील चिनी आव्हानं या चार भागांत विभागलेलं हे पुस्तक आपल्या जवळ असायलाच हवं. चीनची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाची मराठीत कमी होती. श्रीराम कुंटे यांच्या ‘भिंतींआडचा चीन`मुळे ही उणीव भरून काढण्यास मदत होईल. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय विषयांवर प्रबंधी-प्राध्यापकीपणा टाळून जनसामान्यांसाठी लिहिणारा एक नवा लेखक कुंटे यांच्या रूपाने मराठीत समोर येताना दिसतोय. गिरीश कुबेर (संपादक, दै. लोकसत्ता व लेखक) एका संतुलित राष्ट्रवादी दृष्टिकोनातून, तसेच बहुविद्याशाखीय जाणकारीतून लिहिलेले हे पुस्तक आपल्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या प्रवासातील अत्यावश्यक वाचन ठरणार आहे. रवि आमले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक) महत्त्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यास आसुसलेल्या भारतीयांना स्वतःच्या व चीनच्या मर्मस्थळांची जाणीव हे पुस्तक कळात-नकळत करवून देते. प्रा. परिमल माया सुधाकर (चीनचे अभ्यासक व लेखक)
-
Sansar (संसार)
जर तुमच्यासमोर देव प्रगट झाले, तर तुम्ही काय कराल? एक असे ठिकाण आहे, जिथे मोबाईल फोन बंद पडतो, स्मार्टवॉच चालत नाही, आणि हातावर निळ्या रंगाचे निशाण उत्पन्न होते. आधुनिक युगातील भारतात राहणाऱ्या अमन चंद्र आणि संसारातील इतर दहा जीवांचे अपहरण करून जेव्हा त्यांना हिमालयातील गुप्त खोऱ्यात नेले जाते, तेव्हा त्यांच्या बाबतीत असेच घडते. हिंदू देवता, योगी आणि पौराणिक पशू यांचा निवास असलेल्या या दिव्य क्षेत्रामध्ये जाऊन संसारातील या जीवांनी काय करायचे, हे स्पष्टपणे ठरलेले असते. त्यांना योगाच्या साहाय्याने काही प्राचीन विद्या शिकाव्या लागतात. त्यानंतर एका जीवावरच्या यात्रेत सहभागी होऊन नेमून दिलेले काम पूर्ण करावे लागते. या भयंकर प्रवासातून म्हणे थोडीच माणसे वाचून परत येतात. पण मग त्यांनी असल्या प्रवासाला जायचेच का? आणि या सगळ्याशी देवांचा काय संबंध? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात, तोच संसारातील जीवांना कळू लागते की तिथे प्रत्यक्षात कोणतीतरी मोठी योजना आकार घेत आहे. देवांच्या राजाने एक विचित्र आज्ञा दिली आहे. आता अमनला निर्णय घेणे अधिकच कठीण जाणार आहे. त्याच्या निर्णयामुळे केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भवितव्य पालटणार आहे... “शेवटी हे भारताने हॅरी पॉटरला दिलेले उत्तर आहे.”— कृष्ण उदयशंकर, लेखक “संसाराचे कथानक आ वासायला लावणारे उत्तम मिश्रण आहे, एक अद्भुत प्रतिभा उदयाला आली आहे!” —अनुजा चंद्रमौली
-
Suswarlakshmi Subbulakshmi (सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक
ती म्हणजे साक्षात 'तुळशी वृंदावन' • जगद्गुरू चंद्रशेखरेन्द्र सरस्वती कांची मठाचे शंकराचार्य सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम आली खाँसाहेब, पतियाळा घराण्याचे श्रेष्ठ गायक एम. एस. ने चित्रपटात काम केलं नाही. ती साक्षात मीरा झाली. एलीस डंगन, प्रख्यात अमेरिकन दिग्दर्शक त्यांचं गाणं ऐकल्यावर माझा हरवलेला आत्मा मला नव्याने सापडला थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंद वल्लभ पंत. भारताचे गृहमंत्री (१९५५ ते १९६१) त्यांचं गाणं दैवी आहे, जे त्यांनी देशसेवेसाठी उपयोगात आणल - डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् भारताचे माजी राष्ट्रपती I am always inspired by two women. One is my Mother and the other is 'Mother of Music'-the Great M. S. Subbulakshmi. - Dr. A. P. J. Abdul Kalam Former President Of India
-
Ram Tretayugacha Mahasangram Part 2 (राम त्रेताय
अखेर त्या महायुद्धाला प्रारंभ झाला. दुंदुभी, नगारे, झांजा, शंख आदी रणवाद्यांच्या प्रचंड घोषानं सारी लंका हादरून गेली. त्यातच उभय पक्षातून जबघोष आणि आरोळ्या उठू लागल्या. एकच कल्लोळ माजून राहिला. राम हनुमानाच्या खांद्यावर वसला; आणि त्यानं धनुष्याचा टणत्कार केला. उभय पक्षाची सेना भेदरून त्याच्याकडे पाहू लागली. रामानं भराभर वेगवान तीक्ष्ण बाण सोडायला प्रारंभ केला... केवळ चार घटकात रामानं राक्षससैन्याचा पुरता विध्वंस केला. गज, पदाती आणि अश्व यांच्या मृतदेहांचा ढीग रणभूमीवर पडला. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या रुद्राची ती जणु क्रीडाभूमीच असल्यासारखं वाटू लागलं. रामाच्या संहाराखातून उरलेले राक्षससेनानीही अवयव तुटल्यामुळे युद्धाला निरुपयोगी झाले होते. वानरसेनेत मात्र आनंदी आनंद पसरला होता. सगळे वानर रामाची प्रशंसा करत होते. कडवं राखीव सैन्यदलही परास्त झाल्यानंतर युद्धात स्वतः उतरण्याखेरीज रावणाला आता गत्यंतर उरलं नव्हतं. ** वाल्मीकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून, तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षांपूर्वी घडून गेलेला देदीप्यमान इतिहास आहे. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, आदी गोष्टी - घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.
-
Baaizzat Bari ?
एखाद्या देशातील काही लोकांना केवळ त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जातं आणि त्यांच्याबाबतीत सरकार आणि जनता पूर्वग्रहाने वागते, असे असेल तर त्या देशाची लोकशाही अपूर्ण आहे. अशाने लोकशाही मॉडेलमध्ये मोठी त्रुटी असल्याची जाणीव मला होते. अशा स्थितीत देशातील सजग प्रसार माध्यमांनीआपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सदर मुद्दे हाती घ्यायला हवेत. मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रसार माध्यमेच स्वतः समस्या होऊन बसली आहेत.तुम्ही आणि मी घरात बसून कल्पनाही करू शकणार नाही आणि नखशिखान्त हादरुन जाऊ असे काही प्रसंग या पुस्तकात वाचायला मिळतात. - अभिसार शर्मा, ज्येष्ठ टीव्ही पत्रकार राजकीय पक्षांना आरसा दाखवणारा एक भक्कम दस्तावेज म्हणून मीया पुस्तकाकडे बघतो आहे. जागरुक समाजाची भूमिका कशी असावी याबद्दल हे पुस्तक भाष्यकरतं. - अबू बकर सब्बाक, वकील, सर्वोच्चन्यायालय या पुस्तकातील प्रत्येक दस्तावेज ही कहाणी सांगतो :वर्षानुवर्षे तुरुंगवास, दहशतवादाचा कलंक, प्रत्येककेसमध्ये एक नव्हे तर अनेक आयुष्यं उद्ध्वस्त होणं. देशाची सद्यस्थिती या पुस्तकात दिसून येतेच शिवाय या सगळ्याची जबाबदारी कोणत्या एका राजकीय पक्षाची नसून, सगळ्यांचीच आहे हे सांगते. निरपराध माणसांना दहशतवादाच्या नावावर भोगावीलागणरी शिक्षा अल्पसंख्याक माणसांना गुन्हेगार ठरवणाऱ्या एका विचारसरणीकडे निर्देशकरते. हे पुस्तक आणि त्यामागचे कष्ट आजच्या काळासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्याविचारसरणीशी आपल्याला लढावं लागणार असल्याची ही हाक आहे, आणिती काही केवळ एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी नव्हे, तरआपल्या सगळ्यांसाठीच आहे. - हरतोश सिंह बाल, राजकीय संपादक, कारवाँमॅगझीन
-
Hamid
सीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता. हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी अगदी आतल्या गोटातून आणि अधिकारवाणीने असं हे लेखन केलं आहे. वाणी प्रथेखाली जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाणार होतं म्हणून एका मुलीला सोडवण्यासाठी जाणाऱ्या हमीदला दोन देशांतल्या सीमारेषा लक्षातही घ्याव्याशा वाटल्या नाहीत. त्याला कशाचीही भीती वाटली नाही, कसलीही आडकाठी त्याला झाली नाही परंतु पाकिस्तानातील त्याच्या मित्रांनीच त्याला दगाफटका केला. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा निर्धार मोडून काढून त्याच्यावर गुप्तहेर असा शिक्का मारण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर पुढे काय झालं तर या उलट तपासणीच्या काळात सोसावा लागलेला छळ, एकांतवासात कोठडीत जखडून राहण्याची सजा आणि त्यातूनही तग धरून राहण्यासाठी केलेला संघर्ष. भारतात त्याची आई फौजिया अन्सारी यांनीही अथक लढा दिला. अगणित दारं त्यांनी मदतीसाठी ठोठावली आणि हमीदला परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांना गदगदा हलवून सोडलं. १८ डिसेंबर २०१८ रोजी सरतेशेवटी हमीदनं भारताच्या भूमीला स्पर्श केला. अत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.
-
Alguj(अलगूज)
हा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला मनापासून आनंद होत आहे. माणूस आयुष्यात भावनांवर जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा आकृतिबंध त्याला येणारे अनुभव आणि मनात उमटणाऱ्या, त्यात गुंतलेल्या भावना यांवर अवलंबून असतो. आयुष्याच्या पटलावर ह्याच भावभावनांच्या रंगाने माणूस चित्र रेखाटत राहतो. प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना. उदात्त भावना. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना ही मला नेहमीच एखाद्या काव्यासारखी वाटली आहे. ती उदात्त असते. सुंदर असते आणि त्याहीपेक्षा हळवी अलवार असते. प्रेमाने जग जिंकता येते, हे खरं असलं तरी प्रत्येकाला जग नाही जिंकता येत. अव्यक्त राहिलेले प्रेम, अपूर्ण राहिलेली स्वप्ने हा मग जीवनाचा एक हळवा भाग होऊन जातो. अतृप्तीचा आणि आठवणींचा एक झरा काळजात आयुष्यभर पाझरत राहतो. साफल्यात जगण्याचा आनंद असतो, तर अशा अपूर्णतेतही जगण्याची कविता सापडते. अशा काही कविता म्हणजेच या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात काही नाती निसटतात आणि काही परत भेटतातही. निसटलेल्या नात्यांमुळे दोन जिवांच्या आयुष्यात पडणारे अंतर एका जन्माचे असते. ते 'जन्मांतर' असते, तर कधी भेटलेल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या नात्यातून 'स्वप्नांचा गाव' उभा राहतो. कधी जोडीदाराची 'प्रतीक्षा' हेच फक्त आयुष्य उरतं, तर कधी पुन्हा गवसलेल्या नात्यांची 'गिफ्ट' ही मिळते. कधीकधी नाते पुन्हा नव्याने उमलायला 'उत्तररात्र' लागते. मनात वर्षानुवर्षे रंगवलेला 'संसार' कधी दोन दिवसांसाठी का होईना जगता येतो.
-
Pravas bakiya (प्रवास बाकीय )
'प्रवास बाकीय...' ही प्रियांका डहाळे या अष्टपैलू तरुणीची कादंबरी. प्रियांका डहाळे ही पेशाने पत्रकार होती. 'अनावृत्त रेषा' हा तिचा पहिला कवितासंग्रह आणि पहिलेच पुस्तक. त्यानंतर आलेले तिचे हे दुसरे आणि शेवटचे पुस्तक. कारण तिचे अपघाती निधन झाले आणि तिचा लेखनप्रवास मात्र अधुराच राहिला. अतिशय हरहुन्नरी असलेली प्रियांका डहाळे हिची शोधक-चिकित्सक-निरीक्षक वृत्ती आणि दृष्टी तिच्या या कादंबरीतूनही प्रत्ययास येते. या कादंबरीतील मुख्य नायिकाही पेशाने पत्रकारच आहे. आत्मिक आणि देहिक पातळीवरील मानवाचे स्थलांतर... नातेसंबंधातील स्थलांतर... भावभावनांच्या पातळीवरील स्थलांतर कसे घडते? त्याचे काय परिणाम घडतात? परिणामांचे भोग कसे भोगावे लागतात? याचा तिच्या पत्रकार मनाने घेतलेला शोध आपल्यालाही अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.
-
Yamunatiri anande (यमुनातीरी आनंदे)
सामाजिक विषयांबरोबरच या कथासंग्रहात गूढकथा आणि विनोदी कथा हे दोन प्रकारही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवासाठी फुलं वेचत असताना आपण तबकात बकुळीची सुगंधित फुलं, फारसा वास नसलेली पण नियमित फुलणारी तगर, अजिबातच सुगंध नसलेली पण आकर्षक रंगाची जास्वंद, एखादी दूर्वांची जुडी, तुळशीच्या चार मंजिऱ्या, या सगळ्या स्त्रीलिंगी फुलांच्या जोडीला तो अनंत किंवा तो चाफा अशी आरास रचतो, तसा हा कथासंग्रह विविधरंगी, विविधगंधी आहे.