-
Shivratna Shiva Kashid (शिवरत्न शिवा काशीद)
त्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. शिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती. तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी ! इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!
-
Odh Ishanyechi - Bhag 2 (ओढ ईशान्येची - भाग २)
ज्योतीने हिमालय-सह्याद्री विविधांगांनी पाहिले, परंतु ती इशान्येच्या राज्यांमध्ये गेली नव्हती. तेव्हा तिने आसामच्या दिशेने झेप घेतली. ही गोष्ट सप्टेंबर २०११ ची. तेथे तिला वनवासी कल्याण आश्रमवाले भेटले आणि ती 'स्वयंसेवक' झाली. तिचे कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू झाले. तिने नागालँडच्या पेरीन जिल्ह्यांत तीन वर्षे तेंनिग येथील शाळेत शिकवले-मुलींचे होस्टेल सांभाळले. ती २०१५ मध्ये मणिपूरला गेली, २०१७ मध्ये अंदमानला तेथे तिने दोन वर्षे काढली. कोरोनानंतर २०२२ पासून ती जम्मीच्या वेगवेगळ्या वीस खेड्यांत मुलांना विशेषतः मुलींना शिकण्यास प्रवृत्त करत आहे. शिकवत आहेच. तेथेच कुटुंबांत राहत आहे. ज्योतीने या सर्व ठिकाणी काय केले नाही असेच विचारावे लागेल, इतके विविधांगी कार्य. बालविकास व कुटुंबस्वास्थ्य या क्षेत्रांत जे जे गरजेचे ते ते वेळोवेळी केले. बायांना संस्कार, हस्तकला व उद्योग, 'कुकिंग', शिवणकाम, भरतकाम, कृत्रिम दागदागिने, वस्त्रसुशोभन... असे सर्व प्रशिक्षण दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना व स्त्रियांना आधुनिक जगण्यासाठी बळ दिले. ज्योती ज्या ज्या प्रदेशात या कामानिमित्ताने राहिली, तो प्रदेश अस्वस्थ- अशांत आहे, पण मौज अशी, की तेथील नित्याचे जनजीवन शांत, बरेचसे नियमित असते. ती मणिपूरमध्ये असताना तिने क्षोभ अनुभवला. तिच्या खोलीच्या खिडकीची काच भेदून बंदुकीची गोळी आत आली. ज्येष्ठांच्या सल्ल्याने ती तेथून निघाली आणि नागालँडमध्ये येऊन राहिली. त्या प्रत्येक ठिकाणचे तिचे स्नेहीजन अजून तिच्या संपर्कात असतात. विशेषतः ज्या मुलींच्या मनाने अधिक शिक्षणाची, पुढे जाण्याची उबारी घेतली त्या मुली भारतीय शहरांत पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्योतीच्या मदतीने येत असतात. ज्योतीची या साहसातील निरीक्षणे प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे बोलकी आहेत. तिने तिच्या आयुष्यातील या नव्या अध्यायाच्या पहिल्या टप्प्यावर 'ओढ ईशान्येची' असे पुस्तक लिहिले होते. ते त्या प्रदेशातील जीवनाचे बरेचसे सरळ निवेदन आहे. पण ज्योतीचा त्यानंतरचा तेथील काळ उग्र आहे; विशेषतः ३७० कलम रद्द केल्यानंतर सुप्तावस्थेतील हिंदू-मुस्लिम संघर्ष भारतात कृतक जाणवतो, परंतु ज्योतीच्या बोलण्यातून मात्र जम्मूमधील ते भय भेदक भासते !
-
A Life the The Shadows (ए लाइफ इन द शॅडोज)
ए लाइफ इन द शॅडोज वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याच्या जीवनातील स्मृतीचित्र काही झालं तरी आम्ही गुप्तचर अधिकारी संत असण्यापेक्षाही पातक करणारेच अधिक असतो. आम्ही आमच्या मित्रांशी बोलत असतोच, पण त्याहीपेक्षा शत्रूशी अधिक बोलत असतो. गुप्ततेच्या छायेत राहून दीर्घकाळ ‘आय. बी’मध्ये कार्यरत आणि पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा वाहणारे अमरजित सिंग दुलत हे सर्वश्रुत आहेत. त्यांचं हे स्मृतिचित्रपर पुस्तक म्हणजे, वाचकांसाठी अनेक अर्थाने वेगळा अनुभव होय. त्यांच्या वरील उद्धरणावरून ते लक्षात येईलच ! ए. एस. दुलत यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील काही निवडक गोष्टींसह देशात व परदेशात विविध ठिकाणी त्यांना आलेले अनुभव आणि नामांकित नेत्यांबाबतची त्यांची निरीक्षणं असं सर्वच मोठ्या रोचक पद्धतीने कथन केलं आहे. १९८०-९०च्या दशकात काश्मीरमध्ये जहालमतवादाचं राजकारण विकोपाला पोहोचलेलं असताना दुलत यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची ठरली आणि पुढे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात त्यांच्या सल्ल्याने काश्मीर समस्येबाबत वेगळी संवादाधारित नीती अवलंबली गेली. ‘काश्मीर मॅन’ दुलत यांनी कथन केलेले तेव्हाचे अनुभव, तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि कलम ३७० यांबाबतचं त्यांचं आगळं विश्लेषण हे सर्वच विचारप्रवृत्त करणारं असं आहे. ते म्हणतात, ‘साध्य-साधनाचा विचार करता, काश्मीरने मला शिकवलेल्या महत्त्वाच्या आणि क्रूरकठोर धड्यांपैकी पहिला धडा म्हणजे, उद्देश साध्य करण्यासाठी बंदूक हे नेमका उलट परिणाम निष्पन्न करणारं साधन ठरतं. एक आगळी जीवनकहाणी वाचण्याचा अनुभव… ए लाइफ इन द शॅडोज.
-
Jivanache Nave Marg (जीवनाचे नवे मार्ग)
ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'द न्यू वेज ऑफ लाईफ' या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
-
A Long Way Gone (अ लॉँग वे गॉन)
ईश्माईल बाह या बालसैनिकाचं हे आत्मकथन. बंडखोरांनी त्याच्या गावावर केलेल्या हल्ल्यामुळे बंदुकीच्या गोळ्यांपासून जीव वाचवत, उपाशीतापाशी, कधी संशयावरून मार खात, कधी शेतात काम करत, उन्हापावसात अनवाणी पायांनी आपल्या भाऊ आणि मित्रांसह या गावातून त्या गावात भटकंती करणारा ईश्माईल... भाऊ आणि मित्रांशी त्याची चुकामूक झाल्यावर जंगलात एकटाच राहणारा ईश्माईल... कुटुंबाच्या सुखरूपतेची बातमी कळल्यावर कुटुंबाला भेटायला गेलेला आणि कुटुंबाची भेट न होता, बंडखोरांच्या अग्निकांडात कुटुंबं गमावलेला ईश्माईल...आर्मीत भरती होऊन बंडखोरांना कंठस्नान घालणारा ईश्माईल...युनिसेफने पुनर्वसन केल्यानंतरचा आणि त्याच्या अंकलचा आधार गवसलेला ईश्माईल...बालसैनिकांच्या व्यथा जगासमोर मांडणारा ईश्माईल...या त्याच्या प्रवासात तो पावलोपावली पाहतो मृत्यूचं तांडव, प्रचंड रक्तपात, अमानुष क्रौर्य आणि वारंवार अनुभवतो मृत्यूची दाट छाया...अंगावर शहारे आणणारं आत्मकथन
-
Daav Mandala (डाव मांडला)
`या वेळी’, `या खेपेला’ किंवा `या डावात’; या अर्थाने लहानपाणीच्या वापरातील शब्द ‘आजुखेले’ – बालपणीपासून होत जाणारी शब्दांशी ओळख – काळाबरोबर मागे पडणारे शब्द – काही वाक्यं–काही वचनं – काही ओळींचा स्मृतीपटलावर असून नसल्यासारखा वावर – हेच सर्व शब्दबद्ध करत आयुष्यातील खेळ आणि खेळातील आयुष्य यांचा हा मांडलेला सारिपाट – लेखकाने पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीवनातल्या साध्यासुध्या सौंदर्यांची केवळ वर्णनं यात आहेत - भाषा, लय, भेटलेली माणसं, चराचर सृष्टी, दृष्टीस पडलेली अगाध सुंदरता यांचा संगम यात आहे – आयुष्याच्या प्रवाहात वाहत राहून ‘खेळायला’ उतरताना आलेल्या मौजेची ही कहाणी आहे. प्रसंगाला सामोरं जाताना त्यातली गंभीरता काढून कसं पुढं जावं हे स्वानुभवातून व खेळाला वय नसतं हे सांगत शब्दांमधून बोलणारी कहाणी ‘डाव मांडला..!’
-
Knife (नाइफ)
12 ऑगस्ट 2022 च्या सकाळी, सलमान रुश्दी शॅटॉक्वा इन्स्टिट्यूशनच्या स्टेजवर उभे होते. ते लेखकांना हानीपासून सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर व्याख्यान देण्याच्या तयारीत होते, तेव्हाच काळ्या कपड्यांमध्ये आणि काळा मास्क घालून एक व्यक्ती त्यांच्या दिशेने चाकू घेऊन धावत आली. त्यांचा पहिला विचार होता: “म्हणजे तूच आहेस. तू आलास.” यानंतर जे घडलं, ते एक भीषण हिंसक कृत्य होतं, ज्याने साहित्यविश्वाला आणि त्याहीपलीकडच्या जगाला हादरवून टाकलं. आता, प्रथमच आणि विसरता न येणाऱ्या तपशिलात, रुश्दी त्या दिवसाच्या भयावह घटनेचे आणि त्यानंतरच्या काळाचे स्मरण करतात — शारीरिक पुनर्प्राप्तीचा त्यांचा प्रवास, आणि त्यांच्या पत्नी एलिझा, कुटुंबीय, डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट्सच्या सैन्यामुळे व जगभरातील वाचकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे शक्य झालेल्या बरे होण्याच्या प्रक्रियेचं कथन करतात. हे पुस्तक म्हणजे वेदना, प्रेम, आणि पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीची साक्ष आहे – एक प्रेरणादायी आणि थेट मनाला भिडणारी कहाणी आहे
-
Vrukshsangini (वृक्षसंगिनी)
१४ वर्षांची मीना आणि तिच्या जीवनातील संघर्षांची ही कथा. मीना, बिहारच्या दरभंगातील मीनाचे २१ वर्षांच्या नेपाळी मनमोहनशी लग्न लावले जाते. लग्नानंतर, तिला बालपणाचे घर सोडून, नेपाळमधील तिच्या पतीच्या कुटुंबात सामील व्हावे लागते. मनमोहन शिक्षणासाठी काठमांडूमध्ये असतो, त्यामुळे मीना तिच्या कडक सासूच्या देखरेखीखाली एकटीच राहते. तिच्या सासूच्या कठोरतेमुळे, मीना तिच्या जिवलग जाऊबाईकडे आधार शोधते. मीना आणि तिच्या मुलीच्या दृष्टिकोनातून, लेखकाने स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष, ओळख, परंपरा आणि सांस्कृतिक समावेश यांचा सखोल अभ्यास केला आहे. कथा तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या अनुभवांवर आधारित आहे: कावेरी, मीना आणि प्रीती. कादंबरीत नेपाळमधील मधेशी आणि पहाडी समुदायांमधील सामाजिक-राजकीय संघर्ष, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची मर्यादा, आणि त्यांच्या आत्मशोधाचा प्रवास प्रभावीपणे मांडलेला आहे.
-
Limelight Pradeshik (लाईमलाईट प्रादेशिक)
1) अच्युत गोडबोले याला देवानं काय अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवलाय, हे देवाला तरी आठवतंय का... असा प्रश्न मी हे पुस्तक वाचताना स्वत:लाच कितीदा विचारला, हे मलाही आठवत नाही. साधारण एका जन्मात, एक अत्यंत हुशार माणूस किती विषय अभ्यासू शकतो? किती पदव्या मिळवू शकतो? आणि किती विषयांत १०० टक्के मार्क मिळवू शकतो? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, त्या विषयाला हात घालून, त्याचा अधाश्यासारखा अभ्यास करून, त्याचा रसास्वाद घेणं; आणि ते लिहून काढून, लोकांना त्याचा आनंद मिळावा म्हणून पुस्तकरूपात ते उपलब्ध करून देण्याचा चमत्कार हा माणूस किती वर्षं करतोय, हेही आता आठवेनासं झालंय! आत्ताच अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेलं नवीन पुस्तक क्लासिकमध्ये मोडणाऱ्या चित्रपटांचं परीक्षण... नाही समीक्षण... नाही रसग्रहण... नाही रसपानग्रहण... नाही.... मला तर शब्दच सुचत नाहीये असं लिहिलंय हे! एक अभिनेत्री म्हणून एवढंच सांगते की, सिनेमा माध्यमाचा एवढा सखोल अभ्यास आणि विचार करून सिनेमा बनवणारी मंडळीसुद्धा हे पुस्तक वाचून काहीतरी नवीन शिकतील, असं मनात आलं. त्या-त्या फिल्ममेकरचा मोठेपणा नेमका टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलाय. एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक दिल्याबद्दल अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी ह्यांची मी सदैव ऋणी आहे! . . वंदना गुप्ते --------------------------------------------------------------------- 2) चित्रपटांची आवड असणाऱ्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानकं आणि दिग्दर्शकीय कंगोरे, अभिनय-वैशिष्ट्ये यांची अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी केलेली ही ‘क्लासिक मुशाफिरी’ हवीहवीशी वाटेल! . . मकरंद अनासपुरे --------------------------------------------------------------------- 3) अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रादेशिक चित्रपटांच्या रसास्वादावरील ‘लाईमलाईट प्रादेशिक’ हे पुस्तक वाचलं. बंगाली , कन्नड, गुजराती या भाषा आणि त्यावरील चित्रपट आपल्याला परिचित असतात. पण मैथिली भाषेतील चित्रपटांचा समावेशसुद्धा या पुस्तकात आहे, ही विशेष कौतुकाची बाब आहे! सर्व चित्रपटांचा रसास्वाद अतिशय रंजक पद्धतीने घेतला असल्याने हे चित्रपट आवर्जून बघावेसे वाटतात. प्रादेशिक चित्रपटांवरील एक पुस्तक मराठीतून येते आहे, हा निश्चितच एक आनंददायी ठेवा आहे! या पुस्तकाविषयीची अधिक माहिती आपण लेखकद्वयींनी गप्पांच्या स्वरूपात एखाद्या पॉडकास्टवर दिली तर प्रादेशिक चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास वाटतो. खूप खूप अभिनंदन! . . सोनाली कुलकर्णी
-
Zumkula (झुम्कुळा)
'झुम्कुळा' हा मराठी कथासंग्रह वसिमबार्री मणेर यांनी लिहिला आहे. वसिमबार्री मणेर हे व्यवसायाने चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांनी 'होऊ दे जरासा उशीर' हा सिनेमा लिहिला व दिग्दर्शित केला आहे. लिखाण हे वसिमबार्री मणेर यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यांनी लिहिलेल्या सर्वच कथा मासिकातून प्रकाशित होत असतात. एवढंच नाही तर बरेच प्रकाशक त्यांच्या दिवाळी अंकासाठी कथा पाठवण्याचा हट्ट धरतात. अश्याच काही प्रकशित कथांचा हा कथासंग्रह तुमच्या भेटीला.
-
Brahmavidyecha Shilpakar (ब्रह्मविद्येचा शिल्पकार)
ह.भ.प. कीर्तन सम्राट श्री मुरलीधर महाराज निजामपूरकर जीवन चरित्र
-
Sakhi Tuzyachsathi (सखी तुझ्याचसाठी)
नोकरदार महिला तसेच गृहिणी यांना दैनंदिन दिनक्रमामध्ये भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी यांवर दिलेला बहुमोल कानमंत्र.
-